Total Pageviews

Friday, July 18, 2008

मी तिला विचारलं -मंगेश पाडगांवकर

मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं.......

तुम्ही म्हणाल , यात विशेष काय घाडलं?
त्यालाच कळेल, ज्याचं असं मन जडलं........

तुमचं लग्न ठरवुन झालं?
कोवळेपण हरवुन झालं?
देणार काय? घेणार काय?
हुंडा किती,बिंडा किती?
याचा मान,त्याचा पान
सगळा मामला रोख होता,
व्यवहार भलताच चोख होता..
हे सगळं तुम्हाला सांगुन तरी कळणार कसं
असलं गाणं तुमच्याकडं वळणार कसं...

ते सगळं जाउ द्या, मला माझं गाणं गाउ द्या..
मी तिला विचारल,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं.......

त्या धुंदीत,त्या नशेत, प्रत्येक क्षण जागवला,
इराण्याच्या हॉटेलात,
चहासोबत मस्कापाव मागवला
तेवढीसुद्धा ऐपत नव्हती,असली चैन झेपत नव्हती,
देवच तेव्हा असे वाली,खिशातलं पाकीट खाली
त्या दिवशी रस्त्याने सिंहासारखा होतो हिंडत
पोलिससुद्धा माझ्याकडे आदराने होते बघत
जीव असा तरंगतो तेव्हा भय असणार कुठलं?

मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं.......

मग एक दिवस,

चंद्र, सुर्य, तारे, वारे,
सगळं मनात साठवलं,
आणि थरथरणाऱ्या हातांनी ,
तिला प्रेमपत्रं पाठवलं
आधिच माझं अक्षर कापरं
त्या दिवशी अधिकचं कापलं
रक्ताचं तर सोडाच राव
हातामधलं पेनसुद्धा होतं तापलं
पत्र पोस्टात टाकलं आणि आठवलं,
पाकिटावर तिकिट नव्हतं लावलं
पत्रं तिला पोचलं तरिसुद्धा
तुम्हाला सांगतो,
पोष्टमन तो प्रेमात पडला असला पाहिजे,
माझ्यासारखाच त्याचासुद्धा कुठेतरी जीव जडला असला पाहिजे

मनाच्या फ़ांदीवर,
गुणी पाखरु येउन बसलं

मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं......

पुढे मग तिच्याशिच लग्नं झालं,मुलं झाली,
संगोपन बिंगोपन करुन बिरुन शिकवली
मी तिच्या प्रेमाखातर नोकरीसुद्धा टिकवली...

तसा प्रत्येकजण नेक असतो,
फ़रक मात्र एक असतो
कोणता फ़रक?

मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं....... -मंगेश पाडगांवकर

तिथे आता कुणी रहात नाही

पाया ढासळलेला पिंपळाचा पार
ओढ्याच्या पल्याडचं चौसोपी घर,
कुत्रही त्याच्या वाटयाला जात नाही
कारण तिथे आता कुणी रहात नाही

घुसण्याची हिम्मतच नाही कुणाची
एका भणालेल्या वाऱ्याशिवाय..
तोही अधून मधून धुडगूस घालतो..
मन मानेल तस्सा.. दारू पिल्यागत…
पिचलेल्या भिंतीवर धडका मारतो..
माजलेल्या मस्तवाल बोकडागत…
त्याला पुर्वीचा माळी अडवत नाही
कारण तिथे आता कुणी रहात नाही

मोडकळीस आलेला लाकडी जीना
त्याला अगदी मोजक्याच पायऱ्या…
त्यातही दोनचार पेकाट मोडलेल्या..
खिळ्यावर अधांतरी लोंबलेल्या..
लाचार दिनवाण्या..आश्रितासारख्या..
जीना खाली येतो..पण वर जात नाही..
कारण तिथे आता कुणी रहात नाही

वर्षातून फ़क्त एकदा वाडा जिवंत होतो..
हसण्या खिदळण्याचा आवाजही येतो…
चांदण्यात रातराणीचा सुवास दरवळतो..
वळचणीचा निपचीत सापही वळवळतो..
चुलीची उष्णता त्यादिवसापुरती टिकते
सून तिच्यावर श्राद्धाची पोळी भाजते..
कणिकदिव्याला तेल मात्र मिळत नाही
कारण तिथे आता कुणी रहात नाही

>>>>>भूपेश ( २००८-०७ )<<<<<<<



.

Wednesday, July 16, 2008

आयुष्य खूप सुंदर आहे

आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसलं तरी,
एकट्यानेच ते फुलवत रहा,
वादळात सगळं वाहून गेल,
म्हणुन रडत बसू नका,
वेगळ अस काही,
माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नका
मृगाकडे कस्तुरी आहे,

फुलात गंध आहे,
सागराकडे अथांगता आहे,
माझ्याकडे काय आहे, असं म्हणून रडू नका,
अंधाराला जाळणरा एक सूर्य तुमच्यातही लपला आहे.
आव्हाहन करा त्या सूर्याला!!!!!
मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन.
अंधारामय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजून
मग रोजच उगवेल एक नवी सकाळ,
उत्साह ध्येयाने भारुन म्हणून म्हणते.........
आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसल तरी
एकट्यानेच ते फुलवत रहा…..

Tuesday, July 15, 2008

तरीसुद्धा ----------- मंगेश पाडगांवकर

समूहात बसून ही गाणी
ऎकावीशी वाटली तर
त्यात काय चूक आहे ?
शब्दांचं नादरूप
असं मिळून भोगणं ही
प्रत्येकाची अटळ अशी भूक आहे !

तरीसुद्धा डोळे मिटून
मनोमय तालावर
आपल्यालाच मनात नाचता आलं पाहिजे;
एकटं बसून एकट्याने
प्रत्येक गाणं
आपल्याच मनात वाचता आलं पहिजे !

----------- मंगेश पाडगांवकर




भेट तुझी माझी स्मरते - मंग॓श पाडगांवकर

भेट तुझी माझी स्मरते, अजुन त्या दीसाची
धुंद वादळाची होती, रात्र पावसाची ॥ध्रु॥

कुठे दीवा नव्हता, गगनी एकही ना तारा
आंधळ्या तमातुन वाहे , आंधळाच वारा
तुला मुळी नव्हती बाधा, भीतीच्या वीषाची ॥१॥
धुंद वादळाची होती, रात्र पावसाची.....

क्षुद्र लौकीकची खोटी झुगारुन नीती
नांव्गांव टाकुन आली अशी तुझी प्रीती
तुला परी जाणीव नव्हती तुझ्या साहसाची ॥२॥
धुंद वादळाची होती, रात्र पावसाची.....

केस चींब ओले होते, थेंब तुझ्या गाली
ओठांवर माझ्या त्याची कीती फुले झाली
श्वासांनी लीहीली गाथा प्रीतीच्या रसाची ॥३॥
धुंद वादळाची होती, रात्र पावसाची.....

सुगंधीच हळव्या शपथा, सुगंधीच श्वास
स्वप्नांतच स्वप्न दीसावें तसे सर्व भास
सुखालाही भोवळ आली मधुर सुवासाची ॥४॥
धुंद वादळाची होती, रात्र पावसाची

भेट तुझी माझी स्मरते, अजुन त्या दीसाची
धुंद वादळाची होती, रात्र पावसाची

- मंग॓श पाडगांवकर

इतके दुर होतो? ---- मंगेश पाडगावकर

आठ ऒळी
इतके दुर होतो???खरेच ठाऊक नव्हते,
रितेच होते विणलेले श्वासांचे घरटे???
निसर्गक्रमाची सोयिस्कर साधनेच नुसती????
जवळपणात कधीच घडले नाही मोती???

सावल्यांच्या अफवांत दोन झाडे उभी राहीली,
पाने आली आणी पाने गळून गेली:
चंद्र उगवला जेव्हा रिकाम्या फांद्यांमागे
डोळ्यात बाहुल्यांत कुणीच नव्हते जागे.
---------------------मंगेश पाडगावकर


जीव भरुन तुझे व्हावे एकदा. ---------- मंगेश पाडगावकर.

जीव भरुन पहावे तुला एकदा
रानाच्या बरगड्यातून पळस पेटताना.
पाण्याच्या रिकाम्या चेहेऱ्याच्या
शुभ्र शुभ्र कळ्या होताना.

जीव भरुन पहावे तुला एकदा
अनिवार हाक प्राणात भरुन:
मोर अंधाराचा थुईथुई भिजताना
पिसाऱ्याचे उधळे आभाळ करुन.

