Total Pageviews

Monday, June 23, 2008

दोन दिवसांच आयुष्य

दोन दिवसांच आयुष्य
पण फुलासारखं असावं
ऊन पावसाचे क्षण सारे
भरभरून जगावं

खुलावं चिखलातून
कधी बागेत बहरावं
सुख दु:खांच्या भ्रमरांना
कधी ओंजळीत धरावं

कधी प्रियकराच्या हातातून
प्रेयसीच्या हाती जावं
अश्या सोनेरी क्षणांचा
कधी साक्षीदार व्हावं

वधूवरांच्या सोबतीने
कधी शुभ-मंगल करावं
मनोरथ पूर्णं करण्या
चरणी ईश्वराच्याही जावं

सुखात कुणाच्या उधळावं
तर दु:खातहि सामील व्हावं
शोभून हार तुऱ्यातून
कधी सरणावरही जळावं.

दोन दिवसांच आयुष्य
पण फुलासारखं असावं.......

तो फ़क्त एक क्षण

तो फ़क्त एक क्षण भान हरवून गेला
हरलो पण तो मला जिंकवून गेला

पावसाचं काय, तो नेहमीच येतो
प्रेमाचा एकच थेंब चिंब भिजवून गेला

चांदण्यातही आता मला तीच दिसते
जणू तो चंद्र मला फ़सवून गेला

देवळातही दुसरं काही मागवेना
नास्तिकाला तो श्रद्धाळू बनवून गेला

मी फ़क्त एक साधा चित्रकार होतो
अद्रुश्य रंगात मला तो रंगवून गेला

शब्द सुद्धा अपुरे पडू लागले
मनाला घातलेला बांध तो उसवून गेला..

प्रेम म्हणजे

प्रेम म्हणजे भावनांचं आभाळ
प्रेम म्हणजे भावनांचं आभाळ

ज्याला कुठेच अंत नाही

प्रेमाखातर प्राणही गेला

तरी मनाला त्याची खंत नाही


प्रेम म्हणजे बंधन

प्रेम म्हणजे स्पंदन

प्रेम म्हणजे स्वतः झिजून

इतरांसाठी सुवासणारं चंदन


कधी कधी असंख्य भेटी घडूनही

प्रेमाची भावना जागत नाही

तसं प्रेमात पडायला कधी कधी

ती भेटचं घडावी लागत नाही


प्रेम म्हणजे दोन मनांना

आपुलकीनं जोडणारा सेतू असतो

प्रिय व्यक्तीच्या सुखासाठी धडपड

हाच प्रेमाचा निरागस हेतू अस्तो


प्रेम म्हणजे प्रियजणांच्या

चेहऱ्यावर उमटणारा हर्ष असतो

प्रेम म्हणजे जिवात दडलेल्या

आत्म्याचा स्पर्श असतो


प्रेम म्हणजे भावनांची ठिणगी

जी हृदयात अवचित पेट घेते

जीवनाच्या एका नाजूक वळणावर

अविस्मरणीय स्वप्नांची भेट देते

तिला माझी एकही कविता कळत नाही

ती माझ्याशी बोलायची,
ती माझ्याशी बोलायची,
रोज गोड हसायची,
कधी कधी माझी
वाट बघत थांबायची....

दुसरी एकही मुलगी
माझ्याशी कधी बोलायची नाही,
ही पोरगी मात्र
माझी पाठ कधी सोडायची नाही....

तिच्या आयुष्यातल्या गमती
ती रोज मला सांगायची,
मी नवी लिहिलेली कविता
सारखी वाचायला मागायची....

एकदा मला म्हणाली
"तू माझ्यावर कध्धीच कविता करत नाही !"
तेव्हा मला समजलं....
तिला माझी एकही कविता कळत नाही

ति म्हणजे " मैत्री".

जिथे बोलण्यासाठी "शब्दान्ची" गरज नसते,
आनन्द दाखवायला "हास्यची" गरज नसते,
दुःख दाखवायला "आसवान्ची " गरज नसते,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते
ति म्हणजे " मैत्री".

