Total Pageviews

Saturday, June 9, 2012

Jagayache Kase

* १) सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो. * २) आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते. * ३) प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान * ४) जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही. * ५) यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला. * ६) प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे. * ७) ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं. * ८) यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास. * ९) प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस ! * १०) चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस ! * ११) मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं. * १२) छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात. * १३) आपण जे पेरतो तेच उगवतं. * १४) फ़ळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये. * १५) उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो. * १६) शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम. * १७) प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा. * १८) आधी विचार करा; मग कृती करा. * १९) आयुष्यत आई आणि वडील यांना कधीच विसरु नका, * २०) फ़क्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास ! * २१) एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री. * २२) अतिथी देवो भव ॥ * २३) अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा. * २४) दु:ख कवटाळत बसू नका; ते विसरा आणि सदैव हसत रहा. * २५) आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल असे कधीही वागू नका.

No comments: