Total Pageviews

Wednesday, September 10, 2014

नातं आणि गाणं

नातं आणि गाणं अगदी एकमेकांसारखे असतात
हव्या तेवढ्या नेमक्या अंतरावर असणं म्हणजे सूर
त्यापेक्षा जास्त किंवा कमी अंतरावर असणं म्हणजे दूर

तर अजिबात प्रपोज करू नका....

..तर अजिबात प्रपोज करू नका
नात्यामध्ये तुम्ही कमिटेड होण्याच्या विचारात आहात का? त्यासाठी खालील कारणं महत्त्वाची मानत असाल, तर तुम्ही चुकीच्या मार्गावर जात आहात. त्यामुळे त्यांचा विचार करा आणि निर्णयावरही फेरविचार करा.
तो/ती छान आहे
तो किंवा ती छान आहे हे कारण कोणत्याही नात्यासाठी फुटकळ ठरणारं आहे. तुम्हाला शंभर 'छान' मुलं किंवा मुली मिळून जातील, त्यामुळे हे कारण गृहित धरू नका. नात्यात गुंतण्यासाठी कोणताही जोडीदार केवळ छान असणं महत्त्वाचं नसतं, तर त्याच्या स्वभावाचे प्रत्येक पैलू माहीत असावे लागतात. तिच्या किंवा त्याच्यापेक्षा चांगलं किंवा उत्तम शोधण्याचा प्रयत्न करा.
एकमेकांना खूप आधीपासून ओळखतो
तुम्ही पंधरा वर्षाचे होता, तेव्हापासून एकमेकांना ओळखता आणि आता २५ वर्षांचे झालात, तरी एकत्र आहात. हे कारण प्रपोज करण्यासाठी नक्कीच पुरेसं नाही. जास्त वेळ एकत्र आहात याचा अर्थ लग्न केलंच पाहिजे असा काही नियम नाही. नवरा-बायको बनण्याचा अट्टहास नको. त्याच्याबरोबर किंवा तिच्याबरोबर उर्वरित आयुष्य घालवण्यासाठी तुम्ही खरोखरच इच्छुक आहात का किंवा तिच्या/त्याच्यासोबत एकत्र राहाण्यात तुम्हाला रस वाटतो का हे पाहा. तिच्या/ त्याच्याशिवाय राहाणं आता मुश्कील आहे अशी भावना असेल, तर प्रपोज करायला हरकत नाही.
माझ्या आईला तो/ती आवडते
आपल्या आईबाबांना ती/तो सून किंवा जावई म्हणून पटते. किंवा त्यांनी तसंच मानलंय, अशी कारणं असतील, तर प्रपोज करण्याचा विचारही मनात आणू नका. तुम्हाला त्या व्यक्तीबरोबर आयुष्यभर राहायचंय, त्यामुळे आई-बाबांच्या भावनेपेक्षा तुमच्या भावना महत्त्वाच्या.
तिचं/त्याचं कुटुंब एकदम मस्त आहे
कुटुंबासाठी नाही, तर स्वतःसाठी लग्न करा. अन्यथा तुमच्या वैवाहिक आयुष्यात समस्या आल्यास नातं शेवटाला जाऊ शकतं. त्यामुळे कुटुंब मस्त आहे म्हणून ती व्यक्तीही छानच असेल असं नाही. मग हे कारण नकोच.
जवळीकता
मध्यंतरी शारीरिक जवळीकता आली होती आणि त्याचं ओझं मनावर आहे, हे कारण तसं संवेदनशील आहे; पण या कारणाला घाबरून किंवा लाजिरवाणं वाटून नात्यात बांधले जाऊ नका. संकुचित विचार न करता निर्णय घ्या.
तो/ती जास्त पैसे कमवते/कमवतो
पैसा हा सर्वस्व नाही. त्यामुळे त्याच्या हव्यासापोटी नात्यात बांधले जाऊ नका. पैशांमुळे सुखसोई येतात. सुख नाही, हे पक्कं लक्षात ठेवा. पैशापेक्षा प्रेम आणि आपुलकीच महत्त्वाची असते.
मित्रांच्या नादाने
तुम्ही तिशी पार केली आहे आणि या वयात तुमचे इतर मित्रमंडळी लग्नबंधनात अडकले आहेत, त्यांना मुलंबाळं झाली आहेत... पण तुमच्या बाबतीत मात्र अजून अफेअरचाही पत्ता नाही. मग तुम्ही निराश वगैरे झाला आहात. केवळ या नैराश्यापोटी कुणालातरी प्रपोज करण्याच्या विचारात असाल, तर चुकीच्या वाटेवर जात आहात. नात्याची घाई करू नका. अन्यथा लग्नानंतर समस्या निर्माण होतील आणि ते डोईजड होईल. नुसतंच लग्न करावंसं वाटतंय म्हणून कुणालातरी प्रपोज करून उपयोगाचं नाही. जर त्या व्यक्तीशी लग्न करावंसं वाटत असेल तर मात्र जरूर विचार करा.
तिचं/त्याचं प्रेम आहे म्हणून...
कमिटमेंटसाठी केवळ एकाचं प्रेम असून फायद्याचं नाही. दोघांचंही एकमेकांवर प्रेम असणं महत्त्वाचं आहे. नात्यात जबरदस्ती करून फायद्याचं नसतं हे लक्षात घ्या.
आमच्यातली मैत्री लई भारी
काहीजणांकडे मित्र किंवा मैत्रीण म्हणून आपण पाहू शकतो; पण ती व्यक्ती जोडीदार म्हणून योग्य असेलच असं नाही.

