Total Pageviews

Sunday, July 10, 2016

शरद पौंक्षे यांचा लेख .जशाचा तसा --

9 जुलै.अर्थात १८ आषाढ १९३८.

शरद पौंक्षे यांचा लेख .जशाचा तसा

गेल्या ५,७ वर्षात जात ह्या शब्दानं हिंदूस्थानात विशेषकरुन महाराष्ट्रात ऊच्छाद मांडलाय.जरा काही झालं की जात आडवी येते.मागे बेस्ट सारख्या शासकीय ऊपक्रमाच्या महाव्यवस्थापक पदावर खोब्रागडे नावाचे गृहस्थ बसले.त्यांनी डेपोत जाऊन जाहीरपणे जातीयवाद मांडला.त्यांच्या काळात बेस्टमधे ओपन कँटँगीरी असलेल्या कामगारांची पुरती वाट लावली गेली.पण त्या विरोधात एक अवाक्षर मिडीयानी छापलं नाही.मी स्वतः जात मानत नाही.फक्त मनुष्य जात मला मान्य आहे.पण ज्या पध्दतीने हे जातीच राजकारण पसरत चाललय हे फार भयंकर आहे.परवा कुठेतरी पवार साहेबांनी कारण नसताना जात मधे आणली.आणि तरीही हे पुरोगामी? सेक्युलर? आश्चर्य आहे.?
एक ब्राह्मण मुख्यमंत्री काय दिला की झाले भाजपा सेना जातीयवादी !
वाह रे वाह !
बरोबर आहे ९४ ला युती सरकारात मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले तेंव्हापासून तुमची बोंब आहे ही !
आता तर फडणवीस झाले !
ठीक आहे एक प्रश्न विचारतो मुख्यमंत्रीपद काय फक्त मराठा समाजाची जहागीर आहे का???
फक्त तथाकथित बहुजन समाजाची जहागीर आहे का???
काॅपीराईट आहे का????
किती जातीवाद हो??? अशान वाटोळ केलं राज्याचं व देशाच.
शाहु फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र.आहेच अमान्य करतच नाही.पण मग
काय सावरकर टिळक. फडके वगैरे मंडळी काय गोट्या खेळत होते का??
रक्त पडत असताना देखील सावरकर कोलु फिरवत होते अंदमानात!
हातातून रक्त येत होतं तरी काथ्या कुटत होते सावरकर !
दहा हजार ओळींच काव्य रचत होते सावरकर !
लोकमान्यांना मधुमेह होता तरी मंडालेस सहा वर्षांसाठी पाठविण्यात येऊन सश्रम कारावासाची शिक्षा झाली.
फडक्यांना एडनच्या तुरुंगात का छळ करून मारलं.एकाच घरातले ३सख्खे भाऊ चाफेकर फासावर लटकले.तात्या टोपे नाना साहेब पेशवे.स्वातंत्र्य समरात गेले.त्यांचा नाही का महाराष्ट्र?
शाहु फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र ना??त्यांच्या बद्दल नितांत आदर आहेच.पण
मग शिवछत्रपती, शंभुराजे, ज्ञानोबा ,तुकोबांचे रामदास यांचं काय???
त्यांचा महाराष्ट्र नाही का ??मध्यंतरी छ.शिवाजी महाराज मालीकेच्या शुटींगला कोणत्यातरी संघटनेची लोकं येऊन बसायची व दिग्दर्शकाला दम द्यायची की महाराजांच्या दरबारात एकही पगडी दिसता कामा नये.रामदास स्वामी दिसता कामा नयेत.महाराजांच्या अष्टप्रधान मंत्र्यांमधे कितीतरी ब्राह्मण होते.का तो ईतिहास दाखवायचा नाही? जस महाराजांचा राज्याभिषेक करायला ब्राह्मणांनी नकार दिला तेव्हाच एक ब्राह्मणच राज्याभिषेकाचे मंत्र म्हणायला आला ना?रत्नागीरीत सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी पतितपावन मंदिर ऊभ करणारे सावरकरच होते ना?कुटुंबनियोजनासाठी कर्वेच पुढे आले ना? दादोजी कोंडदेव पुतळा हलवला.काय झालं? बर ईतिहास वाचा एकदा.समाज सुधारकांची.