मैत्री असते कशी, लोणच्यासारखी?
मुरत जाते, जुनी झाली की.
मैत्री असते कशी, दुधावरच्या सायीसारखी?
घट्ट होते वेळ जाईल तशी.
मैत्री असते कशी, बासुंदीसारखी?
गोडी वाढते आटवाल तशी.
मैत्री असते कशी, फोडणीसारखी?
लज्जत येते जीवनाला तडतडली तरी.
मैत्री असते कशी, मीठासारखी?
नसेल तर होईल जीवन अळणी
काय चिज असते नाही ही मैत्री??
मैफ़लीत रंगून जाते ती मैत्री
जीवनात विलीन होऊन जाते ती मैत्री

असाव कुणीतरी......

असाव कुणीतरी......
आपल्या हाकेला 'ओ' देणार.....
रिमझिंत्या पावसात हळूच छत्रीत बोलावनार..

असाव कुणीतरी......
आपल्या सोबत चालणार..
चांदण्यात फिरताना हातात हात घेणार..

असाव कुणीतरी......
कधी वाद घालणार..
खोटा रुसवा आणून, पुन्हा आपल्यावरच रागवणार..

असाव कुणीतरी......
मनमोकळ बोलणार..
काहीही न सांगता, अगदी मनातल ओळखणार..

असाव कुणीतरी......
खूप काही विचारणार..
लहान लहान गोष्टीसाठी शपथ घालणार..
असाव कुणीतरी...................

Friday, June 20, 2008

राधा ही बावरी

रंगात रंग तो शामरंग पाहण्या नजर भिरभिरते

ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते

त्या सप्तसुरांच्या लाटेवरूनी साद ऐकूनि होई

राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी

राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी llधृ.ll

हिरव्या हिरव्या झाडांची पिवळी पाने झुलताना

चिंब चिंब देहावरूनि श्रावणधारा झरताना

हा दरवळणारा गंध मातीचा मनास बिलगून जाई

हा उनाड वारा गूज प्रीतीचे गाणे सांगून जाई

त्या सप्तसुरांच्या लाटेवरूनी साद ऐकूनि होई

राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी

राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी ll१ll

आज इथे या तरुतळी सूर वेणूचे खुणावती

तुज सामोरी जाताना उगा पाऊले घुटमळति

हे स्वप्न असे की सत्य म्हणावे राधा हरपून जाई

हा चंद्र-चांदणे ढगाआडुनि प्रेम तयांचे पाही

त्या सप्तसुरांच्या लाटेवरूनी साद ऐकूनि होई

राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी

राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी ll२ll

तू काय आहेस.......??

तू काय आहेस.......??

तुझ्या रूपाचे खरेच मला काही माहीत नाही
पण आवाजाची गोडि फार छान आहे

तुझ्या रूपाचे खरेच मला काही माहीत नाही
पण स्वभावाची रंगत फार न्यारी आहे

तुझ्या रूपाचे खरेच मला काही माहीत नाही
पण बोलण्याची लकब मोठी भारी आहे

तुझ्या रूपाचे खरेच मला काही माहीत नाही
पण रागातील नखरा तर बाप रे बाप!

तुझ्या रूपाचे खरेच मला काही माहीत नाही
पण प्रेमाच्या ओळाव्याला मोलच नाही

तुझ्या रूपाचे खरेच मला काही माहीत नाही
पण खुडकन हसलीस म्हणजे वाटे चांद हाती

तुझ्या रूपाचे खरेच मला काही माहीत नाही
पण डोल्यातील पाणी खरे अनमोल मोती!
तुझ्या रूपाचे खरेच मला काही माहीत नाही......!!

आयुष्य खूप सुंदर आहे

आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसलं तरी,
एकट्यानेच ते फुलवत रहा,
वादळात सगळं वाहून गेल,
म्हणुन रडत बसू नका,
वेगळ अस काही,
माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नका
मृगाकडे कस्तुरी आहे,

फुलात गंध आहे,
सागराकडे अथांगता आहे,
माझ्याकडे काय आहे, असं म्हणून रडू नका,
अंधाराला जाळणरा एक सूर्य तुमच्यातही लपला आहे.
आव्हाहन करा त्या सूर्याला!!!!!
मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन.
अंधारामय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजून
मग रोजच उगवेल एक नवी सकाळ,
उत्साह ध्येयाने भारुन म्हणून म्हणते.........
आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसल तरी
एकट्यानेच ते फुलवत रहा…..