मुंबई टाइम्स
Sep 10, 2014

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेछा!

अंधारावर राज्य करणारया चंद्राच्याही
डोळ्यात खुपतो आम्ही...
कारण
उशाला तलवारी घेऊन झोपतो आम्ही...
मुंडके उडवले तरी चालेल
पण मान कुणापुढे वाकणार नाही l

डोळे काढले तरी चालेल
पण नजर कुणापुढे झुकणार नाही l
जीभ कापली तरी चालेल
पण प्राणाची भिक मागणार नाही l
हात कापले तरी चालेल
पण हात कुणापुढे जोडणार नाही l
पाय तोडले तरी चालेल
पण आधार कुणाचा घेणार नाही l
गर्व नाही माज आहे या मातीला
मर्द मराठा म्हणतात या जातीला l
" मरण आले तरी चालेल,
पण शरण जाणार नाही.
प्राण गेला तरी चालेल,
पण हिंदू धर्म सोडणार नाही.
माघार घेणे हे मावळ्यांच्या रक्तात नाही
!!

 




वयाच्या १६ व्या वर्षी स्वताचा हाताच्या अंगठ्याचे रक्त सांडून स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा ज्यांनी केली.
सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी समजून साडे तीनशे वर्षा पूर्वी केलेला राज्यकारभार आजही आपल्याला मार्गदर्शक आहे. अशा त्या स्वराज्य संस्थापक कल्याणकारी श्री. छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त
मनाचा मुजरा!!!

मला माणसे जोडायला आवडतात

मला माणसे जोडायला आवडतात,
माणसांशी नाती जोडायला आवडतात
जोडलेली नाती जपायला आवडतात,
कारण
माझा विश्वास आहे की, माझ्या मृत्यूनंतर
मी कमावलेली संपत्ती
मी माझ्याबरोबर घेऊन जाणार नाही,
परंतु
मी जोडलेल्या माझ्या माणसांच्या डोळ्यांतील
अश्रूंचा एक थेंब हाच
माझ्याकरिता लाखमोलाचा दागिना आणि हीच
माझी माझ्या आयुष्यातीलॊ खरी कमाई
असेल...
तुमचे आणि माझे हे नाते
माझ्यासाठी अनमोल आहे ...

बायको नवरा - Jokes

बायको : माझा मोठेपणा बघा...मी तुम्हाला नं बघताच तुमच्याशी लग्न केलं.

.
.
.
.
.
.

नवरा : माझा मोठेपणा बघ... मी तुला बघून पण तुला नकार नाही दिला.!


--------------------------  --------------------------  -------------------------- 

पति :- आज घर आवरलेलं आहे . तुझं व्हाट्सअप बंद होंत का आज ?

पत्नी :- नाही हो.
फोनचा चार्जर सापडत नव्हता .
तोच शोधण्याच्या नादात घर आवरलं गेल..!


--------------------------  --------------------------  --------------------------
 

कोणाच्या तोंडात जनतेने डांबर घालायचे....?

चपाती खराब निघाली म्हणून
नेतेमंडळी केटरिंग च्या तोंडात
रोटी घालतात ,
मग आमचे डांबरी रस्ते खराब
होतात लगेच;
मग काय
आता कोणाच्या तोंडात जनतेने डांबर घालायचे....?

अधिक खाण्याविषयी थोडसं ( पु.ल.देशपांडे )

पु.लं.चे:

खाण्याचंसुद्धा शास्त्र आहे.
रागांना वर्ज्यबिर्ज्य स्वर असतात, तसे खाण्यालासुद्धा असतात. उदाहरणार्थ, श्रीखंड घ्या. बाकी, जोपर्यंत मला प्रत्यक्ष काही द्यावं लागत नाही तोपर्यंत 'घ्या' म्हणायला माझं काय जातं म्हणा! तर श्रीखंड पावाला लावून खा," म्हटलं तर तो खाणार नाही. वास्तविक पाव हा देखील पुरीसारखा गव्हाचाच केलेला असतो; पण श्रीखंडाच्या संदर्भात तो वर्ज्य स्वर आहे. पाव आणि अंड्याचं आमलेट ही जोडी शास्त्रोक्त आहे. पुरी आणि आमलेट हे एकत्र सुखांन नांदणार नाहीत. जिलबी आणि मठ्ठा यांचा संसार जसा सुखाचा होतो तसा जिलबी आणि...छे! जिलबीला अन्य कुणाशी नांदायला पाठवण्याची कल्पनाच रुचत नाही.

खाण्याचे हे कायदे सांभाळून खाण्याला खानदानी मजा आहे. सुरांचे वर्ज्यावर्ज्य नियम पाळून गाण्याला जसं खानदानी गाणं म्हणतात. तसंच पदार्थाची कुठली गोत्रं जुळतात त्याचा विचार करून ते पानात वाढण्याला खानदानी खाणं म्हणतात. राग्याप्रमाणंच खाण्याच्या वेळा सांभाळल्या पाहिजेत. सकाळी यमन बेचव वाटतो. सकाळी थालीपीठही बेचव वाटतं. मारवा राग जसा संधिकालातला, तसंच थालीपीठदेखील साधारणतः भीमपलास आणि पूरिया धनाश्री या रागांच्या वेळांच्या मधे बसतं सारंगाच्या दुपारच्या वेळेला थालीपीठ खाऊन पहा. आणि संध्याकाळी साडेपाच-सहाच्या सुमाराला नको म्हणून पहा.