जीव भरुन पहावे तुला एकदा
कळ्यांच्या पहाटे,फुलांच्या सकाळी;
काजव्यांच्या लिपीतले झुलते गाणे
मिटल्या डोळ्यात ओलावताना कधी काळी.

जीव भरुन पहावे तुला एकदा.
जीव भरुन तुझे व्हावे एकदा.
---------- मंगेश पाडगावकर.

एकमेकांशिवाय. मंगेश पाडगावकर.

एकामेकांशिवाय
आपण असतो उभे एकमेकांजवळ एकमेकांशिवाय.
तरीही ओळखतो भुकेचा वास.इच्छांचे वळसे.
हिशोब करीत करीत जपुनच घसरतो.
गरजांच्या मिठयांनी गरजाच प्रसवतो.
आणि यातले नसते काहिच आपल्या स्वाधीन.
एकमेकांजवळ. एकमेकांना. एकमेकाने.एकमेकांहून.
एकमेकांआत : एकमेकांशिवाय.

असेच बसतात प्रत्यय स्वार होऊन सगळे उपाशी भाषेवर :
आणि असा चालतो आशयाचा प्रवास.
एकदाच अवलिया भाषेच्या देशातुन परागंदा होतो:
अज्ञात काळोखांतला अचानक पाऊस शब्दहीन एकांतात फांदि होऊन पितो:
त्याला आपण पुरतो : दैनिक पेपरांच्या डोंगर रद्दीखाली.
पों पों पीं पीं ट्रिंग ट्रिंग खट खट हैलो हैलो एकमेकांजवळ.एकमेकाना.एकमेकाहून.एकमेकांआत : एकमेकांशिवाय.
मंगेश पाडगावकर.

हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो... -मंगेश पाडगांवकर

हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...



आपलं जे असतं;
ते आपलं असतं
आपलं जे नसतं;
ते आपलं नसतं
हसतं डोळे पुसुन आतुन फळासारखं पीकलो
हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...


आलेला मोहोर;
कधी जळुन जातो
फुलांचा बहर;
कधी गळुन जातो
पुन्हा प्रवास सुरु केला, जरी चालुन थकलो
हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...


कधी आपलं गाव;
आपलं नसतं
कधी आपलं नाव;
आपलं नसतं
अश्या परक्या देशात वाट नाही चुकलो
हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...


पींजऱ्यात कोंडुन;
पाखरं आपली होत नाहीत
हात बांधुन;
हात गुंफले जात नाहीत
हे मला कळलं तेंव्हा हरुन सुध्दा जींकलो
हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...


झाड मुकं दीसलं तरी;
गात असतं
न दीसणाऱ्या पावसात;
मन न्हात असतं
कळोखावरं चांदण्याची वेल होऊन झुकलो
हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...


-मंगेश पाडगांवकर

शुक्रतारा मंद वारा -- मंगेश पाडगावकर

शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातूनी
चंद्र आहे स्वप्न वाहे धुंद या गाण्यातूनी
आज तू डोळ्यांत माझ्या मिसळुनी डोळे पहा
तू अशी जवळी रहा ॥ १ ॥

मी कशी शब्दांत सांगू भावना माझ्या तुला?
तू तुझ्या समजून घे रे लाजणाऱ्या या फुला
अंतरीचा गंध माझा आज तू पवन वाहा
तू असा जवळी रहा ॥ २ ॥

लाजऱ्या माझ्या फुला रे गंध हा बिलगे जिवा
अंतरीच्या स्पंदनाने अन् थरारे ही हवा
भारलेल्या या स्वरांनी भारलेला जन्म हा
तू अशी जवळी रहा ॥ ३ ॥

शोधिले स्वप्नात मी ते ये करी जागेपणी
दाटूनी आलास तू रे आज माझ्या लोचनी
वाकला फ़ांदीपरी आता फुलांनी जीव हा
तू असा जवळी रहा ॥ ४ ॥

प्रेम करणं सोपं नसतं... Mangesh Padgaonkar

प्रेम करणं सोपं नसतं...
सर्व करतात, म्हणून करायच नसतं..
चित्रपटात बघीतलं, म्हणून करायच नसतं...
पुस्तकात वाचलं , म्हणून करायच नसतं...
तर कुणाकडून ऐकलं, म्हणून करायच नसतं...
कारण प्रेम करणं सोपं नसतं...
शाळा कॉलेजांत असच घडतं...
एकमेकांना बघीतलं की मन प्रेमात पडतं...
अभ्यासाच्या पुस्तकात मग तिचच रुप दिसतं...
जागेपणी ही मग प्रेमाचं स्वप्नं पडतं...
ज्या वयात शिकायचं असतं त्यावेळी भलतचं घडतं...
करीयरचं सत्यानाश तर आयुष्याचं वाटोळं होतं...
सहाजीकचं मग आईवडीलांच्या ईच्छांवर पाणी पडतं...
कारण प्रेम करणं सोपं नसतं...
हॉटेल सिनेमागृहात नेहमी जावं लागतं...
पैशाचं बजेंट नेहमी बनवावं लागतं...
फोन कडे नेहमी लक्श ठेवावं लागतं...
मग जागेपणीही स्वप्न दिसायला लागतं...
डोक्याला ताप होऊन डोक दुखायला लागतं...
आनंद कमी दुःख जास्त भोगावं लागतं...
एवढ सगळं करणं खुप कठीण असतं...
कारण प्रेम करणं सोपं नसतं...

खाली डोकं, वर पाय ! -- मंगेश पाडगावकर

जेव्हा तिला वाटत असतं, तुम्ही जवळ यावं
जवळ यावं याचा अर्थ, तुम्ही जवळ घ्यावं !
अशा क्षणी चष्मा पुसत, तुम्ही जर शुद्ध काव्य बोलत बसला,
व्यामिश्र अनुभूती, शब्दांनी तोलत बसला !
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !
जेव्हा ती लाजत म्हणते, “आज आपण पावसात जायचं”
याचा अर्थ चिंब भिजून, तिला घट्ट जवळ घ्यायचं,
भिजल्यामुळे खोकला होणार, हे तुम्ही आधीच ताडलंत,
भिजणं टाळून खिशातून, खोकल्याचं औषध काढलंत !
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !
तिला असतो गुंफायचा, याच क्षणी श्वासात श्वास,
अनंततेवर काळाच्या, तुमचा असतो दृढ विश्वास,
तुम्ही म्हणता थांब जरा,
आणि होता लांब जरा,
तुम्ही चिंतन करीत म्हणता, “दोन श्वासांमध्ये जे अंतर असतं,
काळाच्या पकडीत ते कधीसुद्धा मिळत नसतं !”
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !
भाषेच्या ज्ञानाने तर, तुम्ही महामंडित असता,
व्याकरणाचे बारकावे, त्याचे तुम्ही पंडित असता,
ती ओठ जवळ आणते, व्याकरणात तुम्ही शिरता,
ओठ हे सर्वनाम? त्याचा तुम्ही विचार करता !
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !



-- मंगेश पाडगावकर

प्रेम म्हणजे प्रेम असतं !! मंगेश पाडगांवकर

प्रेम म्हणजे प्रेम असतं

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणी आमचं अगदी 'सेम' असतं !

काय म्हणता ?
या ओळी चिल्लर वटतात
काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात ?

असल्या तर असू दे,
फसल्या तर फसू दे !

तरीसुद्धा
तरीसुद्धा,

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणी आमचं अगदी 'सेम' असतं !

मराठीतून इश्श म्हणून
प्रेम करत येतं;
उर्दुमधे इश्क म्हणून
प्रेम करता येत;
व्याकरणात चूकलात तरी
प्रेम करता येतं;
कोन्वेंटमधे शिकलात ती
प्रेम करता येतं !

सोळा वर्ष सरली की
अंगात फुलं फुलू लगतात
जागेपणी स्वप्नांचे
झोपाळे झुलू लगतात !

आठवतं ना ?
तुमची आमची सोळा जेव्हा,
सरली होती,
होडी सगळी पाण्याने भरली होती !

लाटांवर बेभान होऊन
नाचलो होतो,
होडी सकट बूडता बूडता
वाचलो होतो !

बुडलो असतो तारीसुद्धा चाललं असतं :
प्रेमानेच अलगद वर काढलं असतं !

तुम्हाला ते कळलं होतं,
मलासुद्धा कळलं होतं !

