इंद्रेशकुमार हजरतबल दर्ग्याला भेट देतात तेव्हा...
संघाचे प्रचारक देशाच्या विविध भागांत प्रतिकूल परिस्थितीतही आपले काम करत असतात. वैयक्तिकरीत्या आलेले अनुभव लिहिण्याची किंवा सार्वजनिकपणे मांडण्याची पद्धत संघात फार रूढ नाही. सामाजिकदृष्ट्या आणि प्रास्ताविकासाठी उपयोगी असलेल्या अनुभवांची तेवढी मांडणी केली जाते.
सध्या सोशल मीडियावर इंद्रेशकुमार यांच्या एका अनुभवाचा किस्सा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अफलातून अनुभव आहे. धर्मनिरपेक्षतेचा खरा आधार काय असू शकतो, याची प्रचीती तो अनुभव देतो.
इंद्रेशकुमार संघाचे अखिल भारतीय स्तरावरचे कार्यकर्ते आहेत. मुस्लिम राष्ट्रीय मंच नावाची संघटना त्यांनी स्थापन केली आहे. देशभरातील असंख्य मुस्लिमांचा या संघटनेला चांगला पाठिंबा आहे. इंद्रेशकुमार यांनी आपल्या प्रचारक जीवनातील दीर्घकाळ जम्मू, काश्मीर आणि लेह-लद्दाख मध्ये घालविला आहे. दहशतवादी कारवायांसाठी कुख्यात असलेल्या काश्मीरच्या खोर्यात इंद्रेशकुमार आणि संघाच्या विविध क्षेत्रांतील कार्यकर्त्यांनी केलेल्या कामांची प्रचीती ते काम पाहिल्याशिवाय येऊच शकत नाही.
आम्ही जेव्हा सिंधू दर्शनाला गेलो होतो, तेव्हा या कामाचा थोडाफार अनुभव घेतला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, टोकाचा संघर्ष करीत, प्रसंगी जीव धोक्यात टाकून या भागात संघ विचाराचे चांगले काम उभे झाले आहे. इंद्रेशजींच्या राष्ट्रीय मुस्लिम मंचाचा अनुभव आम्हाला संपूर्ण खोर्यात ठिकठिकाणी आला. श्रीनगरला राष्ट्रीय मुस्लिम मंचाच्या कार्यकर्त्यांनी आमचे जोरदार स्वागत केले. श्रीनगरातील खीर भवानी मंदिरात याच कार्यकर्त्यांनी आमच्यासाठी भोजनाची व्यवस्था केली. सोनमर्ग येथेही आमचे जोरदार स्वागत झाले. हे सर्व कार्यकर्ते इंद्रेशजींच्या कार्याने प्रभावित झालेले होते.
यात इंद्रेशजींचा एक अनुभव त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर प्रसारित केला आहे. हा अनुभव खूप काही सांगून जाणारा आहे. कथित पुरोगाम्यांची झोप उडवणारा आहे. संघ प्रचारक आपल्या जीवनात या पद्धतीने वागू शकतो यावर त्यांचा कधीच विश्वास बसणार नाही. म्हणून हा अनुभव त्यांना विचलित करणारा असू शकतो.
एकदा इंद्रेशकुमार आपल्या दोन-तीन कार्यकर्त्यांसोबत श्रीनगरच्या ख्यातनाम खीर भवानी मंदिरात दर्शनासाठी गेले. परतताना त्यांना हजरतबल दर्ग्यात जाण्याची इच्छा झाली. असे मानले जाते की काश्मीरच्या हजरतबल दर्ग्यात रसूल साहेबांच्या दाढीचा केस जतन करून ठेवला आहे. सोबतचे कार्यकर्ते म्हणाले, काही दिवसांपूर्वीच हजरतबल दर्ग्यात सैन्याने कारवाई केली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय सेना आणि हिंदू समाजाच्या प्रति त्या परिसरात असंतोषाचे वातावरण आहे. आपण न गेलेलेच बरे. पण इंद्रेशजींनी दर्ग्यावर जायचा आग्रह धरलाच.
तेथे गेल्यावर दर्ग्याच्या बाहेरच सुरक्षाकर्मींनी त्यांना अडवले. मात्र, इंद्रेशजी परतायला तयार नव्हते. शेवटी दर्ग्याच्या आत असलेले खादीम बाहेर आले आणि इंद्रेशजींना ते समजावायला लागले.
कपाळावर कुंकुम तिलक लावलेल्या संघ प्रचारक असलेल्या इंद्रेशजींनी त्यांना सांगितले, मी इंद्रेशकुमार. म्हणाल तर सनातनी आहे. मी आपले नावही बदलणार नाही आणि धर्मही बदलणार नाही. मला तुमची अरबी, फारसी भाषा येते. पण, मला या दर्ग्यात आपल्याच भाषेत आणि आपल्याच पद्धतीने इबादत करायची आहे. आपण मला प्रार्थना करू द्याल का? या प्रश्नाने सारेच खादीम गोंधळले. गेल्या अनेक वर्षांत असा प्रश्न त्यांना कोणी विचारलाच नव्हता. ते म्हणाले, बघा गेल्या दीड-दोनशे वर्षांत असा प्रश्न आमच्या समोर कधी आलाच नाही. याचे उत्तरही देणे आम्हाला कठीण आहे. हदीसमध्ये किंवा कुराणातही अशा तर्हेच्या प्रश्नाचे उत्तर आहे की नाही ते या क्षणाला आम्हाला माहीत नाही.
