मन मोकळेपणाने वावरले तर म्हणतात,
पोरीला घरबंधन नाही!
शांत धीरगंभीरपणे वावरले
की म्हणतात, आमोरासमोर
बोलण्याची हिम्मत नाही!!
लग्न लवकर केले असेल तर म्हणतात,
एखादे लफड़े लपवायचे असेल !
लग्न उशिरा होत असेल तर म्हणतात,
मुलीतच काहीतरी खोट आहे !!
खुपच शिकलेली असेल तर म्हणतात,
डोक्यावर मिरे वाटेल !
शिक्षण कमी घेतले असेल तर म्हणतात,
मुलगी मागासलेली असेल !!
मित्र मंडळी असेल तर म्हणतात,
मुलगी वाया गेलेली असेल. !
मित्र मंडळी कमी असेल तर म्हणतात,
मुलगी एकलकोंडी असेल.!!
या अशा दोन्ही बाजूने लोक
बोलतात तर , माणसाने या जगात
जगावे तरी कसे
व निरपराध असताना सुद्धा मरावे
तरी कसे ??
पोरीला घरबंधन नाही!
शांत धीरगंभीरपणे वावरले
की म्हणतात, आमोरासमोर
बोलण्याची हिम्मत नाही!!
लग्न लवकर केले असेल तर म्हणतात,
एखादे लफड़े लपवायचे असेल !
लग्न उशिरा होत असेल तर म्हणतात,
मुलीतच काहीतरी खोट आहे !!
खुपच शिकलेली असेल तर म्हणतात,
डोक्यावर मिरे वाटेल !
शिक्षण कमी घेतले असेल तर म्हणतात,
मुलगी मागासलेली असेल !!
मित्र मंडळी असेल तर म्हणतात,
मुलगी वाया गेलेली असेल. !
मित्र मंडळी कमी असेल तर म्हणतात,
मुलगी एकलकोंडी असेल.!!
या अशा दोन्ही बाजूने लोक
बोलतात तर , माणसाने या जगात
जगावे तरी कसे
व निरपराध असताना सुद्धा मरावे
तरी कसे ??
No comments:
Post a Comment