बाहेर पाऊस पडत असताना ज्याला गरम भजी म्हणून खावीशी वाटली नाहीत, तो मनुष्य चळलाच म्हणून समजावं. सकाळी तीन भजी खाल्ली तरी अधिक. पण बाहेर पाऊस पडतो आहे, हवेत गारवा आहे, रमी किंवा ब्रिजमध्ये आपण जिंकतो आहो, अशा वेळी शेकडो भजी खाल्ली तरी ती अधिक नाहीत. अधिकचं हे असं आहे. लोक भलत्या वेळी, भलत्या ठिकाणी आणि भलतं खातात. हॉटेलात जाऊन भेळ खाण्या-याचं पोट नव्हे, मुख्यत: डोकं बिघडलेलं असतं. शहाळ्याचं पाणी हापिसात बसून पिणा-याची प्रमोशनं थांबवली पाहिजेत. मसाल्याच्या दुधावर पान खाल्लं पाहिजे. आणि चहाबरोबर भलतंच खातात.. आणि चहावर धुम्रपान केलं पाहिजे. खाण्यापिण्याचंही काही शास्त्र आहे. ह्या भारतात एके काळी हे शास्त्रवेते होते. उपासांच खाणंदेखील शोधून काढणारी ती विद्वान माणसं माझ्या माहितीत आहेत. उपास लागणा-या माणसाइतकीच उपासाचे पदार्थ जास्त झाल्यामुळं जरा जड वाटतंय म्हणणारी माणसं आहेत.

लग्नाला पंक्ती, गावजेवणं, समाराधना वगैरेचा तो जमाना होता. 'हरहर महादेव'ही आरोळी रणक्षेत्राप्रमाणं वरणक्षेत्रादेखील उठत असे. माणसं बसल्या बैठकीला शंभर जिलब्या तोंडी लावणं म्हणून उठवत, त्यानंतर आग्रह सुरू होई. सा-या सणांतून खाणे काढून टाका नि काय उरते पाहा. सारी भारतीय संस्कृती खाण्याभोवती गुंतली आहे;नव्हे, टिकली आहे. होळीतून पोळी काढली की उरतो फक्त शंखध्वनी तो देखील पोळी मिळणार नसेल तर क्षीणच व्हायचा. दिवाळीतून फराळ वगळा, नुसती ओवाळणीची वसुली उरते. संक्रातीच्या भोगीला जोवर तीळ लावलेली बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत आणि तिळगूळ आहे तोवर 'गोड गोड बोला' म्हणतील लोक.

कोजागिरी पौर्णिमेतनं आटीव केशरी दुध वगळा, उरेल फक्त जागरण आणि कुठल्या तरी सस्त्यात मिळालेल्या उमेदवार गवयाचं गाणं. गणेशचतुर्थीला मोदक नसले तर आरत्या कुठल्या भरवशावर म्हणायच्या? रामनवमीच्या सुंठवडा, कृष्णाष्टमीच्या दहीलाह्या, दत्तापुढले पेढे, मारुतरायापुढलं साधं खोबरं अन, खडीसाखर... सा-या देवांची मदार या खाण्यावर आहे. हेच गाळलं की हल्लीच्या लग्नासारखं व्हायचं. पाहुण्यांचे हात ओले करण्याऎवजी आहेराच्या रूपानं स्वतःचे हात धुवून घेण्याचा कार्यक्रम. पंगती उठवण्याऎवजी कर्कशकर्ण्यातून रेकॉर्डस ऎकवून येणा-याचं डोकं उठवायचं.

-- अधिक खाण्याविषयी थोडसं ( पु.ल.देशपांडे )

हरतालिका व्रत ( भाद्रपद शुद्ध तृतिया )

गणेश चतुर्थींच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतियेला "हरतालिका` असे म्हणतात. या दिवशी गणपतीच्या आईची म्हणजे पार्वतीची पूजा हिंदू महिला करतात. 

हरतालिका या शब्दाची फोड "हरित` म्हणजे "हरण` करणे आणि "आलिका` म्हणजे "आलिच्या`-मैत्रिणीच्या असा आहे. मैत्रिणींच्या साह्याने पार्वतीने केलेले शंकराचे हरण, असा या शब्दाचा अर्थ आहे. हिंदू कुमारिका आपल्याला हवा असलेला, आपल्या मनासारखा सुरेख पती मिळावी म्हणून "हरतालिका` हे व्रत अत्यंत श्रद्धापूर्वक करतात. काही जणी हे व्रत कडक करतात. आपल्याकडे विवाहित स्त्रिया हे व्रत करतात. विवाह झाल्यानंतर इच्छित पती मिळाल्यावर हे व्रत करण्याचा काय अर्थ आहे? पण एकदा घेतलेले शंकराचे व्रत मोडू नये अशी महिलांची श्रद्धा असते म्हणून त्याही हे व्रत आजन्म करतात.

