Total Pageviews

Monday, December 2, 2013

परीस शोध

एक माणूस परीस ( पारस )
शोधायला निघाला....
त्यासाठी रस्त्यात जो दगडयेईल
तो घ्यायचा,
गळ्यातल्या साखळीला लावायचा आणि फेकू
द्यायचा असा त्याचा दिनक्रम सुरू
झाला दिवस
गेले... महिने लोटले... वर्षे सरली.... पण
त्याच्या दिनक्रमात बदल
झाला नाही ....दगड
घ्यायचा, साखळीला लावायचाआणि मग
तो फेकून द्यायचा.. शेवटी तो माणूस
म्हातारा झाला.... आणि ज्या क्षणि त
ो आपले शेवटचे श्वास मोजत
होता त्यावेळी अचानक त्याचे लक्ष
त्याच्या गळ्यातील साखळीकडे गेले...
ती साखळी सोन्याची झाली होती.....
दगड
घ्यायचा, साखळीला लावायचाआणि फेकून
द्यायचा या नादात त्याचे साखळीकडे
लक्षच
गेले नाही....
 

तात्पर्य:--
प्रत्येकाच्या जीवनातएकदा तरी परीस
येत
असतो... कधी आई- वडिलांच्या रूपाने,तर
कधी भाऊ- बहीनीच्या नात्याने... तर
कधी मित्राच्या मैत्रिणीच्या नात्याने ..
कोणत्या नाकोणत्या रूपात
तो आपल्याला भेटत
असतो... आणि आपल्यातल्या लोखंडाचे सोने
करीत असतो...... आपणजे
काही असतो किवा बनतो त्यात
त्यांचा बराच
हातभार असतो . पणफार कमी लोक
या परीसाला ओळखू शकतात..!

म्हणुन मला "जगायला" आवडते.

आहात तुम्ही 'सावरायला' म्हणुन
'पडायला' आवडते,

आहात तुम्ही 'हसवायला' म्हणुन
'रडायला' आवडते,

आहात तुम्ही 'समजवायला' म्हणुन
'चुकायला' आवडते,

माझ्या आयुष्यात आहेत तुमच्यासारखे "मित्र"
म्हणुन मला "जगायला" आवडते.

एक उकडीचा मोदक दुसर्‍या मोदकाला

एक उकडीचा मोदक दुसर्‍या मोदकाला भेटल्यावर काय म्हणेल ?
.
.
.
....
काय सॉल्लिड उकडतंय ना !!!


------

एका अट्टल दारुड्याला प्रश्ण विचारला...
"तुमचे आवडते कावि कोण?"
दारुडा.."मंगेश पाडगावकर."

"अरे वा ....त्यांची कोणति कविता आवडते?"

"झोपाळ्या वाचुन झुलायचे"...!!!


============
 

पुणेरी एकदम तिखट

पुणेरी एकदम तिखट..

पाहुणा : अहो camp ला जायला कुठली बस पकडू ??

पुणेरी : २० number ची पकडा. . .
.
पाहुणा : आणि ती नाही मिळाली तर. . ??
.
पुणेरी : १० १० च्या २ पकडा.....!!

एक भन्नाट जादू

एक भन्नाट जादू....

एका ग्लासमध्ये थंडगार पाणी घ्या.

ते आपल्या बाजूला असलेल्या माणसाच्या डोक्यावर ओता..

तो माणूस लगेच गरम होईल......

माणसा रे माणसा

पैसे नसतात तेव्हा
झाडपाला खाऊनही दिवस काढायची माणसाची तयारी असते.
पैसा आल्यावर
हाच झाडपाला तो हॉटेलात ऑर्डर करतो.

पैसे नसतात तेव्हा
माणूस सायकलने रपेट करतो,
पैसा आल्यावर मात्र
हीच सायकल तो जिममध्ये व्यायामासाठी चालवतो.

पैसे नसतात तेव्हा
रोजीरोटीसाठी त्याची पायपीट
चालू असते.
पैसे आल्यावर मात्र
हीच पायपीट तो चरबी कमी करण्यासाठी करतो.

