आयुष्य सापशिडी सारखं असतं.
सृष्टी चालवणारा "क्षणाला" अंकांच्या ठोकळ्यासारखं वापरतो. सापशिडी वरती हा ठोकळा टाकला जातो. एक, दोन, तीन... अंक पडत राहतात.
आयुष्यात येणारी कोणती व्यक्ती शिडी बनेल आणि कोणती व्यक्ती सापासारखी वागेल याचा अंदाज लावता येत नाही.
पाचची अपेक्षा असतात दोन मिळतात आणि कधी तीनची अपेक्षा असताना सहा मिळतात.
सहा वरती कधी कधी साप वाट्याला येतो आणि "नेहमी कमी मिळाले म्हणून रडणारा माणूस कधी कधी जास्त मिळालं म्हणून पण रडतो."
होणाऱ्या 'वेदना' आपल्याला 'आपल्या अस्तित्वाची' जाणीव करून देतात.
काही तरी "गमावणं" हि गोष्ट "आपल्याकडे गमावण्यासारखं पण काहीतरी होतं" हे कळून देण्यासाठी गरजेचं असतं.
खेळ चालत राहतो... शिड्या मिळतात... साप गिळतात... क्षणाचे फासे पडत राहतात...
पण प्रत्त्येक क्षण काही न काही देऊन जातो.
कारण खेळातला असो व आयुष्यातला असो... अंकांच्या ठोकळ्यावर "शून्याचा" अंक नसतो. म्हणून प्रत्त्येक क्षण लुटून घ्यायचा.🎲🎲🎲
सृष्टी चालवणारा "क्षणाला" अंकांच्या ठोकळ्यासारखं वापरतो. सापशिडी वरती हा ठोकळा टाकला जातो. एक, दोन, तीन... अंक पडत राहतात.
आयुष्यात येणारी कोणती व्यक्ती शिडी बनेल आणि कोणती व्यक्ती सापासारखी वागेल याचा अंदाज लावता येत नाही.
पाचची अपेक्षा असतात दोन मिळतात आणि कधी तीनची अपेक्षा असताना सहा मिळतात.
सहा वरती कधी कधी साप वाट्याला येतो आणि "नेहमी कमी मिळाले म्हणून रडणारा माणूस कधी कधी जास्त मिळालं म्हणून पण रडतो."
होणाऱ्या 'वेदना' आपल्याला 'आपल्या अस्तित्वाची' जाणीव करून देतात.
काही तरी "गमावणं" हि गोष्ट "आपल्याकडे गमावण्यासारखं पण काहीतरी होतं" हे कळून देण्यासाठी गरजेचं असतं.
खेळ चालत राहतो... शिड्या मिळतात... साप गिळतात... क्षणाचे फासे पडत राहतात...
पण प्रत्त्येक क्षण काही न काही देऊन जातो.
कारण खेळातला असो व आयुष्यातला असो... अंकांच्या ठोकळ्यावर "शून्याचा" अंक नसतो. म्हणून प्रत्त्येक क्षण लुटून घ्यायचा.🎲🎲🎲
No comments:
Post a Comment