कारण
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणी आमचं अगदी 'सेम' असतं !

प्रेमबीम झूट असतं
म्हणणारी मणसं भेटतात,
प्रेम म्हणजे स्तोम नुसतं
मानणारी माणसं भेटतात !

असाच एक जण
चक्क मला म्हणाला:
"आम्ही कधी बायकोला
फिरायला नेलं नाही !

पाच मुलं झाली तरी
प्रेमबी कधीसुद्धा केलं नाही !
आमचं काही नडलं का ?
प्रेमाशिवाय अडलं का ? "

त्याला वाटलं मला पटलं !
तेव्हा मी इतकंच म्हणलं :

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणी आमचं मात्र 'सेम' नसतं !

तिच्या सोबत पावसात कधी
भिजला असाल जोडीने !
एक चोकलेट अर्ध अर्ध
खाल्लं असेल गोडीने !

भर दुपारी उन्हात कधी तिच्या सोबत
तासनतास फिरला असाल
झंकारलेल्या सर्वस्वाने
तिच्या कुशीत शिरला असाल !

प्रेम कधी रुसणं असतं
डोळ्यांनीच हसणं असतं,
प्रेम कधी भांडतंसुद्धा !!

दोन ओळींची चिठ्ठीसुद्धा प्रेम असतं,
घट्ट घट्ट मिठीसुद्धा प्रेम असतं,
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं !!

मंगेश पाडगांवकर

फसलेली प्रेमकहाणी!!

फसलेली प्रेमकहाणी!!

नाही वाटले कधीही
कुणा दुसऱ्यावरती झुरावे
तुझ्या नकाराने का माझे
जन्मांचे प्रेम सरावे?

नसते काही कळ्यांच्या
नशिबी भाग्य फ़ुलाचे
म्हणूनी का वेड्या कळ्यांनी
जन्म घेण्याचे थांबावे?

खचलो जरी मी आज
राहेन उभा नव्याने
उरी जपुन ठेवीन मात्र
माझे हे अर्धवट गाणे

जाशिल तू जिथेही
तव पायी सुख नांदावे
‌इतकाही स्वार्थी नव्हतो कधी मी
की तव शुभहीतही न चिंतावे!!

जा‌ईन देवाकडे जेव्हा मात्र
मांडेन माझे गाऱ्हाणे
विचारेन, इतके का शुल्लक होते
माझे हे प्रेम दीवाणे?

सलाम -- मंगेश पाडगांवकर

सलाम
सबको सलाम
ज्याच्या हातात दंडा
त्याला सलाम,
लाथेच्या भयाने
डावा हात गांडीवर ठेवून
उजव्या हाताने सलाम,
बघणार्‍याला सलाम,
न बघणार्‍याला सलाम,
विकत घेणार्‍याला सलाम,
विकत घेणाचा इषारा करणार्‍याला सलाम,
सलाम,भाई,सबको सलाम.

वटारलेल्या प्रतेक डोळ्याला सलाम,
शेंदूर फासलेल्या दगडाला सलाम,
लाखो खर्चून बांधलेल्या देवळांना सलाम,
देवळातल्या देवांच्या धाकाला सलाम,
देवांचे आणि धर्माचे कंत्राट घेणार्यांना सलाम,
रिकाम्या हातातून ऊद कढणार्‍या बडेबुवाला सलाम,
शनीला सलाम,
मंगळाला सलाम,
भितीच्या प्रतेक ठेकेदाराला सलाम,
आईवर आयुष्यभर गुरगुरणार्‍या बापाला सलाम,
बापावर गुरगुरणार्‍या साहेबाला सलाम,
साहेबाची टरकवणार्‍या
त्याच्या सहेबाला सलाम,
सलाम,प्यारे भाईयों और भैंनो,
सबको सलाम.

ज्याच्या हातात वृत्तपत्र
त्याला सलाम,
भाषणांचे,सभांचे
फोटो सकट रिपोर्ट छापतो त्याला सलाम,
वृत्तपत्रांच्या मालकांना सलाम,
त्यांची वेसण धरणार्‍या
राज्यकर्त्यांना सलाम,
ज्याच्या समोर माइक्रोफोन
त्याला सलाम,
त्यातून न थांबता बोलतो
त्याला सलाम,
लाखोंच्या गर्दीला सलाम,
गर्दी झुलवणार्‍या
जादुगारांना सलाम,
भाईयों और भैनों सबको सलाम.

नाक्यावरच्या दादाला सलाम,
हातभट्टीवाल्याला सलाम,
स्मग्लरला सलाम,
मट्‍केवाल्याला सलाम,
त्यांनी पेरलेल्या हफ्त्यांना सलाम,
लोकशाहीलाबी सलाम,
ठोकरशाहीलाबी सलाम,
सत्तेचा ट्रक चालाविण्यार्‍यांना सलाम,
ट्र्क खाली चिरडलेल्या,
गांडुळांना,कुत्र्यांना सलाम,
ज्याच्या हातात चाकू त्याला सलाम,
विमानातून बँम्ब फेकणर्‍यालंना सलाम,
शस्त्रास्त्रांच्या प्रचंड व्यापार्‍यांना सलाम,
कळाबाजारवल्यांना सलाम,
त्यांना फाशी देण्याची घोषणा करणार्‍यांना सलाम,
गटारातल्या पाण्याने इंजेक्शन भरणार्‍यांना सलाम,
तिरडीचे समान विकणार्‍यांना सलाम,
तिरडी उचलणार्‍या खांद्यांना सलाम,
मौत सस्ती करणार्‍या सर्वांना सलाम,
सलाम,प्यारे दोस्तों,सबको सलाम.

बिळांना सलाम,
बिळातल्या उंदरांना सलाम,
घरातल्या झुरळांना सलाम,
खाटेतल्या ढेकणांना सलाम,
पिचलेल्या बयकोला सलाम,
दीड खोलीतल्या पोरडयाला सलाम,
गाडीत चेंगरणार्‍या गर्दीला सलाम,
किडक्या धान्याला सलाम,
भोके पडलेल्या पिवळ्या गन्जिफ्रोकला सलाम,
धध्यांच्या मलकाला सलाम,
युनीयनच्या लिडरला सलाम,
संपाला सलाम,
उपासमारीला सलाम,
सर्व रंगांच्या सर्व झेंड्यांना सलाम,
चाळीचाळीतून तुंबलेल्या
संडासातल्या लेंड्यांना सलाम,
मानगूट पकडणार्‍या
प्रतेक हाताला सलाम,
सलाम,भाइयों और भैनों,सबको सलाम.

या मझ्या परमपवित्र इत्यादी देशाला सलाम,
या देशाच्या सुउदात्त सुमंगल सुपरंपरेला सलाम,
सर्व बिलंदर घोशणांना सलाम,
जातिभेदाच्या उकिरड्यांना सलाम,
या उकिरड्यातून सत्तेच पीक कढणार्‍यांना सलाम,
उपनिषदे आणि वेदांना सलाम,
साखरकारखान्यांच्या दादांना सलाम,
त्यांच्या शेकडो लोर्‍यांना सलाम,
निवडणुकींना सलाम,
निवडणुकफंडाला सलाम,
अद्रूष्य बुक्यांना सलाम,
मतांच्या आंधळ्या शिक्यांना सलाम,
ससा हाती असलेल्या पारध्यांना सलाम,
त्यांच्या तैनतीतल्या गारद्यांना सलाम,
दलितांवर अत्याचार करणार्‍यांना सलाम,
या बातम्या वचाणार्‍या सर्व षंढांना सलाम,
सलाम,भाइयों और भैनों,सबको सलाम.

सत्ता संपत्तीच्या भाडव्यांचा देश म्हटले
तर डोके फोडतील,
हलकट लाचारांचा देश म्ह्टले
तर रस्त्यावर झोडतील,
खरीदलेजाणार्‍यांचा देश म्हटले
तर वाटा रोखतील,
देवधर्माविषयी,नेत्यांविषयी वाइट बोललो
तर नाक्यावर गाठून ठोकतील,
शोषण करणार्‍यांचा देश म्हटले
तर नोकरीवरुन कढतील ः
म्हणून आधी मझ्या नपुंसकत्वाला सलाम,
आणि त्यानंतर अर्थातच
या मझ्या
परमपवित्र सुउदात्त सुमंगल देशाला सलाम,
या महान देशाच्या महान परंपरेला सलाम.