माणूस स्वत:शीच प्रतारणा करीत असतो.
पत नसली तरी
लग्न करायला एका पायावर तयार असतो,
ऐपत असली की मात्र
त्याला घटस्फोट हवा असतो.

पैसे वाचवायला
तो कधी बायकोलाच आपली सेक्रेटरी बनवितो,
पुढे पैसा आला की
सेक्रेटरीलाच बायको सारखे वापरतो.

पैसे नसेल तेव्हा
तो असल्याचे सोंग आणतो,
पैसा असतो तेव्हा मात्र
कंगाल असल्याचे नाटक करतो.

माणसा रे माणसा...
तू वास्तव तरी कधी स्वीकारतोस?

तुमची स्वत:ची किंमत स्वत:च निर्माण करा

एकदा एक प्रवासी जोडपे एका बसमधून पर्वतीय प्रदेशातून
प्रवास करीत होते.
बराच प्रवास केल्यावर एका ठिकाणी त्यांनी बसमधून
उतरण्याचा निर्णय घेतला. ते प्रवासी
जोडपे उतरल्यावर बस पुन्हा सुरु
झाली आणि आपल्या मार्गाला लागली. काही अंतर
गेल्यावर त्या बसवर डोंगरातून गडगडत येणारा एक मोठा दगड
पडला आणि त्याने बसमधील
सगळ्या प्रवाशांचा मृत्यू ओढवला. हे दृश्य पाहून त्या बसमधून
उतरलेल्या प्रवासी
जोडप्याने म्हटले,......
अरेरे ! हे काय झाले. आम्ही त्या बसमध्ये असतो तर बरे
झाले असते.........
तुम्हाला काय वाटते, त्या जोडप्याने असे का म्हटले
असेल?..........
जरा डोके खाजवा ............
काय म्हणता डोके चालत नाही.
अरे ! अशी हार मानू नका.........
थोडे आणखी प्रयत्न करा. उत्तर नक्की सापडेल.
काय म्हणता उत्तर सापडत नाहीय.
ठीक आहे
उत्तर आहे..........
जर का ते जोडपे उतरण्याऐवजी त्या बसमध्येच असते, तर
त्याना जो उतरण्यासाठी वेळ
लागला तो न लागता, बस न थांबताच तशीच पुढे गेली असती.
म्हणजेच ती बस दगड पडण्याच्या वेळी तेथे नसती.
ती काही अंतर
पुढे गेलेली असती आणि म्हणूनच हा अपघाताचा प्रसंग आलाच
नसता.
याचाच अर्थ असा की जीवनामध्ये नेहमी सकारात्मक विचार
करा आणि दुस-यांना मदत
करण्यासाठी सदैव तत्पर रहा.
जीवनामध्ये बरेच वेळा यशाच्या विरोधी अपयश नसून,
हाती घेतलेले कार्य अर्धवट
सोडून जाणे असते. (म्हणजेच पलायन होय.)
विजेता कधीच पळून जात नाहीत आणि पळून जाणारे कधीच विजेते होत नाहीत.
काही गोष्ठी तुमच्या मनासारख्या घडतील याची वाट पाहू नका.
त्यासाठी झगडा,
झटापटी करा आणि त्या घडवून आणा.
तुम्हाला जीवनामध्ये किंमत मिळेल याची वाट पाहू नका.
तुम्ही तुमची स्वत:ची किंमत स्वत:च निर्माण करा!!!

17 camels and 3 sons...

A father left 17 camels as an asset for his three sons.

When the father passed away, his sons opened up the will. The Will of the father stated that the eldest son should get half of 17 camels while the middle son should be given 1/3rd (one-third).The youngest son should be given 1/9th (one-ninth) of the 17 camels.

As it is not possible to divide 17 into half or 17 by 3 or 17 by 9, three sons started to fight with each other.

So, the three sons decided to go to a wise man.
The wise man listened patiently about the Will. The wise man, after giving this thought, brought one camel of his own and added the same to 17. That increased the total to 18 camels.

Now, he started reading the deceased father’s will.
Half of 18 = 9. So he gave the eldest son 9 camels.
1/3rd of 18 = 6. So he gave the middle son 6 camels.
1/9th of 18 = 2. So he gave the youngest son 2 camels.