हिमालयाचा राजा हिमवान याची पार्वती ही कन्या. पर्वताची कन्या म्हणून तिचे नाव "पार्वती` असे ठेवण्यात आले. तिचे लग्न कोणाबरोबर करावे अशी काळजी त्याला लागली होती. एकदा नारदमुनी हिमवानाकडे आले आणि त्याला म्हणाले, "हे पर्वतश्रेष्ठा ! तुझ्या या सुस्वरुप मुलीला मागणी घालण्यासाठी भगवान विष्णूंनी मला तुझ्याकडे पाठविले आहे. ते ऐकून हिमवानाला आनंद झाला. त्याने पार्वतीला ती बातमी सांगितली. पण पार्वतीने मनोमन कैलासराणा शंकराला पती म्हणून वरले होते. तसे प्रत्यक्ष पित्याला स्पष्टपणे सांगण्याचे धैर्य तिला झाले नाही. तिने आपल्या मैत्रिणींबरोबर आपल्या पित्याला निरोप पाठवला. "तुम्ही माझा दुसऱ्या कोणाबरोबरही विवाह करून दिला तर मी जीव देईन.`


पार्वती आपल्या मैत्रिणींसह अरण्यात निघून गेली. तिथे तिने घोर तपश्‍चर्या केली. नदीकाठी वाळूचे शिवलिंग तयार करून ती त्याची पूजा करू लागली. प्रथम ती फक्त झाडाची कोवळी पाने खाऊन राहत होती. पुढे तिने तेही सोडून दिले. त्यामुळे तिला "अपर्णा` असे नाव पडले. तिच्या तपश्‍चर्येने भगवान श्रीशिवशंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला वर मागायला सांगितले. ती म्हणाली, "तुम्ही माझ्या तपश्‍चर्येमुळे खरोखर प्रसन्न झाला असाल, तर माझे पती व्हा.` शंकराने "तथास्तु` म्हटले व निघून गेले. पार्वतीचा शोध घेत हिमवान त्या अरण्यात आला. तिला त्याने घर सोडून येण्याचे आणि तपश्‍चर्येचे कारण विचारले. तेव्हा तिने आपला दृढ निश्‍चय आपल्या वडिलांना सांगितला. भगवान श्रीशंकरांनी दिलेला वरही सांगितला.


तिचा दृढनिश्‍चय, श्रद्धा पाहून हिमवानाने तिचा विवाह भगवान श्री शंकराशी करून दिला. पार्वतीची निष्ठा आणि श्रद्धा व भक्ती यांचा विजय झाला. पार्वतीच्या शंकरावरील निष्ठेमुळे, प्रेमामुळे शंकराला "पार्वतीपती` असे नामाभिधान पडले.


इच्छित पती शंकराची प्राप्ती पार्वतीने आपल्या मैत्रिणींच्या साह्याने प्राप्त करून घेतली. पार्वतीने आपला वर कडक तपश्‍चर्येने मिळविला. त्याप्रमाणे मनाजोगता पती मिळावा म्हणून हिंदू कुमारिका, महिला हे व्रत श्रद्धापूर्वक करतात. या दिवशी दिवसभर उपवास करतात. काही जणी तर दिवसभरात पाण्याचा थेंबही तोंडात घेत नाहीत.


रात्री 12 वाजता बेलाचे पान चाटून, काही जणी रुईच्या पानावर मध लावून ते पान चाटून, तर कोणी खडीसाखर, केळी यांसारखे अगदी थोडेसेच खाऊन उपवास करतात. अर्थातच ज्यांना इतके कडक व्रत करता येत नाही. त्या स्त्रिया उपवासाचे पदार्थ खाऊन व्रत करतात.


या व्रताच्या वेळी स्वच्छ केलेल्या जागेवर एका जागी चौरंग ठेवतात. केळीच्या खांबांनी चारही बाजूंनी सुशोभित केलेल्या चौरंगावर पार्वती आणि शंकराची स्थापना करून त्याची षोडशोपचारे पूजा करतात. धूप-दीप, नैवेद्य दाखवून वेगवेगळ्या प्रकारची पत्री (पाने), फुलांची पूजा केली जाते. धूप-दीप, निरांजन दाखविला जातो. हरतालिकेच्या पूजेत जी पत्री वाहतात. त्यात जाई, शेवंती, पारिजातक , तुळशी, रुई, शमी, दुर्वा, आघाडा, चाफा, केवडा, डाळिंबाची पाने वाहतात. मनोभावे प्रार्थना करतात. "सखे पार्वती, तुला जसा इच्छित वर मिळाला तसा आम्हाला मिळू दे. अखंड सौभाग्य लाभू दे`, अशी प्रार्थना करून आरती केली जाते.
या दिवशी पूजा झाल्यावर सुवासिनी, कुमारिका रात्रभर जागरण करतात. झिम्मा, फुगडी, टिपऱ्या, गोफ इत्यादी खेळ खेळतात.

ll अनंत चतुर्दशी ll

ll अनंत चतुर्दशी ll
.
अनंतं वासुकीं शेषं पद्मनाभं च कम्बलं। शंखपालं धृतराष्ट्रं तक्षकं कालीयं तथा॥ ही नऊ नागांची नावे आहेत. पूर्वीच्या काळी नागांचा आणि सर्पांचाही वावर खूपच अधिक होता. एकतर त्यामुळे नागांची प्रार्थना करुन त्यांनी आपल्याला दंश करु नये, अशी अपेक्षा बाळगली जात असे. आता नागांचीही वस्ती खूपच कमी झाली आणि सर्पजातीचे महत्त्वही लोकांना कळले. मात्र आपल्याकडे एक समज हा नागांमध्ये काही देवदेवतांचा वास असतो, असा आहे. वास्तुपुरुष नागाच्या रुपाने त्या-त्या वास्तुत राहतो आणि वास्तूचे रक्षण करतो, अशी पूर्वापार समजूत होती. वड-पिंपळ यासारख्या वृक्षांकडे किंवा काही देवदेवतांच्या घुमटीत, छोटी मंदिरे अशा ठिकाणी काही भ्रष्टाचार झाला तर नाग दर्शन देई आणि मग तो भ्रष्टाचार झाल्याबद्दल त्याची क्षमा मागावी लागे, अशी सार्वत्रिक श्रध्द होती.

आपल्या सणावारांचा प्रारंभ प्रतिवर्षी नागपंचमीपासून होतो आणि त्यातील एक पर्व अनंत चतुर्दशीला संपते. उद्या अनंत चतुर्दशी! अनंत चतुर्दशीनंतर लागलीच एका दिवसाने पितृपक्ष सुरू होतो. पितृपक्ष शुभकार्यास वर्ज्य मानला जातो. तो संपताच नवरात्राचा प्रारंभ होतो. भवानीदेवीचा जयजयकार सर्वत्र मुक्तकंठाने सुरू होतो आणि पुन्हा सणांचे दुसरे चक्र दसरा, दिवाळी, कोजागिरी पौर्णिमा, दत्तजयंती, होळी असे सुरू होते. अनंत हे एका महानागाचे नाव असले आणि हे नाव जपणे पुण्यकारक मानले जात असले तरी अनंत हे विष्णुचे नाव आहे, हे नजरेआड करता नये. अनंत चतुर्दशीच्या दिवशी विष्णुची 'अनंत' ह्या नावाने पूजा केली जाते. अनंत चतुर्दशीचे व्रत खूप घरातून पाळले जाते. १४ प्रकारची फुले, १४ प्रकारची फळे, १४ प्रकारची धान्ये आणि १४ प्रकारचे नैवेद्य दाखवून एका दोरकासह अनंताची पूजा केली जाते. हा दोरक म्हणजे दोरा अनंत म्हणूनच ओळखला जातो. हा उजव्या हाताच्या मनगटावर बांधतात आणि तो सर्वप्रकारच्या संकटापासून रक्षण करतो, अशी श्रद्धा असते. ह्या व्रताचा विशेष असा की, ही पूजा झाल्यानंतर विसर्जन मागाहून दुस-या दिवशी किंवा गणपती पूजेप्रमाणे दोन, पाच दिवसांनी अशाप्रकारे न करता त्याच दिवशी पूजेनंतर काही वेळाने करण्याची रुढी आहे. हे अनंताचे व्रत १४ वर्षे आचरावे असे सांगितलेले असले तरी अनेक लोक ते आजन्म पाळत असतात.

ह्या व्रताची कथा सत्यनारायणाच्या कथेसारखीच आहे. म्हणजे कोणी अडचणीत सापडला असता त्याला दुस-या कोणी तरी अनंताचे व्रत करण्यास सांगितले आणि त्यामुळे त्याचे दुःख निवारण झाले. पुढे तो हे व्रताचरण विसरला आणि त्याच्यावर घोर आपत्ती आल्या, अशा स्वरुपाच्या या व्रताच्या कथा आहेत. नेहमीप्रमाणे ह्या कथेचाही नायक एक ब्राह्मण आहे. त्याच्या पत्नीने एका कन्येला जन्म दिला, तिचे नाव शीला! तिच्या जन्मानंतर ब्राह्मणाची पत्नी दिवंगत झाली. सुमंतुने म्हणजे त्या ब्राह्मणाने दुसरा विवाह केला. ती पत्नी अतिशय कर्कशा होती. पुढे ह्या शीलेचा विवाह कौंडिण्य ॠषीशी झाला. 'निरोप देताना जावयाला काहीतरी देऊ या,' असे सुमंतुने म्हटल्यावर त्याची कर्कशा पत्नी आडवी आली. तिने सुमंतुला ते देऊ दिले नाही. उलट जावयाला आणि लेकीलाही दुरुत्तरे केली. ती पतीबरोबर सासरी जात असताना वाटेत एकेठिकाणी काही स्त्रिया अनंताचे व्रत आचरित असताना तिला दिसल्या. त्या स्त्रियांकडे शीलेने व्रताची चौकशी केली आणि ती त्या दिवसापासून ते व्रत आचरु लागली. व्रताच्या प्रभावाने तिला म्हणजे कौंडिण्याला वैभवाचे दिवस आले. तो खूप श्रीमंत झाला आणि त्याला श्रीमंतीची धुंदी चढली. एके दिवशी त्याने शीलेच्या हातातील अनंताचा दोर तोडून टाकला आणि त्यामुळे अनंत त्याच्यावर रागावला. कौंडिण्याचे सर्व वैभव गेले. त्याला पश्चाताप झाला आणि मग त्याच्या सहनशीलतेचा अंत पाहून अनंताने ब्राह्मणरुपात त्याला दर्शन दिले आणि पुन्हा व्रताचरण करण्यास सांगितले. त्यामुळे कौंडिण्याला पुन्हा वैभव प्राप्त झाले.

ही कथा साधारणपणे आपल्या सत्यनारायणाच्या कथेशी मिळतीजुळती असली तरी सत्यनारायणाच्या पूजेपेक्षा हे व्रत खूपच प्राचीन आहे यात शंका नाही. सत्यनारायणाची पूजा ही आपल्याकडे अलीकडे आली.