सलाम प्यारे भाइयों और भैनों,सबको सलाम,
अनेक हात असते
तर अनेक हातांनी केला असता सलाम,
लेकिंन माफ करना भाइयों,
हात तर दोनच
आणि त्यातला डावा
लाथेच्या भयाने
ठेवलेला गांडीवर
म्हणून फक्त ऊजव्या हाताने सलाम,
सलाम,सबको सलाम,
भाइयों और भैनों,सबको सलाम.

------------------मंगेश पाडगांवकर

सांगा कस जगायचं? ---मंगेश पाडगांवकर

सांगा कस जगायचं?

सांगा कस जगायचं?
कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत
तुम्हीचं ठरवा!

डोळे भरुन तुमची आठवण
कोणीतरी काढतंच ना?
ऊन ऊन दोन घास
तुम्च्यासाठी वाढतंच ना?
शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं
तुम्हीचं ठरवा!

कळ्याकुट्ट कळोखात
जेव्हा काही दिसत नसतं
तुमच्या साठी कोणीतरी
दीवा घेऊन उभं असतं
कळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं
तुम्हीचं ठरवा!

पायात काटे रुतुन बसतात
हे अगदी खरं असतं;
आणि फ़ुलं फ़ुलुन येतात
हे काय खरं नसतं?
काट्यांसारखं सलायचं की फ़ुलांसारखं फ़ुलायचं
तुम्हीचं ठरवा!

पेला अर्धा सरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
पेला अर्धा भरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं
तुम्हीचं ठरवा!

सांगा कस जगायचं?
कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत
तुम्हीचं ठरवा!

---मंगेश पाडगांवकर

तुझी वाट पाहने सोडणार नाही : मंगेश पाडगांवकर

सोनेरी प्रजक्ताचा सडा न जाणो मांदतोय कोणती रांगोली
सुगंधात गहिर्या पाठवतो बोलावणी
मागतो
फक्त तुझ्याच समंजस ओंजली

***********************

जाणार आहेस खुशाल जा इतका मात्र लक्षात ठेव
असेही कधी घडले होते
तुझ्या नकळत तुझे डोळे
म्झ्यासाठी radale होते
*************************

तू सजवलेल स्वप्नांच घरटे
मी कधीच तोडनार नाही
तू ये किंवा नको येऊ
तुझी वाट पाहने सोडणार नाही : मंगेश पाडगांवकर

प्रेमात पडलं की असंच व्हायचं !! - मंगेश पाडगांवकर

माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायचं !!

तिचं बोलणं, तिचं हसणं
जवळपास नसूनही जवळ असणं;
जिवणीशी खेळ करीत खोटं रुसणं;
अचानक स्वप्नात दिसणं !

खटयाळ पावसात चिंब न्हायचं !
माझं काय, तुमचं काय
प्रेमात पडलं की असच व्हायचं !!

केसांची बट तिने हळूच मागं सारली ...
डावा हात होता की उजवा हात होता?

आपण सारखं आठवतो,
प्रत्येक क्षण,
मनात आपल्या साठवतो

ती रुमाल विसरुन गेली !
विसरुन गेली की ठेवून गेली?
आपण सारखं आठवतो,
प्रत्येक क्षण मनात आपल्या साठवतो !

आठवणींचं चांदण
असं झेलून घ्यायचं !
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायचं !!

तिची वाट बघत आपण उभे असतो ...
ठरलेली वेळ कधीच टळलेली !
येरझारा घालणंसुद्धा
शक्य नसतं रस्त्यावर!
सगळ्यांची नजर असते आपल्यावरच खिळलेली !!

माणसं येतात, माणसं जातात
आपल्याकडे संशयाने रोखून बघतात!

उभे असतो आपण
आपले मोजीत श्वासः
एक तास ! चक्क अगदी एक तास !!

अशी आपली तपश्चर्या
आपलं त्राण तगवते !
अखेर ती उगवते !!

इतकी सहज! इतकी शांत !
चलबिचल मुळीच नाही !
ठरलेल्या वेळेआधीच
आली होती जशी काही !!

मग तिचा मंजुळ प्रश्नः
"अय्या! तुम्ही आलात पण?"
आणि आपलं गोड उत्तरः
"नुकताच गं ! तुझ्याआधी काही क्षण!"

काळावर मात अशी !
तिच्यासोबत भुलत जायचं!
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायचं !!


एकच वचन
कितीदा देतो आपण !
एकच शपथ कितीदा घेतो आपण !

तरीसुद्धा आपले शब्द
प्रत्येक वेळी नवे असतात !
पुन्हा पुन्हा येऊनही
पुन्हा पुन्हा हवे असतात !!

साधंसुधं बोलताना
ती उगीच लाजू लगते,
फुलांची नाजूक गत
आपल्या मनात वाजू लागते !!

उत्सुक उत्सुक सरींनी
आभाळ आपल्या मनावर झरुन जातं;
भिजलेल्या मातीसारखं
आपलं असणं सुगंधाने भरुन जातं !!

भरलेल्या ढगासारखं
मनाचं भरलेपण उधळून द्यायचं !
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायचं !!


- मंगेश पाडगांवकर

तुला पहिल अन वाटल - Mangesh Padgaonkar

तुला पहिल अन वाटल,

शिल्प सुद्धा बोलक असत, त्यालाही भावना असतात ते सुद्धा प्रेम करत!

स्वत च्या मनातल्या भावना त्याला व्यक्त करता येत नाही

समोरच्यानी दाखवाल्या तरी संगता येत नाही

म्हानुनच वाटत, प्रेम कराव शिल्पा-सारख

अबोध अन अबोल

जे स्वतः इत्काच साधत समोर च्या मानासच्या मनाचा तोल !!

सलाम : Salaam - Mangesh Padgaonkar

सलाम
सबको सलाम
ज्याच्या हातात दंडा
त्याला सलाम,
लाथेच्या भयाने
डावा हात गांडीवर ठेवून
उजव्या हाताने सलाम,
बघणार्‍याला सलाम,
न बघणार्‍याला सलाम,
विकत घेणार्‍याला सलाम,
विकत घेणाचा इषारा करणार्‍याला सलाम,
सलाम,भाई,सबको सलाम.

वटारलेल्या प्रतेक डोळ्याला सलाम,
शेंदूर फासलेल्या दगडाला सलाम,
लाखो खर्चून बांधलेल्या देवळांना सलाम,
देवळातल्या देवांच्या धाकाला सलाम,
देवांचे आणि धर्माचे कंत्राट घेणार्यांना सलाम,
रिकाम्या हातातून ऊद कढणार्‍या बडेबुवाला सलाम,
शनीला सलाम,
मंगळाला सलाम,
भितीच्या प्रतेक ठेकेदाराला सलाम,
आईवर आयुष्यभर गुरगुरणार्‍या बापाला सलाम,
बापावर गुरगुरणार्‍या साहेबाला सलाम,
साहेबाची टरकवणार्‍या
त्याच्या सहेबाला सलाम,
सलाम,प्यारे भाईयों और भैंनो,
सबको सलाम.

ज्याच्या हातात वृत्तपत्र
त्याला सलाम,
भाषणांचे,सभांचे
फोटो सकट रिपोर्ट छापतो त्याला सलाम,
वृत्तपत्रांच्या मालकांना सलाम,
त्यांची वेसण धरणार्‍या
राज्यकर्त्यांना सलाम,
ज्याच्या समोर माइक्रोफोन
त्याला सलाम,
त्यातून न थांबता बोलतो
त्याला सलाम,
लाखोंच्या गर्दीला सलाम,
गर्दी झुलवणार्‍या
जादुगारांना सलाम,
भाईयों और भैनों सबको सलाम.

नाक्यावरच्या दादाला सलाम,
हातभट्टीवाल्याला सलाम,
स्मग्लरला सलाम,
मट्‍केवाल्याला सलाम,
त्यांनी पेरलेल्या हफ्त्यांना सलाम,
लोकशाहीलाबी सलाम,
ठोकरशाहीलाबी सलाम,
सत्तेचा ट्रक चालाविण्यार्‍यांना सलाम,
ट्र्क खाली चिरडलेल्या,
गांडुळांना,कुत्र्यांना सलाम,
ज्याच्या हातात चाकू त्याला सलाम,
विमानातून बँम्ब फेकणर्‍यालंना सलाम,
शस्त्रास्त्रांच्या प्रचंड व्यापार्‍यांना सलाम,
कळाबाजारवल्यांना सलाम,
त्यांना फाशी देण्याची घोषणा करणार्‍यांना सलाम,
गटारातल्या पाण्याने इंजेक्शन भरणार्‍यांना सलाम,
तिरडीचे समान विकणार्‍यांना सलाम,
तिरडी उचलणार्‍या खांद्यांना सलाम,
मौत सस्ती करणार्‍या सर्वांना सलाम,
सलाम,प्यारे दोस्तों,सबको सलाम.