Now add this up: 9 plus 6 plus 2 is 17 and this leaves one camel, which the wise man took back.

MORAL: The attitude of negotiation and problem solving is to find the 18th camel i.e. the common ground. Once a person is able to find the common ground, the issue is resolved. It is difficult at times. However, to reach a solution, the first step is to believe that there is a solution. If we think that there is no solution, we won’t be able to reach any!

If you liked this story… please share with friends, family and children…
You might spark a thought, inspire and possibly change a life forever!!

क्या बात है...........

पुस्तकाची पाने पलटताना एक विचार
मनात येतो

आयुष्याची पाने अशीच पलटली तर
"क्या बात है" ...!!!

स्वप्नात अनेक गोष्टी पूर्ण होतात पण
खऱ्या आयुष्यात पूर्ण झाल्या तर
"क्या बात है"..!!!

काही लोक स्वार्था साठी शोधतात
मला पण
निस्वार्थीपणे कोणी शोधात आलं तर
"क्या बात है"...!!!

मन मारून काळीज कोणीही घेऊन जाईल
माझे पण
मन जिंकून काळीज नेणारा भेटला तर
"क्या बात है" ...!!!

जिवंतपणी तर सगळ्यांना
मी हसवत ठेवीन
पण...
.
.
.
.
.
.

माझ्या मरणावरही, कोण अश्रूत हसले तर
"क्या बात है" ...!!!

आत्माही माझा असाच हसत- हसत देईन
पण
त्या राखेतहि मला कोण शोधत बसले तर..

''क्या बात है ..."

आयुष्य

आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात यापेक्षा तुमच्या मुळे किती जण आनंदी आहेत ह्याला महत्व आहे..

जगातील दोन कठीण कामे---
(1) आपल्या डोक्यातील विचार दुस-याच्या डोक्यात उतरविणे.
(2) दुस-याच्या खिशातील पैसा आपल्या खिशात  आणणे.
* पहिल्या कामात हुशार  त्याला 'शिक्षक' म्हणतात.
* दुस-या कामात हुशार त्याला 'व्यापारी' म्हणतात.

* आणि दोन्ही कामात हुशार तिला 'बायको' म्हणतात.

आयुष्य म्हणजे काय..

निर्णय चुकतात आयुष्यातले आणि आयुष्य चुकत जाते,
प्रश्न कधी कधी कळत नाहीत आणि उत्तर चुकत जाते,
सोडवताना वाटतं सुटत गेला गुंता,
पण प्रत्येक वेळी नवनवीन गाठ बनत जाते,
दाखविणाऱ्याला वाट माहित नसते, चालणाऱ्याचे ध्येय मात्र हरवून जाते,
दिसतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी,
"अनुभव" म्हणजे काय हे तेव्हाच कळते...

असे मित्र बनवा जे कधीच साथ सोडणार नाही...
असे प्रेम करा ज्यात स्वार्थ असणार नाही..
असे हृद्य बनवा कि ज्याला तडा जाणार नाही...
असे हास्य बनवा ज्यात रहस्य असणार नाही...
असा स्पर्श करा ज्याने जखम होणार नाही...
असे नाते बनवा ज्याला कधीच मरण नाही...

