नवरा विरुद्ध बायको....?
नवरा हा नवराच असतो
बायको ही बायकोच असते
हक्काचे आणि प्रेमाचे
दोघांचे एकच जग असते
तिची धाव जरी माहेरच्या कुपणापर्यंत
तरी घरातल्या वीटेवीटेत तिचे अस्तित्व असते
तिच्या अस्तित्वानेच येतो घरी ओढल्यागत
जरी मित्राच्या घरी रंगलेली रात्र असते
लग्न करतात दोघे तेव्हा
तो उताविळ नवरा आणि ती लाजरी नववधु
दोघही एकमेकां वर करत असतात
आंधळं प्रेम आणि नजरेनं जादू..
तालावर नाचवाताना ती
संसाराची लय सोडत नाही
नाचतो तो ही गप गुमान
तिची साधलेली लय बिघडवत नाही
कधी तो कधी ती
चुका दोघही करतात
तो चूकतो तंव्हा आणतो गजरा
ती चूकते तेंव्हा येते लाडात
मोलकरणीवर गेलेलं लक्ष
तिला आवडत नाही
आणि तिच्याकडे कोणी पाहिलं
तर त्यालाही खपत नाही
तिच्या तोंडी माहेरचा गोडवा
तो म्हणतो माझ्या आईच्या हातची चवच न्यारी
दोघांनाही असतात
आपापल्या माहेरची माणसं प्यारी
घरात असले दोघे
पेटलेलं भांडण असते
एक कोणी नसेल तर
न सोसणारी आठवण असते
जन्म दिलेल्या बाळांचे
त्यांना मिळालेले पालक्त्व असते
त्यांचे नाते ह्यामुळेच
अधिकच झाले परिपक्व असते
संकटातही दोघांना
एकमेकांची साथ सोबत असते..
कारण तुझं वेगळं-माझं वेगळं
अशी संकटांची वाटणीच नसते
कधी तांडव कधी मांडव
कधी तप्त ऊन कधी थंड छाया
आसुसलेल्या त्याच्या स्पर्शासाठी
तिची रसरसलेली काया
'नवरा विरुद्ध बायको'
कधी न संपणारं हे भांडण आहे
खरंतर दोघांचही अस्तित्व
एकमेकांशिवाय अपुर्ण आहे.
नवरा हा नवराच असतो
बायको ही बायकोच असते
हक्काचे आणि प्रेमाचे
दोघांचे एकच जग असते
तिची धाव जरी माहेरच्या कुपणापर्यंत
तरी घरातल्या वीटेवीटेत तिचे अस्तित्व असते
तिच्या अस्तित्वानेच येतो घरी ओढल्यागत
जरी मित्राच्या घरी रंगलेली रात्र असते
लग्न करतात दोघे तेव्हा
तो उताविळ नवरा आणि ती लाजरी नववधु
दोघही एकमेकां वर करत असतात
आंधळं प्रेम आणि नजरेनं जादू..
तालावर नाचवाताना ती
संसाराची लय सोडत नाही
नाचतो तो ही गप गुमान
तिची साधलेली लय बिघडवत नाही
कधी तो कधी ती
चुका दोघही करतात
तो चूकतो तंव्हा आणतो गजरा
ती चूकते तेंव्हा येते लाडात
मोलकरणीवर गेलेलं लक्ष
तिला आवडत नाही
आणि तिच्याकडे कोणी पाहिलं
तर त्यालाही खपत नाही
तिच्या तोंडी माहेरचा गोडवा
तो म्हणतो माझ्या आईच्या हातची चवच न्यारी
दोघांनाही असतात
आपापल्या माहेरची माणसं प्यारी
घरात असले दोघे
पेटलेलं भांडण असते
एक कोणी नसेल तर
न सोसणारी आठवण असते
जन्म दिलेल्या बाळांचे
त्यांना मिळालेले पालक्त्व असते
त्यांचे नाते ह्यामुळेच
अधिकच झाले परिपक्व असते
संकटातही दोघांना
एकमेकांची साथ सोबत असते..
कारण तुझं वेगळं-माझं वेगळं
अशी संकटांची वाटणीच नसते
कधी तांडव कधी मांडव
कधी तप्त ऊन कधी थंड छाया
आसुसलेल्या त्याच्या स्पर्शासाठी
तिची रसरसलेली काया
'नवरा विरुद्ध बायको'
कधी न संपणारं हे भांडण आहे
खरंतर दोघांचही अस्तित्व
एकमेकांशिवाय अपुर्ण आहे.
No comments:
Post a Comment