बिळांना सलाम,
बिळातल्या उंदरांना सलाम,
घरातल्या झुरळांना सलाम,
खाटेतल्या ढेकणांना सलाम,
पिचलेल्या बयकोला सलाम,
दीड खोलीतल्या पोरडयाला सलाम,
गाडीत चेंगरणार्‍या गर्दीला सलाम,
किडक्या धान्याला सलाम,
भोके पडलेल्या पिवळ्या गन्जिफ्रोकला सलाम,
धध्यांच्या मलकाला सलाम,
युनीयनच्या लिडरला सलाम,
संपाला सलाम,
उपासमारीला सलाम,
सर्व रंगांच्या सर्व झेंड्यांना सलाम,
चाळीचाळीतून तुंबलेल्या
संडासातल्या लेंड्यांना सलाम,
मानगूट पकडणार्‍या
प्रतेक हाताला सलाम,
सलाम,भाइयों और भैनों,सबको सलाम.

या मझ्या परमपवित्र इत्यादी देशाला सलाम,
या देशाच्या सुउदात्त सुमंगल सुपरंपरेला सलाम,
सर्व बिलंदर घोशणांना सलाम,
जातिभेदाच्या उकिरड्यांना सलाम,
या उकिरड्यातून सत्तेच पीक कढणार्‍यांना सलाम,
उपनिषदे आणि वेदांना सलाम,
साखरकारखान्यांच्या दादांना सलाम,
त्यांच्या शेकडो लोर्‍यांना सलाम,
निवडणुकींना सलाम,
निवडणुकफंडाला सलाम,
अद्रूष्य बुक्यांना सलाम,
मतांच्या आंधळ्या शिक्यांना सलाम,
ससा हाती असलेल्या पारध्यांना सलाम,
त्यांच्या तैनतीतल्या गारद्यांना सलाम,
दलितांवर अत्याचार करणार्‍यांना सलाम,
या बातम्या वचाणार्‍या सर्व षंढांना सलाम,
सलाम,भाइयों और भैनों,सबको सलाम.

सत्ता संपत्तीच्या भाडव्यांचा देश म्हटले
तर डोके फोडतील,
हलकट लाचारांचा देश म्ह्टले
तर रस्त्यावर झोडतील,
खरीदलेजाणार्‍यांचा देश म्हटले
तर वाटा रोखतील,
देवधर्माविषयी,नेत्यांविषयी वाइट बोललो
तर नाक्यावर गाठून ठोकतील,
शोषण करणार्‍यांचा देश म्हटले
तर नोकरीवरुन कढतील ः
म्हणून आधी मझ्या नपुंसकत्वाला सलाम,
आणि त्यानंतर अर्थातच
या मझ्या
परमपवित्र सुउदात्त सुमंगल देशाला सलाम,
या महान देशाच्या महान परंपरेला सलाम.

Mangesh Padgaonkar

सलाम प्यारे भाइयों और भैनों,सबको सलाम,
अनेक हात असते
तर अनेक हातांनी केला असता सलाम,
लेकिंन माफ करना भाइयों,
हात तर दोनच
आणि त्यातला डावा
लाथेच्या भयाने
ठेवलेला गांडीवर
म्हणून फक्त ऊजव्या हाताने सलाम,
सलाम,सबको सलाम,
भाइयों और भैनों,सबको सलाम.

------------------मंगेश पाडगांवकर

अक्षता...ek vichar

अक्षता... अनिल करवीर
या लग्नात आपण वधु-वरांच्या डोक्यावर तांदुळ टाकत असतो. कारण आपला संस्कार आपल्याला असे सांगतो की भटजी ज्या वेळेला मंगलाष्टक म्हणत असतो, त्या वेळेला अक्षता वधु-वरांच्या डोक्यावर पडल्या तर त्यांचा संसार सुखाचा होतो. भटजीने “शुभ मंगल सावधान” म्हटले की आपण वधु-वरांवर अक्षता टाकायच्या एवढं करीत असतो.
पण मंडळी, आपण टाकलेल्या अक्षता पैकी किती अक्षता त्या वधु-वरांच्या डोक्यावर पडतात ? १०% सुध्दा नाही. जवळ जवळ ७०% अक्षता आपण आपल्या समोर उभ्या असलेल्या माणसांच्या डोक्यावर टाकतो. २०% लोक त्या अक्षतांचा विवीध गोष्टी साठी वापर करतात, एखाद्या मित्राला किंवा विशषत: मैत्रीणीला सतविण्यासाठी, कोणा व्यक्ती विरुध्द राग व्यक्त करण्यासाठी, मुद्दामहून बायकांकडे जोरात अक्षता फेकून क्षणीक विकृत आनंद मिळविण्यासाठी...
लग्न छान पार पडतं, लग्नाच्या हॉलमधून बाहेर येताना बहुतेकजण डोक्यावर हात फिरवून आपल्या केसांमधील अक्षता काढतात. सगळी मंडळी गेल्यावर पूर्ण हॉलभर राहतो तांदळाचा सडा... तोही लोकांनी पायानी तुडविलेला...
आपल्या धर्मात म्हटलं जातं “अन्न हे पुर्ण ब्रम्ह”. असे अन्न वाया घालवून व पायदळी तुडवून आपण अन्नाचा अपमान करीत नाही का ?
एका लग्नामध्ये सुमारे ५ किलो तांदळाच्या अक्षता केल्या जातात. एकट्या महाराष्ट्रात दरवर्षी अंदाजे ४ लाख लग्न होतात म्हणजे सरासरी २० लाख किलो तांदुळ आपण व्यर्थ वाया घालवितो. एकीकडे जव्हार-मोखाडा येथे लहान मुलं अन्न नाही म्हणून कुपोषित होताहेत आणि आपण सहज लाखो किलो अन्नाची नासाडी करतो.
तुम्ही म्हणाल की तांदुळ नाही टाकायचे तर टाकायचे तरी काय ? १३५ वर्षापूर्वी महात्मा फुले यांनी लग्नाला तांदळा ऐवजी फुलं वापरण्याचा विचार मांडला होता. एकतर फुलं आपण खात नाही, सगळेजण फुले वापरायला लागल्यावर २० लाख किलो फुलांच मार्केट तयार होईल, शेतक-याला, कष्टक-याला काम व पैसा मिळेल.
कोणत्याही वधु-वरांला डोक्यावर तांदळाऐवजी मऊ, मखमली फुलें पडली, त्यात त्यांना आप्तेष्टांचा आशीर्वाद व हळूवार मायेचा ओलावा जाणवेल. माझ्या मित्राला त्याच्या लग्नात अंगावर अलगद फूलांच्या पाकळ्या पडत आहेत हे फारच “रोमॅन्टीक” वाटलं.
आपल्या सारख्या प्रगल्भ व्यक्तींनी हा चांगला पायंडा पाडावा ही इच्छा. सगळ्यांनी असा विचार केल्यास वाचलेले २० लाख किलो तांदुळ अनाथाश्रमात किंवा बाबा आमटेंच्या आनंदवनात पाठविले तर त्याहुन अन्य पुण्य नोहे.......

