* १) सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
* २) आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
* ३) प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान
* ४) जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही.
* ५) यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.
* ६) प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.
* ७) ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.
* ८) यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.
* ९) प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस !
* १०) चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !
* ११) मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.
* १२) छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.
* १३) आपण जे पेरतो तेच उगवतं.
* १४) फ़ळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये.
* १५) उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो.
* १६) शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.
* १७) प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा.
* १८) आधी विचार करा; मग कृती करा.
* १९) आयुष्यत आई आणि वडील यांना कधीच विसरु नका,
* २०) फ़क्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास !
* २१) एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री.
* २२) अतिथी देवो भव ॥
* २३) अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा.
* २४) दु:ख कवटाळत बसू नका; ते विसरा आणि सदैव हसत रहा.
* २५) आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल असे कधीही वागू नका.
No comments:
Post a Comment