फेसबुक वरील व्यक्ती तितक्या प्रवूत्ती

फेसबुक वरील व्यक्ती तितक्या प्रवूत्ती By Mr.Sudhir Vaidya
१. फेसबुक कोंबडा : यांना वाटते कि रोज सकाळी , " गुड मोर्निंग " ची पोस्ट टाकावी आणि लोकांना गुड मोर्निंग म्हणायला भाग पाडावे.
२. फेसबुक सिलीब्रीटी : हे फेसबुक ने दिलेली ५००० ची लिमिट पूर्ण वापरतात आणि खूप सारे अनोळखी लोकाना अड्ड करत सुटतात.
३. फेसबुक बाबा : हे फक्त देवाच्या पोस्ट टाकणार आणि प्रवचन करत सुटणार .
4. फेसबुक चोर : हे लोक दुसर्यांचे स्टेटस किवा पोस्ट चोरी करून , पटकन आपल्या नावावर टाकतात.
५ . फेसबुक देवदास : हे लोक नेहमी वेदनामय आणि निराशेच्या पोस्ट आणि कविता टाकतात. आणि आपले दुख जगाला दाखवून लोकांना पण दुखी करतात.
६. फेसबुक न्वूज रीडर : जागत काय चालू , ह्या न्यूज हे त्यांच्या स्टेटस मध्ये टाकून लोकांना न्यूज सांगत सुटतात.
७. फेसबुक टीकाकार : हे स्वता तर कधी पोस्ट करणार नाही, पण दुसर्याच्या चांगल्या पोस्ट जावून टीका करत सुटतात. जसे पोस्ट जुनी आहे, पोस्ट जमली नाही वगैरे वगैरे.
८. फेसबुक विदुषक : हे लोक त्यांच्या आयुष्यात किती पण दु:ख असले तरी सर्वांना कमेंट आणि पोस्ट मधून हसवत असतात.
९. फेसबुक लाईकर : हे लोक गुपचूप पोस्ट वाचून लाईक करतात. पण कमेंट करायला कधी येत नाही.
१०. फेसबुक कमेंटर : यांना कोणती पण पोस्ट असो पण आपण कमेंट मारली पाहिजे असे वाटत असते. आणि कमेंट मास्तर असतात.
११. फेसबुक विचारक : हे लोक चांगले चागले विचार आपल्या पोस्ट मधून लोकापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतात.
१२. फेसबुक कवी आणि कवियित्री : याना कविता सोडून काहीच जमत नाही. हे कविता टाकून लोकांना बोर करत असतात.
१३. फेसबुक टपोरी : हे लोक फेसबुक वर येतातच मुली पटवायला. दिसली मुलगी कि उठ सुठ फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत असतात. आणि कमेंट करत असतात. आणि मुलींच्या मागे लागतात.
१४. फेसबुक द्वेषी : ह्या लोकांना फेसबुक वर कोणाचीच प्रशंसा करणे जमत नाही. हे फक्त लोकानाचा द्वेष करतात आणि दुसर्या लोकांना त्रास देतात.
१५. फेसबुक च्याटर : यांना फेसबुक वर च्याट शिवाय काहीच सुचत नाही आणि जमत पण नाही,
१६. फेसबुक भिकारी : या लोकांची फ्रेंड रिक्वेस्ट ब्लोक असते म्हणून उठ सुठ मला अड्ड करा म्हणून लोकांना भिक मागत फिरत असतात.
१७ . फेसबुक लिंग परिवर्तक : हे लोक वेगळ्या लिंगाचे प्रोफाईल काढून फिरत असतात. मुल मुलीचे प्रोफाईल काढतात आणि मुली मुलाचे प्रोफाईल काढतात.
१८. फेसबुक खेळाडू : हे लोक दिवसभर फेसबुक वर गेम्स खेळत बसतात.
१९. फेसबुक माकड : हे कमेंट मध्ये काहीच बोलत नाही फक्त हा हा ........ हि हि करत असतात.
२० . फेसबुक कलेक्टर : हे फक्त फेसबुक वर पेज आणि ग्रुप जाईन करतात पण कधी पोस्ट किवा कमेंट करत नाहीत. तर फक्त ग्रुप आणि पेज कलेक्ट करत असतात.