क्रांतीकारकांची नावं.सावरकर, व त्यांचे बंधु.टिळक,फडके,चाफेकर बंधु,कान्हेरे,मंगल पांडे,राजगुरु,आगरकर,गोखले.रानडे.सेनापती बापट.कर्वे.जोशी.केळकर.बाजीराव,नानासाहेब,माधवराव पेशवे.इ.नाटक सिनेमा साहीत्य क्षेत्रातली नावं.पहिलच नाव विष्णुदास भावे,खाडीलकर.गडकरी,गोखले,कोल्हटकर कानेटकर,फाळके,परचुरे जोशी .लागु.फडके.भट .कर्वे.कुलकर्णी.राजाध्यक्ष.अत्रे.अभ्यंकर.आपटे.बापट.बर्वे.बेडेकर.चिपळुणकर.दांडेकर दार्व्हेकर.देशमुख.गाडगीळ.जोगळेकर.पेंडसे..क्रीडा क्षेत्रातली नावं. प्रकाश पडुकोण.रवी शास्त्री.नंदु नाटेकर.ह्रीशिकेष कानीटकर.विश्वनाथ आनंद.रोहीणी खाडीलकर.अजीत आगरकर.कुंबळे.चंद्रशेखर.नाडकर्णी.देवधर.कुलकर्णी.प्रसंन्ना.श्रीनाथ.द्रविड.अंजली भागवत.रमेश कृश्णन.कारगील हीरोंची नावं पद्मपाणी आचार्य.कंबपती नचिकेता.देवेंद्र जोशी.अरुण वैद्य.बिपीन जोशी.जयंत नाडकर्णी .प्रदिप नाईक.गोखले.लोकसभा सभापती नावं मावळणकर.मनोहर जोशी.अय्यंगार.सोमनाथ चँटर्जी.सुमित्रा महाजन. संतांची नावं.ज्ञानेश्वर,रामदास,एकनाथ,तुलसीदास,इ.सगळी कडे ब्राह्मण नावं दिसतील.ते काय संभाजी ब्रीगेड वाले त्यांनी मागे एक विधान केलं की नीर्ब्राह्मण समाज तयार करायचाय कसा करणार? .कुठे चाललोय आपण.बर भुतकाळात ब्राह्मणांनी दलीतांना छळलं.मान्य आहे त्याचा मी कायमच निषेध करत आलोय.पण मला वाटतं ज्या समाजाच्याा हातात सत्ता असते.ते दुसर्या ज्ञातीवर अन्याय करतातच.काय मराठ्यांनी केला नाही दलीतांवर अन्याय? केला की.अहो आदर बँकवर्ड हे बँकवर्ड बरोबर लग्न करायचे नाहीत.ते खालच्या जातीचे म्हणुन .बर एक
पेशव्यांना तर तुम्ही फक्त ब्राह्मण म्हणून शिव्या घालता!
त्यांचा पराक्रम तुम्हाला दिसत नाही. का?? त्यांनी स्वतःला छत्रपती म्हणवुन घेतलं नाही तर छत्रपतींच्या गादीचे सेवक म्हणुन राज्य केलं.महाराजांचं अर्ध काम पुर्ण केलं.४१ वर्षात ४२ लढाया जिंकलेला एकही न हरता.ते महत्वाचं नाही?
कारण शाहु फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र ना फक्त !
बाकीच्यांचं काही योगदानच नाही !
भाजपा सेना जाती वादी म्हणे !
मग ब्रिगेडचा जन्मदाते कोण?? सगळ्या जगाला माहितीय ! बर ब्राह्मणांचा द्वेश करणार्या बर्याचं नेत्यांना त्यांचे खाजगी व्यवहार सांभाळायला ब्राह्मण पींए.चं लागतात.का? कारण ही जात प्रामाणीक आहे.माहीतेय.नेत्यांचा भ्रष्टाचार लपवतील पण स्वतः एक पैसा खाणार नाहीत.तरीही
उठसूठ ब्राह्मण समाजाला संपवायची भाषा करणारे ब्रिगेडी नि तथाकथित पुरोगामी कुणाच्या आश्रयाने हे सर्व करतात?
हे ही जगाला माहितेय.आणि एक प्रश्न पडतो नेहमी मला.की एवढे ब्राह्मण क्रुर होते ?तर त्यांचा काही अंशी गुण पुढच्या पिढ्यांमधे ऊतरायला हवा होता.पुर्वंज क्रुर,छळणारे पिळवणुक करणारे.तर आत्ताचे ब्राह्मण पाहुन आजीबात च विश्वास बसत नाही हो.की ह्यांच्या ५ पिढ्या आधी हे एवढे क्रुर होते.आत्ताचे तर सगळे ,काही अपवाद सोडुन,पचपचीत आहेत .चीड येणे.विद्रोह करणे.क्रांती घडवणे.प्रवाहा विरुध्द वाहण्याची हिंमत दाखवणे हे गुणच दिसत नाहीत.