अनंत चतुर्दशीचे महत्त्व अधिक वाढविणारा योग म्हणजे उद्या गणेशोत्सवातील मूर्तीचे विसर्जन सगळीकडे थाटामाटात केले जाईल. जलाशयात मूर्ती विसर्जित करावयाच्या असा धर्मनियम असल्यामुळे समुद्र, नद्या, विहिरी अशा ठिकाणी गणेशभक्त वाजतगाजत जाऊन मूर्तीचे विसर्जन करतात. सगळीकडे आनंदाचा जल्लोष चालू असतो आणि अशा जल्लोषामुळे अनंत चतुर्दशी हा अनंताच्या व्रताचा दिवस आहे, ही गोष्ट फारशी कोणाच्या ध्यानातच येत नाही.

Article Source : Maharashtra Times - Year 2010 (- ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर )

नेत्यांनो 'हे' लक्षात घेऊन चाला..

कोणत्याही सोम्यागोम्याला पक्षात घ्या..पण निदान त्यांच्या या बदललेल्या निष्ठा कितपत सच्च्या आहेत ते किमान जाणुन घ्यायची तोशीस तरी घ्या..
छोटीशीच परीक्षा घ्या नुकत्याच पावन झालेल्या या सर्वांची..यापैकी कोणाला म्हणजे अगदी कोणालाही पुढील किमान पाच वर्षे ग्रामपंचायतीचे पण तिकीट देऊ नका..


त्यांना कार्यकर्ता म्हणून काम करू द्या..
 

आणि मग समजा जर ते चुकुनमाकुन टिकले तर खुशाल तिकीट द्या..मग ते भले लोकसभेचे असले तरी चालेल..
 

बाकी काही नाही पण एवढं तरी कराच...
जमेल का तुम्हाला ??

शिवाजी महाराज दिसायला कसे होते ? ( How was Raja Shivaji Maharaj looked ? )

शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष पाहिलेली अनेक माणसे त्यावेळी होती . पाश्चिमात्यात हेन्री ऑक्झेडन , निकालो मनुची , थेव्हनॉट , उस्टीक , इ. तर भारतीयात परमानंद , परकलदास इ. परंतू फारच थोड्या व्यक्तीँनी शिवरायांच्या व्यक्तिमत्वाबद्दल किँवा शारीरिक ठेवणीबद्दल प्रत्यक्षात नोँद करुन ठेवली आहे .
शिवछत्रपती कसे दिसत होते ...

इ.स. १६६४ मध्ये सुरतेच्या लुटीच्या वेळी वखारीतल्या इंग्रज अधिकारी एस्केलिऑट याने केलेले वर्णन-
"His personality is described by them , who have seen him , to be of mean stature (medium height) lower some what than i am (when) erect and of an excellent proportion . Actual in exercise ane whenever he speaks seems to smile , a quick and piercing eye and witter than any of his people."

अर्थ-
'शिवाजी आपल्या दक्षिणेकडील इतर मावळ्यांपेक्षा उजळ वर्णाचा असून मध्यम बांध्याचा आहे . त्याची मान व खांद्याचा भाग पुढे झुकलेला दिसतो ; परंतु शरीर मात्र अत्यंत प्रमाणबध्द आहे . कोणतीही गोष्ट नजरेत तत्काळ पकडणारी भेदक दूरदृष्टी हे त्याचे खास लक्षणीय वैशिष्ट्य आहे.'

इ.स. १६६६ साली फ्रेँच प्रवासी थेव्हनॉट वर्णन करतो ,
"This Raja is short and tawny , with quick eyes that shew a great deal of wit . He eats but ones a day commonly and is in good health ."

अर्थ-
"हा राजा ठेँगणा व पिवळसर गौर वर्णाचा आहे . नेत्र तेजस्वी असून बुध्दीमत्तादर्शक आहेत . तो दिवसातून फक्त एकदाच भोजन करतो आणि (तरीही) त्याची प्रकृती उत्तम आहे ."

इ.स. १६६६ मध्ये राजे आग्र्यात गेले असताना तिथे परकलदास याने राजांना पाहिले . तो लिहितो ,
" अर सेवाजी डेल तो हकीर छोटो सो ही देखता दीस जी । अर सुरती बहुत अजाइब गौरो रंग अपुछो राजवी देसौ जी । हिम्मती मरदानगी ने देखता ही असौ दिसो जू बहुत मरदानो हिम्मतबुलंद आदमी छो । सेवाजी के दाढी छै ।"

अर्थ-
" प्रथमदर्शी दिसण्यात शिवाजी हा बांध्याने किरकोळ आहे . पण त्याचा रंग विलक्षण गोरा आहे . त्याचे राजतेज असे की कोणीही त्याला पाहिले की आपोआपच वाटावे की हा राजाच असला पाहिजे . त्याची हिम्मत आणि मर्दुमकी पाहिली की हा बुलंद हिमतीचा मर्द माणूस असला पाहिजे असे वाटू लागते . शिवाजीला दाढी आहे ."

कॉस्मा द गार्द या पोर्तुगीजाने केलेले वर्णन (१६९५)
" With a clear and fair nature had given him the greatest perfections specially that they seemed to dart rays to fire . To these was added a quick , clear and acute intelligence."