सौजन्य: दिलीप पटवर्धन

पत्नी प्रसन्न व्रत

पत्नी प्रसन्न व्रत

संसारात पत्नीच्या त्रासाला कंटाळलेला चंद्रसेन मार्गदर्शन घेण्यासाठी सोमदत्त या अनुभवी गुरुकडे गेला, तेव्हा सोमदत्ताने त्यास ‘पत्नी प्रसन्न व्रता’ची माहिती सांगितली. तो म्हणाला-
हे चंद्रसेना, मी आज तुला पत्नी प्रसन्न व्रताची सविस्तर माहिती सांगणार आहे. ती तू भक्तिभावाने श्रवण कर. या व्रताचे पालन करणार्‍याचा संसार सुखाचा होतो याबद्दल शंका बाळगू नकोस. या व्रतामध्ये पत्नीला प्रसन्न ठेवण्यासाठी करावयाचे विधी सांगितले आहेत. सर्व वयोगटातील विवाहित पुरुषांना हे व्रत करता येईल. या व्रतासाठी साधकाने आपली मनोदेवता आपली पत्नीच आहे, हे मनावर बिंबविणे आवश्यक आहे. अशा प्रकारची भूमिका एकदा निश्चित केली, की मग या देवतेला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करावा. प्रातःकाली पत्नीदेवतेचे दर्शन घेऊनच कार्याला लागावे. निद्रादेवतेने बहाल केलेल्या सुखाची रक्तिम कांती असणार्‍या या देवतेचे रूप प्रातःस्मरणीय असते. हे रुपडे मनात साठवून ठेवल्यास दिवसभर कार्यरत राहण्यासाठी ऊर्जा मिळते आणि शारीरिक विश्रांतीची गरज उरत नाही. श्रमाला प्रतिष्ठा देणारी ही देवता आहे हे समजून घे.

या व्रतामध्ये, पतीने पत्नीआधी जागे होणे आवश्यक आहे. पत्नीदेवीच्या सेवेसाठी रात्री गोंधळ घातला असेल, तरी पहाटे तिच्या झोपेत व्यत्यय येणार नाही याची जरूर काळजी घ्यावी. सर्वप्रथम अंथरूण, पांघरूण, उश्या इत्यादी वस्तू व्यवस्थित घड्या घालून निर्दिष्ट करण्यात आलेल्या जागेवर ठेवून द्याव्यात. पत्नीदेवतेचा स्वतःचा अवतार कसाही असला, तरी भक्त मात्र अजागळ असणे तिला आवडत नसते. यास्तव सेवकाने दाढी, आंघोळ आदी प्रातःकालीन कार्ये ती जागी होण्यापूर्वी पूर्ण करावीत आणि संपूर्ण शुचिर्भूत होऊन, प्रसन्न मुखकमलाने तिला जागे होण्याची विनंती करावी. अशा वेळी फाजील लाडात येणे, म्हणजे स्वतःच्या अपमानाला निमंत्रण होय, हे पक्के ध्यानात ठेवावे. मुखप्रक्षालन वगैरे करून पत्नी तयार होताच चहा करते. कारण, अशा चवीचा आणि मनाला व शरीराला चैतन्य प्राप्त करून देणारा चहा फक्त तिला (आणि तिच्या आईलाच) येतो, यावर उपासकाचा विश्वास असावा. रोज पत्नीच्या हातचा चहा घेताना, ‘तुझ्या हातचा चहा म्हणजे… व्वा!… क्या बात है! ‘ हे वाक्य कंटाळा न करता रोज म्हणावे. या वाक्याचा सराव होण्यासाठी सर्रास खोटे बोलता येणे आवश्यक आहे. असा चहा घेतल्यानंतर मनास चैतन्य येवो अथवा न येवो, परंतु शरीराच्या पोट नावाच्या अवयवाची चेतना जागृत होते आणि पायांना हालचाल करून घरातील कोपरा गाठण्यासाठी धावाधाव करावी लागते. तिच्या हातचा चहा घेताच तत्काळ ओक्के.. होत असले, तरी परतताच ‘ तुझ्या हातचा चहा म्हणजे… व्वा!.. क्या बात है! ‘ असे मनापासून म्हणावे.
यानंतर ती साफसफाई, स्वयंपाक इत्यादी कष्टाची कामे करत असताना, आसपास घोटाळत तिच्या आई-वडिलांचा विषय काढावा. तिच्या वडिलांच्या आयुष्यातील कर्तृत्वाच्या गोष्टींचा उल्लेख करावा. त्यांच्या निर्णयामुळे आपल्या आयुष्याचे तीन-तेरा वाजलेले असले, तरी त्यांचे निर्णय किती अचूक असतात याचे कौतुक करावे.