एखाद्या दिवशी

एखाद्या दिवशी जर तुला रडावसं वाटलं
तर मला हाक मार
मी वचन तर देत नाही की.....
मी तुला हासवेन
पण मी तुझ्यासंगे रडू तर शकतो

एखाद्या दिवशी जर तुला पळून जावसं वाटलं
तर मला सागांयला बिलकूल घाबरू नकोस
मी वचन देत नाही की.....
मी तुला थांबवेनपण मीही तुझ्यासंगे येऊ शकतो

एखाद्या दिवशी तुला कोणाचेच एकायचे नसेल
मला बोलव आणि.....
मी वचन देतो की…..
मी शांत राहीन

पण एखाद्या दिवशी तु बोलवलेस
आणि काहीच ऊत्तर मिळाले नाही तर.....
माझ्याकडे त्वरीत ये....
कदाचीत मलाच तुझी गरज असेल

Thursday, June 12, 2008

मैत्री केली आहेस म्हणुन

मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय

गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..

रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..

आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..

तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस
व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..

मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..

समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे
'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..

विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोस
जाणीवपूर्वक 'नातं ' जप.. मध्येच माघार घेऊ नको ......

काही माणसं

काही माणसे असतात खास
जि मैत्रीने खांद्यावर हात टाकतात,
दुःख आले जिवनात तरीही
कायम साथ देत राहातात.

काही माणसं मात्र
म्रुगजळाप्रमाणे भासतात,
जेवढे जवळ जावे त्यांच्या
तेवढेच लांब पळत जातात.

काही माणसे ही गजबजलेल्या
शहरासारखी असतात,
गरज काही पडली तरच
आपला विचार करतात,
बाकीच्या वेळी ति सारी नाती विसरतात
काही हवे असेल स्वतःला तर तुम्हाला मित्र मित्र करतात.

मात्र काही माणसं ही
पिंपळाच्या पानासारखी असतात,
जाळी झाली त्यांची तरी मनाच्या
पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवाविशी वाटतात.

मनातलं वादळ

पावसाच्या सरी सगळ्यांसाठी असतात ...
पण मनात भरून आलेले ढग आपलेच असतात !
मनातलं वादळ कोणालाच दिसत नाही ,
बरसणाऱ्या अश्रूंच्या सरी फ़क्त आपल्याच असतात !!!

कधीतरी

कधीतरी अशीच एक संध्याकाळ असेल
कधीतरी अशीच एक संध्याकाळ असेल,
ह्रदयात तूझी प्रीत अन ओठावर गीत असेल...
सगळया आठवणी क्षणात डोळयासमोरून जातील,
नकळत मग गालावर या थेंब ओघळतील...


कधीतरी पून्हा तू स्वप्नात येशील,
एकत्र घालवलेले क्षण आठवतील...
तूझ्याशिवाय आता मला जगावं लागेल,
जगतानाही रोज असं मरावं लागेल...


कधीतरी तू ही माझी आठवण काढशील,
प्रीत आठवून मझी कंठ तूझाही दाटेल..
डोळ्यातील अश्रू मूक पणे गिळून टाकशील,
कारण पूसायला तेंव्हा ते मी जवळ नसेन...



कधीतरी मग या मनालाही समजेल,
तूझ्या परतीची अशा तेंव्हा मावळेल...
त्यावेळेस जीवनाला या अर्थ नसेल,
कारण शरीराला तेंव्हा या मनंच नसेल...


कधीतरी तू मला असं वचन देशील ?
पूढच्या जन्मी तरी माझी होशील ?
मग तू सोडून गेल्याचं दुःख नसेल,
आपण कोणावर तरी प्रेम करू शकलो
यातच मग मला समाधान असेल...