अर्थ-
"राजांचा चेहरा मोहक होता . निर्सगाने त्याला असावी तशी चेहरेपट्टी दिलेली होती . विशेषतः त्याचे काळेभोर व विशाल नेत्र एवढे तेजस्वी होते की जणू त्यातून अग्निस्फुल्लिँग बाहेर पडत आहेत ."

राज्याभिषेकाप्रसंगी प्रत्यक्ष पाहून इंग्रज वकील हेन्री ऑक्झेडने शिवरायांचे लिहिलेले वर्णन-
"शिवाजी महाराज ४७ वर्षाचे असून देखणे होते . त्यांच्या चर्येवरुन त्यांची बुध्दीमत्ता व चाणाक्षपणा सहज ध्यानात येई . त्यांचा वर्ण इतर मराठ्यांपेक्षा पुष्कळच गौर होता . त्यांची दृष्टी तीक्ष्ण असून नाक सरळ व बाकदार होते . त्यांच्या दाढीस निमुळतेपणा असून मिशी बारीक म्हणजे विरळ होती . त्यांचे बोलणे निश्चयात्मक , स्पष्ट पण जलद होते ."

जय शिवराय !

हनुमान जन्मकथा

वाल्मीकि- रामायणामध्ये (किष्किंधाकांड, सर्ग ६६) पुढीलप्रमाणे हनुमानाची जन्मकथा दिली आहे : अंजनीच्या पोटी हनुमान जन्मला. जन्म झाल्यावर `उगवणारे सूर्यबिंब हे एखादे पक्वफळ असावे', या समजुतीने हनुमानाने आकाशात उड्डाण करून त्याकडे झेप घेतली. त्या दिवशी पर्वतिथी असल्यामुळे सूर्याला गिळण्यासाठी राहु आला होता. सूर्याकडे झेपावणारा हनुमान हा दुसरा राहुच आहे, या समजुतीने इंद्राने त्याच्यावर वज्र फेकले. ते हनुवटीला लागून ती छाटली गेली. यावरून त्याला हनुमान हे नाव पडले. या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून कीर्तनाला सुरुवात करतात. सूर्योदयाला कीर्तन संपते व हनुमानाचा जन्म होतो. त्यानंतर हनुमानाच्या मूर्तीची पूजा करतात व सर्वांना प्रसाद म्हणून सुंठवडा देतात. `हनुमान जयंती' या तिथीला मारुतीचे तत्त्व पृथ्वीवर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते. या दिवशी `श्री हनुमते नम: ।' हा नामजप जास्तीतजास्त केल्याने नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात कार्यरत असलेल्या मारुतित्त्वाचा आपल्याला लाभ मिळतो. जन्मत:च मारुतीने सूर्याला गिळण्यासाठी उड्डाण केले अशी जी कथा आहे, तीतून वायूपुत्र (वायूतत्त्वातून निर्माण झालेला) मारुति हा सूर्याला (तेजतत्त्वाला) जिंकणारा होता, हे लक्षात येते. पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या तत्त्वांत वायूतत्त्व हे तेजतत्त्वापेक्षा जास्त सूक्ष्म, म्हणजे जास्त शक्तीमान आहे. मुनीच्या आदेशानुसार अंजना वायुदेवाची आराधना करते. वायुदेव प्रसन्न होतात. स्वत:च तिच्या पोटी जन्म घ्यायचे आश्वासन देतात. काही वर्षे जातात. अंजनेला मूल होत नाही. ती तगमगते. भगवान शंकराची उपासना करते. काही वर्षे आराधना करते. शंकराची कृपा संपादन करते. शंकर स्वत:च तिचा मुलगा होण्याचे आश्वासन देतात. तिला मंत्र सांगतात. अंजना आसनमांडी घालून बसते. मांडीवर हाताची ओंजळ असते. शिवमंत्राचा जप करत असते. आकाशातून घार पायसपात्र घेऊन जात असते. अवचित सुसाट वादळ सुटते. झंझावाताने घार थरथरते. पंख आणि पात्र लटपटतात. पायसपात्र खाली पडते, ते नेमके अंजनेच्या ओंजळीत ! ती ध्यानस्थ असते. शंकराचा, वायूदेवाचा हा प्रसाद ती अतीव श्रद्धेने प्राशन करते. अंजनेला दिवस जातात. मुलगा होतो. चैत्र पौर्णिमा मंगळवारी सूर्योदयाला हनुमंताचा जन्म होतो

महापौर श्री. प्रभु ( Ex Mayor Suresh Prabhu Contact )

महापौर श्री. प्रभु   ( Ex Mayor Suresh Prabhu Contact )

२९, भानुकांत कॉम्प्लेक्स, आरेरोड, चेकनाका, गोरेगांव (पूर्व), मुंबई – ४०००६३
कार्यालयाचा दूरध्वनी – २९२७७०७४ / २९२७७०८४ 