यानंतर पत्नीच्या आईच्या गृहकृत्यदक्षतेची चर्चा करावी. खरे तर तुझ्या आईचे नाव सीता, तारा, मंदोदरी, अहिल्या, द्रौपदी या पंचकन्यांच्या जोडीनेच घेणे आवश्यक आहे असा सूर लावावा. अशा चर्चेने स्वयंपाक चविष्ट होत असतो आणि ती व्रताच्या योग्य दिशेची पावती असते.
या व्रताचा भाग म्हणून, दररोज पत्नीच्या आई-वडिलांचे कौतुक केले तर व्रताचे रहस्य तिला समजून येऊ शकते आणि आपला कावा तिच्या लक्षात येऊ शकतो.

दुसर्‍या दिवशी, तिचे भाऊ कर्तृत्ववान आहेत पण त्यांना बायका ‘ काहीतरीच ‘ मिळाल्या आहेत अशी प्रस्तावना करावी. बाकीचा प्रबंध ती पूर्ण करते.

तिसर्‍या दिवशी ‘ तिच्या जावा आणि दीर ‘ यांच्या वागण्यामधील खोड्यांची चर्चा करावी, बाकीचा प्रबंध ती पूर्ण करते.

चवथ्या दिवशी ‘ आपले आई-वडील ‘ याविषयी चर्चेला सुरुवात करून द्यावी. बाकीचे व्याख्यान पूर्ण करण्याएवढा मसाला तिच्याकडे असतो.

पाचव्या दिवशी आपल्या बहिणी तथा तिच्या नणंदांचा विषय काढावा. त्या ‘ कित्ती कज्जाग ‘ आहेत यविषयी ती सहज माहिती पुरविते.

सहाव्या दिवशी पुन्हा तिचे आई-वडील या विषयावर यावे आणि याच क्रमाने दररोज चर्चा करून तिला प्रसन्न आणि स्वयंपाक रुचकर करून घ्यावा.

दिवस असा आल्हाददायक गेल्यानंतर सायंकाळ फार महत्त्वाची असते. दररोज सायंकाळच्या खर्चासाठी अतिरिक्त निधीची व्यवस्था करून ठेवावी. शहरातील विविध बागांमध्ये आलटून पालटून जात जावे. पाणी-पुरी, पाव-भाजी, रगडा-पॅटीस, छोले-भटूरे वगैरे जोडीदार पदार्थ खावेत, म्हणजे आपली जोडीदारीण प्रसन्न होते आणि त्याचा प्रत्ययही लगेच येत असतो. बागेत जाण्याचे इतरही अनेक फायदे असतात. इतर महिलांची वेषभूषा अणि केशभूषा यांचा अभ्यास करण्याची संधी पत्नीला मिळत असते. साड्यांमधील नवीन पोत, मंगळसुत्रांचे डिझाईन्स, ब्लाऊझच्या बाह्यांमधील चित्र-विचित्र फॅशन्स, सँडलींची उंच किंवा कमी हिल, जरदोजी वर्कमुळे आलेला उठाव, मॅचिन्ग टिकल्यांचे बाजारात आलेले नवनवीन आकार आणि प्रकार. कर्णभूषणांमधील नावीन्य, भांगामध्ये लावायच्या सिंदुराची लांबी, पंजाबी, पतियाळा, पॅरलल या वस्त्र-प्रावरणांमधील शॉर्ट, मिडियम, लाँग प्रकार इत्यादी समकालीन परिवर्तनाची चाहूल गार्डनमध्ये लागत असते. या विविध प्रकारांमधील आपण नेमके कोणते उचलायचे याचा अभ्यास पत्नी यावेळी करू शकते. अशा अभ्यासाचा एक वेगळाच आनंद तिच्या चेहर्‍यावर दृग्गोचर होतो. अशा वेळी स्वतःच्या पोटात खर्चाच्या भितीने गोळा उठला, तरी चेहर्‍यावर मात्र प्रशंसेचे भाव असणे आवश्यक आहे, हे साधकाने विसरता कामा नये. एखाद्या नवविवाहितेकडे पाहून पत्नीने नाक मुरडले, तर आपणही आपले नाक तीनशे साठ अंशाच्या कोनातून मुरडले पाहिजे. पण बागेमध्ये फिरताना तुझे डोळे भिरभिरते नसावेत. साधकाची नजर स्थिर आणि केवळ आपल्या आराध्य देवतेवरच असणे आवश्यक आहे. क्वचित कधी ‘ मन वढाय वढाय ‘ झाले, तरी नजरेच्या वारूंना संयमाचा आवर घालणे आवश्यक आहे. अन्यथा या घटकेपावेतो केलेल्या व्रतपालनाचा नाश होऊ शकतो.