Thursday, July 10, 2008

कोट्याधीश पु. ल.== तुमचे पूर्वज शेण वीकायचे ना

एकदा पु ल शाळेत असताना त्यांना कोणीतरी म्हणाले,
" ए देशपांडे तुमचे पूर्वज शेण वीकायचे ना ? "
त्यावर पु ल लगेच म्हणाले,
" हो ना तुमच्या पूर्वजांना शेण खायला लागायचा ना म्हणून वीकायचो आम्ही. "

मन हे वेडे : Yogesh

मन हे वेडे , गुंतत राहाते
स्वप्न बिलोरी गुंफत राहाते
ठाउक नसते त्याला तेंव्हा ...
प्रारब्धाचे खेळ अकल्पित ...
धरु पाहता .... निसटुन जाते ||

मन हे पक्षी ... विहरत राहाते
नवी क्षितिजे शोधत राहाते
ठाउक नसते त्याला तेंव्हा ...
सप्तरंगी हे आकाश भुलवून ....
घरट्यापासून दूर नेते .... ||

पण मन आशावादी , झुंजत राहते
क्रूर नियतीला थकवत राहाते ...
ठाउक ' असते ' त्याला तेंव्हा
असला जरी अंधार कितीही ....
प्रकाशाशीच त्याचे नाते ||

ओळख : स्वाती फडणीस

ओळखलंस का मला?
ओळखलंस का गं!
अग..
मी चिनू..
तुझी लाडकी चिनू!
खूप सतावायचे तुला..
तुझा प्रसादही मला जास्त,
आणि तितकीच मायाही!
आठवतंय तुला..
लपून बसलेले एकदा,
तू शोध शोध शोधलंस..
आणि सापडले तेव्हा!
तेव्हा खरं तर..
तूच सापडलीस मला
आणि आता..
माझ्या समोर आहेस,
तरी..
तुला सापडत नाहीये ना!
नको गं लपूस अशी..
त्या अलझ्मेरीया आड!
ओळख.. आठव..
सांग ना!!
ओळखलंस का मला!



====================
स्वाती फडणीस........... १०-०७-२००८

दूर दूर जाताना....................................

एक जवळची व्यक्ती करिअर साठी दूर जात असताना लिहिलेले काव्य.....


अंतर जरीही अनंत असले, अंतरी परी नसावे अंतर,
अभंग असतील अपुली नाती, मणि असावे प्रेम निरंतर.

जा झेपावूनी निळ्या आभाळी, कवळूनी घे तारांगण अवघे,
परी ये परतूनी या धरती वरती, साद घालता धावत वेगे.

खुणावती उत्तुंग शिखरे, विराट सागर अथांग क्षितीजे,
उरात असता अभेद्य आशा, अजिंक्य गगन भासेल खुजे.

बंधपाश जरी खेचतील तुजला, फ़िरून पाहू नकोस मागे,
खचशील परी पतंगापरी, तोडशील जर मागील धागे.

अखंड यत्ने जिंकून घे, आकाश अवघे असीम अवनी,
झेपेल इतकीच घे झेप, नको, घास मोठा छोट्या वदनी.

विसावयाचे विसरु नको, परी विश्रान्तीसी विराम हवा,
जिंकशील तीही लोक जरी, मनी अविरत श्रीराम हवा.

हां उपदेश नको मानूस बंधू, प्रेमाचे हे आलिंगन आहे,
शब्दात कितीही गुंफले तरी, अजून खासे अबोलच आहे.

तुला ठाऊक नसेल

-------------- तुला ठाऊक नसेल ...! ------------------

तुझ्यासमवेत घालवलेल्या प्रत्येक क्षणांची आठवण आहे मला ,
त्या सर्व आठवणीना कधीही न विसरलेला मी तुला ठाऊक नसेल ...!

मला आणि तुला आवडणारे गाणे सारखेच ,
तुला आवडणारे गाणे एकुनच झोपणारा मी तुला ठाऊक नसेल ...!

गर्लफ्रेंड आहे का तुला कोणी ? विचारतात असे मला मित्र,
उत्तर असलेल्या प्रश्नालाही "नाही" म्हणंणरा मी तुला ठाऊक नसेल ...!

तू भेटणार म्हणून उमळलेल्या ,
माझ्या मनातील मोगराचा सुवासही तुला ठाऊक नसेल ...!

एरवी रिकामे असलेले पाकीट ही मी भरून ठेवले होते पैशाने,
तुझा आनंदासाठी खर्च करणारा मी तुला ठाऊक नसेल ...!

तुझी आठवण आली नाही असा दिवस अजुन आला नाही,
माझीही आठवण व्हावी म्हणून "Orkut" वर टाकलेल्या फोटोचे कारणही तुला ठाऊक नसेल ...!

बोलावेसे वाटते मला खूप तुझ्याशी,
पण बोललोच कधी तर गोंधळलेला मी तुला ठाऊक नसेल ...!

पण तू "नाही" म्हटल्यावर तुझ्या विरहात प्राण देणारा
मी तुला नक्कीच ठाऊक असेल ... असेल ना ?

आज असं का घडतयं

आज असं का घडतयं मन सारखं माझ्याशी बोलतयं

जरी तू दिसत नाहीस तरी तुझाच भास होतोय
झाडाची पानं हलली तरी तुझ्या बांगडयांचा आवाज वाटतोय

नदीचं पाणी जरा जास्तच खळाळुन वाहतयं
जसं तुझं हसणचं ऐकल्यासारखं वाटतयं

ढगाआडुन दिसणारा चन्द्र आज तुझी आठवण करुन् देतोय
ओंजळीत लपवलेला तुझा चेहरा आज मला स्मरतोय

हा वाहणारा वाराही माझ्या कानात काहीतरी सांगतोय
एक मात्र खरं कि तो तुझाच सुगंध पसरवतोय

आकाशातुन् सारखं कुणीतरी मला बघतयं
ए.... तू तर नाहीस ना ..?

तू गेलीस तेव्हापासून कधीही घडलं नाही
पण मग आज ..... आज हे असं का घडतयं
मन सारखं माझ्याशी बोलतयं
मन सारखं माझ्याशी बोलतयं

जयंत

प्रेम आं ध ल असत

प्रेम आं ध ल असत पण आन्धल्या व्यक्ति वर ते कधीच नसत
प्रेमात डोलस पना हा असतोच ,रूपावर भाल ले ल्या मनाला मे न्दू जागा करतो
आपल मन का कधीच अपंग व्य क्ति कड़े आकर्षित होत नाही
कारन आपल्या अपेक्षा पूर्ण करण्याची त्यात ताकत नसते
मग का म्हनाव प्रेम आन्द्हल असत कारन आन्धल्या व्यक्तीवर ते कधीच नसत

तुम्ही आस्तिक की नास्तिक

तुम्ही आस्तिक की नास्तिक हा प्रश्न नेहमी विचारला जातो
पण आस्तिक या शब्दाचा नेमका काय अर्थ असतो
आस्तिक म्हणजे मुर्तीची पुजा करणे नाही
आस्तिक म्हणजे चांगल्या गोष्टींचा आदर करणे
आस्तिक म्हणजे दान नाही, जीवन दान करणे
आस्तिक म्हणजे मुर्तीवर नसून, श्रद्धेवर श्रद्धा असायला हवी
श्रद्धा मुर्तीवर न ठेवता सत्कृत्यावर असायला हवी
देव आहे विश्वास मनास शक्ती देनारा
देव आहे झरा, वाळवंटात तहान भागवणारा
दुसर्‍याच्या भावनांचा आदर करणे
वा आपले कर्तव्य व्यवस्थित रित्या पुर्ण करणे
यातच आस्तिकता आहे
असाच माणुस खरा अस्तिक म्हणायच्या लायकीचा आहे
तुमचं एक सत्कृत्य हाच देवाला प्रसाद, हाच देवाला हार,
पाप करून नंतर पुजा करणारा खरा नास्तिक आहे
अहो देव म्हणजे काय तुम्हाला समजलंच नाहिये.

Wednesday, July 2, 2008

"एकाकी........."

"एकाकी........."

रतीब इथे आनंदाचा...
सडा पडे प्राजक्ताचा...
प्रज्वलित दिव्यांच्या वाती...
स्नेह धारेच्या बरसाती...

काळाची चक्रे फिरली...
ना कुणी कुणाची उरली...
झाहले विनाश परस्परांचे...
मनही शहारे आरशांचे....

डोईवर 'माये'चेच खूळ...
घराणेही उखडे समूळ....
चहूकडे काळाचे तांडव...
उधळे काडीकाडीचा मांडव....

मम देहीही थरकाप...
निर्जीवास जडे या शाप...
गातो आर्त वेदनेचा पोवाडा...
मी भग्न एक वाडा.....
मी भग्न 'एकाकी' वाडा.....



सौ. रेणुका खटावकर(रेपाळ).....

माझ्यासाठी तू काय आहेस.....

कधी न पाहिले स्वप्नी,
कधी न होते ध्यानी मनी,
असे प्रेम तुझे मला लाभले,
अबोल सारे शब्द मग गीत होऊ लागले..

माझ्या जिवनात आलीस तू अशी,
की सारं काही बहरून गेलं,
लोंखडाचं कणखर जगणं माझं,
तुझ्या परिसस्पर्शाने सोनं होऊन गेलं..