भ्रमणध्वनी क्रमांक –९८२०७०२७७७

यावर लघुसंदेशाद्वारेअथवा त्यांचा वैयक्तिक ई-मेल आयडी spoffice@gmail.com

एका पिझ्झ्याची दुसरी बाजू

'जास्त कपडे धुवायला काढू नका', तिने म्हटले.
का बरे? तो म्हणाला.
'नाही, आपली काम वाली बाई २ दिवस येणार नाही'.
कशासाठी?
'गणपतीसाठी २ दिवस नातवाला भेटायला मुलीकडे जाणार आहे, असे बोलली'.
'ठीक आहे, नाही काढत जास्त कपडे धुवायला',
'आणि, हो, तिला गणपतीसाठी ५०० रुपये देते, सणासाठी बोनस म्हणून'.
'कशाला, आता दिवाळी आलीच, तेव्हा देऊया',.
'नाही रे, गरीब बाई ती, हौशेने नातवाकडे जातेय तर तिलाही बरे वाटेल', अन ह्या महागाई मध्ये त्यांच्या पगारात कसा सण साजरा करणार ते'?
'तू ना, खूपच भावनिक होतेस',
'नाही रे, काळजी करू नकोस', मी आजचा पिझ्झा खाण्याचा बेत रद्द करते', सहज ५०० रुपये उडतील त्या ८ पावाच्या तुकड्यामागे', ती हसत बोलली.
'वा वा, फार छान, तू पण शहाणी आहेस', आपल्या तोंडचा पिझ्झा तिच्या ताटात'.

३ दिवसानंतर
'काय मावशी, कशी झाली सुट्टी', त्याने कामवाल्या मावशीला विचारले.
'खूप छान झाली', ताईने ५०० रुपये दिले होते मला, सणाचा बोनस म्हणून',.

'मग जाऊन आली का नातवाकडे'?
'हो जाऊन आली, मस्त ५०० रुपये खर्च केले २ दिवसात'.

'म्हणजे काय केल नेमकं'?
'नातवासाठी बाजारातून १५० रुपयाचा ड्रेस घेतला अन ४० रुपयाची बाहुली, मुलीला छानपैकी ५० रुपयाचे पेढे घेतले, ५० रुपयाचा मंदिरात नैवद्य दिला, 60 रुपये रिक्षाभाडे, २५ रुपयाच्या मुलीला बांगड्या घेतल्या, ५० रुपयाचा जावईबापूसाठी बेल्ट अन उरलेले ७५ रुपये नातवाच्या हातात दिले'. तिने झाडू मारता मारता तत्काळ खर्च मांडला.
'५०० रुपयात इतके काही', तो आश्चर्याने म्हणाला अन विचार करू लागला.
त्याच्या डोळ्यासमोर ८ तुकडे केलेला पिझ्झा उभा राहिला. तो एकटक कल्पनेतल्या पिझ्झाकडे पाहू लागला. एक एक तुकडा त्याच्या डोळ्यामध्ये घुसू लागला. त्या एक एक पिझ्झाच्या तुकड्याशी तो कामवाल्या बाईच्या सणावरील खर्चाशी तुलना करू लागला.
पहिला तुकडा नातवाच्या ड्रेसचा, दुसरा पेढ्याचा, तिसरा तुकडा मंदिरातील नैवद्य, चौथा रिक्षाभाडे, पाचवा बाहुलीचा, सहावा मुलीच्या बांगड्याचा, सातवा तुकडा जावईबापूचा बेल्ट अन आठवा तुकडा नातवाच्या खाऊसाठी पैसे.
पिझ्झा त्याच्या डोळ्यासमोर फिरू लागला, एका तुकड्या मागे दुसरा तुकडा, अन तुकड्यावरील ड्रेस, बांगड्या अन तिचा सण.....
एका पिझ्झ्याची त्याला दुसरी बाजू आज दिसली होती. पिझ्झ्याचे ८ तुकडे त्याला काही शिकवून गेले होते, जगण्याचा अन खर्च करण्याचा नवीन अर्थ.

काळाचे रहस्य ...

काळाचे रहस्य
श्रीराम आणि रावण युद्धाचा शेवट..
घायाळ झालेला रावण शेवटच्या घटका मोजत होता. आणि इकडे रामाच्या छावणीत श्रीराम लक्ष्मणाला सांगत होते की, "त्वरीत रावणाकडे जा आणि त्याचे शिष्यत्व पत्करून'काळाचे रहस्य' आत्मसात कर" !!!
रामाच्या त्या बोलण्याने संभ्रमित झालेल्या लक्ष्मणाला शेवटी रामाने अक्षरश: आज्ञा केली की, हे लक्ष्मणा, शिघ्रता कर अन्यथा रावणाच्या अंता बरोबरच ते रहस्य सुध्दा कायमचे अंत पावेल.
मरणासन्न रावणाने सुध्दा काही आढेवेढे न घेता, आपल्याकडे आलेल्या लक्ष्मणाची विनंती स्विकारली.
त्याने लक्ष्मणाला सांगितले की त्वरीत पिंपळाची तीन पाने अन एक टोकदार काडी घेऊन ये.
लक्ष्मणाने तसे केल्यावर रावणाने पुन्हा सांगितले, आता ते तीनही पाने एकावर एक ठेव आणि एका झटक्यात ती काडी त्या पानांवर आरपार खोच.
लक्ष्मणाने तसे केले आणि काय आश्चर्य, काडीचे टोक ज्या पानातून प्रथम स्पर्ष करून गेले ते सोन्याचे झाले, मधले रुप्याचे झाले अन तिसरे आहे तसेच राहीले.
रावण म्हणाला, हे आहे काळाचे रहस्य. "क्षणमात्र जरी विलंब झाला तरी सोन्याचे रुपे होते. म्हणून जो क्षण हाती लागेल त्याचा क्षणमात्र ही विलंब न करता 'सोने' कर !"
आपणही काळाचे रहस्य ओळखून प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग करूया आणि त्याचे सोने करूया ...
आनंदी दिवसाच्या आनंदी शुभेच्छा मित्रांनो !!