आठ ऒळी
इतके दुर होतो???खरेच ठाऊक नव्हते,
रितेच होते विणलेले श्वासांचे घरटे???
निसर्गक्रमाची सोयिस्कर साधनेच नुसती????
जवळपणात कधीच घडले नाही मोती???
सावल्यांच्या अफवांत दोन झाडे उभी राहीली,
पाने आली आणी पाने गळून गेली:
चंद्र उगवला जेव्हा रिकाम्या फांद्यांमागे
डोळ्यात बाहुल्यांत कुणीच नव्हते जागे.
---------------------मंगेश पाडगावकर
No comments:
Post a Comment