तुझ्या मिठीचा आधाराने मला,
नव्या उमेदिची नव्या आशेची ग्वाही दिली,
म्हणून मी ही प्रत्येक यशाच्या पुर्तीसाठी,
मी परीश्रमाची अन सत्याची वाट धरली..

तुझा तो होकार माझ्यासाठी,
आजही अविस्मरणीय असा आहे,
तुझ्या हातात मी दिलेलं फुल,
अन त्याचा सुगंध अजूनही आपल्या आसपास आहे..

तेव्हा कधी नजर ना लागो,
आपल्या नात्याच्या या नाजूक कळीला,
म्हणून मी नेहमी माझ्या डोळ्यात साठवून ठेवतो,
तुझ्या गालावरच्या त्या होकाराच्या गुलाबी खळीला..

आयुष्य माझे सुंदर आहे फक्त,
तुझ माझ्या जिवनात असण्यावर,
नाहीतर काय अर्थ उरतो श्वासांना,
जेव्हा ह्रिदयच छातीत नसल्यावर...

-- अनामिक...

email- anamiksahil@gmail.com

अविभाज्य ...

अविभाज्य ...

जेव्हा सगळं मनाप्रमाणे घडत असतं ,
मन प्रसन्न असतं ,
सगळं छान , निरभ्र असतं,
तेव्हा तू कुठे असतेस ???
का असतेस अवती भवतीच ....
पण तुझं अस्तित्त्व मलाच जाणवत नाही ?

आज काल मी मला स्वार्थी वाटू लागलोय .... कारण ...
कारण जेव्हा बेचैनी असते, दुःख असतं, सगळं दाटून येतं ....
तेव्हाच तू आठवतेस ....
असंच झालंय बरेचदा .....

पण खरंच सांगतो ,
तू माझ्या अस्तित्वाचाच भाग आहेस ...
कदाचित ज्याला मी सुख किंवा आनंद म्हणतो ,
तेच एखाद्या मृगजळासारखं आहे
ज्याची इतकी भूल पड़ते की ....
स्वतःचं अस्तित्त्व सुद्धा विसरलं जावं .......

Yogesh Tapasvi

प्रयत्न करतोय पण जमत नाही...

प्रयत्न करतोय पण जमत नाही...
तुला विसरायचे आहे...
प्रयत्न करतोय पण जमत नाही...

मला परत जगायचे आहे...
प्रयत्न करतोय पण जमत नाही...

मन मोकळे रडायचे आहे...
प्रयत्न करतोय पण जमत नाही...

पुन्हा एकदा हसायचे आहे...
प्रयत्न करतोय पण जमत नाही...

नवीन कविता लिहायची आह...े
प्रयत्न करतोय पण जमत नाही...

मनापासून

मनापासून
मला कळेना कसे घडे हे
कळे तुला गं माझ्या मनीचे
जसे कळे गं सहजपणाने
जीवा घ्यावया श्वास,
गंध तुझा गं मोहवे मला
श्वास तुझा गं जाणवे मला
काही न सुचते काही न रुचते
फक्त तुझा मज ध्यास ....

अगदी माझ्या जवळ असूनही
हाक मारलीस नाही कधी
मी ही करंटा, अबोल प्रीती
तुझी मज कळली नाही कधी
आणि गर्द अंधारी एकदा चुम्बिलेस नयनास
हातात घेउन हात म्हणालीस
किती रे तू थकलास ......

ज्या ज्या वेळी भेटलीस
भारून टाकले तू मजला
शब्दावाचून माझी भावना
मूकपणे कळली तुजला
आज जाणले सखी तुला
संपले सर्व आभास
व्यर्थ वाटती सर्व सूखे
अन लौकिकाची आरास ......

दुःख वाटते एवढेच ...
मी देऊ न शकतो काही तुला
व्यवहारिकतेच्या जगात या गं
कोण विचारी तुला मला
खंत न वाटे याची मला
ये श्वासात मिसळू दे श्वास
पूर्णत्व काय असणार दूजे
माझ्या गं जीवनास .......

योगेश तपस्वी

स्वप्न ...

मला स्वप्न खूप आवडतात
वास्तवाशी संबंध नाही कशाचेच बंध नाहीत ....
खोटी असली तरी धीर देतात
थकल्या भागल्या जीवाला बळ देतात ....
मला स्वप्न खूप आवडतात

मला धुकही खूप आवडत ....
खूप खूप सुरक्षित वाटत त्याच्या आवरणात
फार लांबच दिसत ही नाही ...
आणि धुक्याच्या ओलेपणात
डोळ्यात आलेल पाणी कोणाला कळतही नाही ...
मला धुकही खूप आवडत ....

मला तू ही खूप आवडतेस
मला माहित आहे मी तुला अजिबात आवडत नाही ....
तरीही मी स्वतःला रोखु शकत नाही ....
तू नसलीस तर स्वप्नही पडणार नाहीत ...
आणि मग धुक्यात विरून जायला कितीसा वेळ लागेल???

Monday, June 23, 2008

दोन दिवसांच आयुष्य

दोन दिवसांच आयुष्य
पण फुलासारखं असावं
ऊन पावसाचे क्षण सारे
भरभरून जगावं

खुलावं चिखलातून
कधी बागेत बहरावं
सुख दु:खांच्या भ्रमरांना
कधी ओंजळीत धरावं

कधी प्रियकराच्या हातातून
प्रेयसीच्या हाती जावं
अश्या सोनेरी क्षणांचा
कधी साक्षीदार व्हावं

वधूवरांच्या सोबतीने
कधी शुभ-मंगल करावं
मनोरथ पूर्णं करण्या
चरणी ईश्वराच्याही जावं

सुखात कुणाच्या उधळावं
तर दु:खातहि सामील व्हावं
शोभून हार तुऱ्यातून
कधी सरणावरही जळावं.

दोन दिवसांच आयुष्य
पण फुलासारखं असावं.......

तो फ़क्त एक क्षण

तो फ़क्त एक क्षण भान हरवून गेला
हरलो पण तो मला जिंकवून गेला

पावसाचं काय, तो नेहमीच येतो
प्रेमाचा एकच थेंब चिंब भिजवून गेला

चांदण्यातही आता मला तीच दिसते
जणू तो चंद्र मला फ़सवून गेला

देवळातही दुसरं काही मागवेना
नास्तिकाला तो श्रद्धाळू बनवून गेला

मी फ़क्त एक साधा चित्रकार होतो
अद्रुश्य रंगात मला तो रंगवून गेला

शब्द सुद्धा अपुरे पडू लागले
मनाला घातलेला बांध तो उसवून गेला..

प्रेम म्हणजे

प्रेम म्हणजे भावनांचं आभाळ
प्रेम म्हणजे भावनांचं आभाळ

ज्याला कुठेच अंत नाही

प्रेमाखातर प्राणही गेला

तरी मनाला त्याची खंत नाही


प्रेम म्हणजे बंधन

प्रेम म्हणजे स्पंदन

प्रेम म्हणजे स्वतः झिजून

इतरांसाठी सुवासणारं चंदन


कधी कधी असंख्य भेटी घडूनही

प्रेमाची भावना जागत नाही

तसं प्रेमात पडायला कधी कधी

ती भेटचं घडावी लागत नाही


प्रेम म्हणजे दोन मनांना

आपुलकीनं जोडणारा सेतू असतो

प्रिय व्यक्तीच्या सुखासाठी धडपड

हाच प्रेमाचा निरागस हेतू अस्तो


प्रेम म्हणजे प्रियजणांच्या

चेहऱ्यावर उमटणारा हर्ष असतो

प्रेम म्हणजे जिवात दडलेल्या

आत्म्याचा स्पर्श असतो


प्रेम म्हणजे भावनांची ठिणगी

जी हृदयात अवचित पेट घेते

जीवनाच्या एका नाजूक वळणावर

अविस्मरणीय स्वप्नांची भेट देते

तिला माझी एकही कविता कळत नाही

ती माझ्याशी बोलायची,
ती माझ्याशी बोलायची,
रोज गोड हसायची,
कधी कधी माझी
वाट बघत थांबायची....

दुसरी एकही मुलगी
माझ्याशी कधी बोलायची नाही,
ही पोरगी मात्र
माझी पाठ कधी सोडायची नाही....

तिच्या आयुष्यातल्या गमती
ती रोज मला सांगायची,
मी नवी लिहिलेली कविता
सारखी वाचायला मागायची....

एकदा मला म्हणाली
"तू माझ्यावर कध्धीच कविता करत नाही !"
तेव्हा मला समजलं....
तिला माझी एकही कविता कळत नाही

ति म्हणजे " मैत्री".