याशिवाय जेवताना छान, झक्कास, व्वा.. सुरेख.. अशा उद्गारवाचक शब्दांचा सढळ हाताने वापर करावा म्हणजे तितक्याच सढळ हाताने पदार्थ ताटामध्ये येत असतात. ‘ तुझ्या हातच्या जेवणाची चव कोणत्याही हॉटेलमधील जेवणाला नाही ‘ हे म्हटले तर खरे आणि म्हटले तर तद्दन खोटे वाक्य सर्रास वापरावे. हेच वाक्य हॉटेलमध्ये जेवायला जाण्याची वेळ आली, तर तिथेही खुबीने वापरता येते.
हे चंद्रसेना, वरीलप्रमाणे पत्नी प्रसन्न व्रताचे जो निष्ठेने पालन करील, त्याच्या संसारामध्ये शांतता आणि सौख्य सदैव नांदत राहील याबद्दल तू निःशंक रहा. असे संसार घटस्फोटांपासून शेकडो योजने दूर राहतील. अशा घरांमधील संतती आज्ञाधारक, शिस्तप्रिय आणि आदर्श नागरिक होईल.

या व्रताचे पालन न केल्यास, तशा संसाराचे गलबत दिशाहीन होऊन किनार्‍यावरील खडकावर आदळून त्याचे तुकडे होण्यास वेळ लागणार नाही हे निश्चित!

सौजन्य: विवेक नातू

अपुर्णतेत मजा आहे....

जगातील कुठलीच गोष्ट परिपुर्ण नाही. परमेश्वरानं सोनं निर्माण केलं. चाफ़्याची फ़ुलं सुद्धा त्यानंच निर्माण केली. मग त्याला सोन्याला चाफ़्याचा वास नसता का देता आला ? अपुर्णतेतही काही मजा आहेच की..

सोन्याकडून सुवासाची अपेक्षा मुळीच नाही, पण कमीतकमी सोन्याचे गुणधर्म तरी पूर्णत्वाने हवेत की नाहीत ?
अपुर्णतेत मजा आहे; पण माणूस ते कुठपर्यंत मानतो? जोपर्यंत ती अपुर्णता त्याच्या वाट्याला येत नाही तोपर्यंतच.

माणसं कृती विसरतात , पण हवेत विरणारे शब्द मात्र धरून ठेवतात...

आपण हरवण्यासारखं आयुष्यात जरूर घडायला हवं , कारण अशा स्थळावरून परतताना माणूस ’माणूस’ राहत नाही, तर परतून येतं ते चैतन्य..

वार्याने उडवून दिलेल्या पाचोळ्याला आपण कुठे पडावं,कसं पडावं, जमिनीवर पडावं की पाण्यावर पडावं असं काही मत असतं का ?

ओळखी केल्याने सौख्याइतकाच त्रास पण होतो. एखाद्याची ओळख होते व नाविन्याला चटावलेले माणसाचे मन त्या ओळखीचाच विचार करत बसते , शेवटी ही ओळख इतकी वाढत जाते की त्या ओळखीचेच बंधन होते आणि कोणत्याही कारणाने त्या व्यक्तीच्या वागण्यात काही फ़रक झाला की आपण त्याचीच काळजी करत बसतो की " आता हा असा का वागला ?"

पाठीला चमत्कारिक ठिकाणी खाज सुटावी , आपला हात वर पोहचत नाही व दुसर्याला नक्की जागा सापडत नाही अशी अवस्था जीवनात ही बर्याचदा होते..

माझ्या वडिलांनी जे सांगितलं ते लिहिलं ते लिहिताना माझ्याकडून काही चूक झाली असेल तर माफी करावी......

सौजन्य : मयुरी नेरूरकर.