सगळे ईतकं सहन करतात की चीड येते कधी कधी.कितीही शासकीय अन्याय करा.हे आपले शांतच.बघा जरा बाकीच्या जाती बद्दल एक शब्द जरी आला तरी रान पेटवतात की नाही ते.कन्यादान मालीकेत खलनायकाचं अडनांव तेली होतं.तर ते बंद करायला लावलं.ढोर मेहनत,चांभार चौकशी.असे शब्द ऊच्चारायचे नाहीत लगेच राडा ,मोर्चा.पण भागवत किंवा गोखले भ्रष्ट दाखवला किंवा भटाला दिली ओसरी म्हटलं तर एका ब्राह्मणाचा तरी मोर्चा निषेध कधी ऐकीवात नाही बुवा.मग ५ पिढ्या आधीचे दलीतांचा अमानुष छळ करणारे अचानक ईतके सहिष्णु कसे काय झाले? प्रश्नच पडतो मला.म्हणजे ईतिहास पाहीला तर मुसलमान क्रुर होते त्यांनी बलात्कार मंदिरांच ऊध्दवस्ततीकरण केलं.तर त्यांचे काही अंशी गुण (जे काही अंशही भारी पडतात).पण ते दिसतात ना झाकीर नाईक किंवा ओवेसी ब्रदर्स यां कडे पाहुन.किंवा संभाजी ब्रीगेड कडे पाहीलं की काही अंश आलेत ना पुर्वजांचे.मग तसे ब्राह्मणांमधे यायला हवे होते ना? मग एवढा अमुलाग्र बदल? बर खरच झाला असेल तरी ब्राह्मणांना मानायला हवं.कारण हाही एक आदर्षच आहे.की वाईट गोष्टींना संपुर्ण तिलांजली दिली म्हणुन.
ब्राह्मणांना इतके का घाबरता तुम्ही??काही वर्षांपुर्वी एक चित्पावन ब्राह्मण संमेलन भरवलं तर मायावती पासुन अनेक राजकीय पक्ष हादरले? प्रायोजक होण्याची ईच्छा दाखवली.का?
किती राहिलेत आज ब्राह्मण आज फक्त ५% !
तरी त्यांचीएवढी धास्ती घेता तुम्ही ???
का???
कधी आरक्षण नाही, राजकीय पाठबळ नाही !
तरीही तुम्ही ब्राह्मणांनाच शिव्या घालणार !
शाहुफुले आंबेडकरांचाच महाराष्ट्र ना?आहेच त्यांचा पण फक्त त्यांचाच नाहीये.
मग सावरकर टिळकांचा नाव घ्यायला फाटते का???
की जीभ हासडली जाते???
पवार नेहमी जातीपातीचे राजकारण करतात हे सगळ्या जगाला माहितीय तरीही तुम्ही नेहमी शिवसेना व भाजपालाच जातीवादी म्हणणार !
वाह रे वाह !
उलटा न्याय आहे हा !
पेशव्यांना सतत शिव्या !
फक्त ब्राह्मण म्हणून!
काहीही पुरावे नसताना त्यांच्यावर घाणेरडे आरोप!
पण तुमच्या बद्दल काही बोललं की तुमच्या भावना दुखावणार !
ह्याच्यावरूनच खरं जातीवादी कोण आहे हे कळतं !
तरीदेखील तुम्ही ब्राह्मणांनाच शिव्या घालणार !
घाला शिव्या !
ब्राह्मणांना तसाही काही फरक पडत नाही !
गेली २०० वर्षे तेच सुरुय !
या सर्वांना ब्राह्मण पुरून ऊरलेत!!जात मी कधीच मानली नाही मानत नाही.कारण मी सावरकर बाळासाहेबांच्या खर्या अर्थाने सेक्युलर विचारांचा आहे.पण तरीही सतत हे दे काही चाललय त्यावर एकदा बोलायचच होतं.बाकी सर्व जाती संपवुन फक्त हिंदु ही एकच जात शिल्लक रहावी ह्या मताचा मी आहे कारण तसेच संस्कार तात्याराव बाळासाहेबांनी केलेत आमत्यावर.पण त्यांनाही धर्मांध ठरवण्यात .त्यांनाही कायम टिकेला तोंड द्यावं लागल तीथे मी कोण आहे.सामान्य.तेव्हा हा लेख वाचुन माझ्याही विरोधात बोलतील बोलुदेत.पण मी बोलत रहाणार.कोणीही काहीही म्हटलं तरी चालेल.प्रवाहा विरुध्द वाहण्याची थोडी किंमत ही मोजावीच लागते नाही का?
भारत माता की जय.

शरद पोंक्षे.