जिथे बोलण्यासाठी "शब्दान्ची" गरज नसते,
आनन्द दाखवायला "हास्यची" गरज नसते,
दुःख दाखवायला "आसवान्ची " गरज नसते,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते
ति म्हणजे " मैत्री".

मैत्री असते कशी, लोणच्यासारखी?
मुरत जाते, जुनी झाली की.
मैत्री असते कशी, दुधावरच्या सायीसारखी?
घट्ट होते वेळ जाईल तशी.
मैत्री असते कशी, बासुंदीसारखी?
गोडी वाढते आटवाल तशी.
मैत्री असते कशी, फोडणीसारखी?
लज्जत येते जीवनाला तडतडली तरी.
मैत्री असते कशी, मीठासारखी?
नसेल तर होईल जीवन अळणी
काय चिज असते नाही ही मैत्री??
मैफ़लीत रंगून जाते ती मैत्री
जीवनात विलीन होऊन जाते ती मैत्री

असाव कुणीतरी......

असाव कुणीतरी......
आपल्या हाकेला 'ओ' देणार.....
रिमझिंत्या पावसात हळूच छत्रीत बोलावनार..

असाव कुणीतरी......
आपल्या सोबत चालणार..
चांदण्यात फिरताना हातात हात घेणार..

असाव कुणीतरी......
कधी वाद घालणार..
खोटा रुसवा आणून, पुन्हा आपल्यावरच रागवणार..

असाव कुणीतरी......
मनमोकळ बोलणार..
काहीही न सांगता, अगदी मनातल ओळखणार..

असाव कुणीतरी......
खूप काही विचारणार..
लहान लहान गोष्टीसाठी शपथ घालणार..
असाव कुणीतरी...................

Friday, June 20, 2008

राधा ही बावरी

रंगात रंग तो शामरंग पाहण्या नजर भिरभिरते

ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते

त्या सप्तसुरांच्या लाटेवरूनी साद ऐकूनि होई

राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी

राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी llधृ.ll

हिरव्या हिरव्या झाडांची पिवळी पाने झुलताना

चिंब चिंब देहावरूनि श्रावणधारा झरताना

हा दरवळणारा गंध मातीचा मनास बिलगून जाई

हा उनाड वारा गूज प्रीतीचे गाणे सांगून जाई

त्या सप्तसुरांच्या लाटेवरूनी साद ऐकूनि होई

राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी

राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी ll१ll

आज इथे या तरुतळी सूर वेणूचे खुणावती

तुज सामोरी जाताना उगा पाऊले घुटमळति

हे स्वप्न असे की सत्य म्हणावे राधा हरपून जाई

हा चंद्र-चांदणे ढगाआडुनि प्रेम तयांचे पाही

त्या सप्तसुरांच्या लाटेवरूनी साद ऐकूनि होई

राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी

राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी ll२ll

तू काय आहेस.......??

तू काय आहेस.......??

तुझ्या रूपाचे खरेच मला काही माहीत नाही
पण आवाजाची गोडि फार छान आहे

तुझ्या रूपाचे खरेच मला काही माहीत नाही
पण स्वभावाची रंगत फार न्यारी आहे

तुझ्या रूपाचे खरेच मला काही माहीत नाही
पण बोलण्याची लकब मोठी भारी आहे

तुझ्या रूपाचे खरेच मला काही माहीत नाही
पण रागातील नखरा तर बाप रे बाप!

तुझ्या रूपाचे खरेच मला काही माहीत नाही
पण प्रेमाच्या ओळाव्याला मोलच नाही

तुझ्या रूपाचे खरेच मला काही माहीत नाही
पण खुडकन हसलीस म्हणजे वाटे चांद हाती

तुझ्या रूपाचे खरेच मला काही माहीत नाही
पण डोल्यातील पाणी खरे अनमोल मोती!
तुझ्या रूपाचे खरेच मला काही माहीत नाही......!!

आयुष्य खूप सुंदर आहे

आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसलं तरी,
एकट्यानेच ते फुलवत रहा,
वादळात सगळं वाहून गेल,
म्हणुन रडत बसू नका,
वेगळ अस काही,
माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नका
मृगाकडे कस्तुरी आहे,

फुलात गंध आहे,
सागराकडे अथांगता आहे,
माझ्याकडे काय आहे, असं म्हणून रडू नका,
अंधाराला जाळणरा एक सूर्य तुमच्यातही लपला आहे.
आव्हाहन करा त्या सूर्याला!!!!!
मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन.
अंधारामय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजून
मग रोजच उगवेल एक नवी सकाळ,
उत्साह ध्येयाने भारुन म्हणून म्हणते.........
आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसल तरी
एकट्यानेच ते फुलवत रहा…..

एखाद्या दिवशी

एखाद्या दिवशी जर तुला रडावसं वाटलं
तर मला हाक मार
मी वचन तर देत नाही की.....
मी तुला हासवेन
पण मी तुझ्यासंगे रडू तर शकतो

एखाद्या दिवशी जर तुला पळून जावसं वाटलं
तर मला सागांयला बिलकूल घाबरू नकोस
मी वचन देत नाही की.....
मी तुला थांबवेनपण मीही तुझ्यासंगे येऊ शकतो

एखाद्या दिवशी तुला कोणाचेच एकायचे नसेल
मला बोलव आणि.....
मी वचन देतो की…..
मी शांत राहीन

पण एखाद्या दिवशी तु बोलवलेस
आणि काहीच ऊत्तर मिळाले नाही तर.....
माझ्याकडे त्वरीत ये....
कदाचीत मलाच तुझी गरज असेल

Thursday, June 12, 2008

मैत्री केली आहेस म्हणुन

मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय

गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..

रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..

आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..

तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस
व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..

मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..

समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे
'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..

विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोस
जाणीवपूर्वक 'नातं ' जप.. मध्येच माघार घेऊ नको ......

काही माणसं

काही माणसे असतात खास
जि मैत्रीने खांद्यावर हात टाकतात,
दुःख आले जिवनात तरीही
कायम साथ देत राहातात.

काही माणसं मात्र
म्रुगजळाप्रमाणे भासतात,
जेवढे जवळ जावे त्यांच्या
तेवढेच लांब पळत जातात.

काही माणसे ही गजबजलेल्या
शहरासारखी असतात,
गरज काही पडली तरच
आपला विचार करतात,
बाकीच्या वेळी ति सारी नाती विसरतात
काही हवे असेल स्वतःला तर तुम्हाला मित्र मित्र करतात.

मात्र काही माणसं ही
पिंपळाच्या पानासारखी असतात,
जाळी झाली त्यांची तरी मनाच्या
पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवाविशी वाटतात.

मनातलं वादळ

पावसाच्या सरी सगळ्यांसाठी असतात ...
पण मनात भरून आलेले ढग आपलेच असतात !
मनातलं वादळ कोणालाच दिसत नाही ,
बरसणाऱ्या अश्रूंच्या सरी फ़क्त आपल्याच असतात !!!

कधीतरी

कधीतरी अशीच एक संध्याकाळ असेल
कधीतरी अशीच एक संध्याकाळ असेल,
ह्रदयात तूझी प्रीत अन ओठावर गीत असेल...
सगळया आठवणी क्षणात डोळयासमोरून जातील,
नकळत मग गालावर या थेंब ओघळतील...


कधीतरी पून्हा तू स्वप्नात येशील,
एकत्र घालवलेले क्षण आठवतील...
तूझ्याशिवाय आता मला जगावं लागेल,
जगतानाही रोज असं मरावं लागेल...


कधीतरी तू ही माझी आठवण काढशील,
प्रीत आठवून मझी कंठ तूझाही दाटेल..
डोळ्यातील अश्रू मूक पणे गिळून टाकशील,
कारण पूसायला तेंव्हा ते मी जवळ नसेन...



कधीतरी मग या मनालाही समजेल,
तूझ्या परतीची अशा तेंव्हा मावळेल...
त्यावेळेस जीवनाला या अर्थ नसेल,
कारण शरीराला तेंव्हा या मनंच नसेल...


कधीतरी तू मला असं वचन देशील ?
पूढच्या जन्मी तरी माझी होशील ?
मग तू सोडून गेल्याचं दुःख नसेल,
आपण कोणावर तरी प्रेम करू शकलो
यातच मग मला समाधान असेल...