इंद्रेशकुमार म्हणाले की, आता हा प्रश्न तुमच्या समोर आला आहे. तेव्हा तुम्ही याचे उत्तर शोधलेच पाहिजे. दर्गा कमिटीचे २८ लोक एकत्र बसले. त्यांनी आपआपसात चर्चा केली. पण ते निष्कर्षाप्रत पोहोचू शकत नव्हते. तेव्हा इंद्रेशजी त्यांना म्हणाले की, मी आपली काही मदत करू का? इंद्रेशजी म्हणाले, कुराणात अल्लाहला रब्बुल आलमीन (सारे आलम का रब) म्हटले आहे. म्हणजे तो सर्व दुनियेचा देव आहे. जर तो सगळ्या जगाचा तारणहार आहे, तर त्याच्या जगात मी नाही का? मग मी इथे प्रार्थना का करू शकत नाही. जर तुम्ही मला प्रार्थना करू दिली नाही तर तुम्हाला रब्बुल आलमीनच्या ऐवजी रब्बुल मुसलमीन (फक्त मुसलमानोका रब) असा बदल करावा लागेल. जर आपण ही संज्ञा बदलली तर जगातला इस्लाम तुम्हाला काफिर मानेल. अल्लाह केवळ अरबी आणि फारसीच समजतो असे मानणे चूक आहे. मुका आणि बहिरा जो बोलू शकत नाही, जो ऐकू शकत नाही त्याचीही भाषा अल्लाह समजतो. पशू-पक्ष्यांची भाषा समजतो तर मग माझी भाषा तो का नाही समजणार?
हे ऐकून दर्गा कमेटीच्या लोकांनी इंद्रेशजींना दर्ग्यात जाऊन इबादतची परवानगी दिली. मात्र, इंद्रेशकुमार समजदार होते. ते म्हणाले, ही गोष्ट बाहेर कळली तर तुमचा बाकीचा समाज तुमच्यावर दोषारोपण करेल. प्रसंगी हल्ला देखील करेल. परिणामी तुम्ही परवानगी दिली असली, तरी माझ्या एकट्यासाठी दर्ग्याचे दरवाजे उघडू नका. पण आता खादीम ऐकायला तयार नव्हते. ते इंद्रेशजीला म्हणाले, बघा खुदा आमचे ऐकेल न ऐकेल तुमचे मात्र जरूर ऐकेल, असा विश्वास आमच्या मनात निर्माण झाला आहे. तेव्हा आपण जरूर दर्ग्यात जाऊन इबादत केली पाहिजे. इंद्रेशजी, खादीम आणि परिसरातील सर्व मुस्लिमांमधले अंतर पूर्णपणे संपले होते. जेव्हा इंद्रेशजी बाहेर पडले, तेव्हा दर्गा कमेटीतल्या लोकांनी त्यांचा सन्मान केला.
अत्यंत प्रामाणिक भावनेने मांडणी केली तर टोकाच्या समस्या क्षणार्धात संपुष्टात येतात, असा मोठा बोध देणारा हा अनुभव आहे. आपापल्या धर्मग्रंथात दिलेल्या शाश्वत मूल्यांकडे कसे बघायचे एवढाच फक्त प्रश्न असतो. दृष्टी बदलली की वातावरण बदलते आणि समस्या संपुष्टात येते.
शिवराय कुळकर्णी
९८८१७१७८२७
संघाचे प्रचारक देशाच्या विविध भागांत प्रतिकूल परिस्थितीतही आपले काम करत असतात. वैयक्तिकरीत्या आलेले अनुभव लिहिण्याची किंवा सार्वजनिकपणे मांडण्याची पद्धत संघात फार रूढ नाही. सामाजिकदृष्ट्या आणि प्रास्ताविकासाठी उपयोगी असलेल्या अनुभवांची तेवढी मांडणी केली जाते.
सध्या सोशल मीडियावर इंद्रेशकुमार यांच्या एका अनुभवाचा किस्सा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अफलातून अनुभव आहे. धर्मनिरपेक्षतेचा खरा आधार काय असू शकतो, याची प्रचीती तो अनुभव देतो.
इंद्रेशकुमार संघाचे अखिल भारतीय स्तरावरचे कार्यकर्ते आहेत. मुस्लिम राष्ट्रीय मंच नावाची संघटना त्यांनी स्थापन केली आहे. देशभरातील असंख्य मुस्लिमांचा या संघटनेला चांगला पाठिंबा आहे. इंद्रेशकुमार यांनी आपल्या प्रचारक जीवनातील दीर्घकाळ जम्मू, काश्मीर आणि लेह-लद्दाख मध्ये घालविला आहे. दहशतवादी कारवायांसाठी कुख्यात असलेल्या काश्मीरच्या खोर्यात इंद्रेशकुमार आणि संघाच्या विविध क्षेत्रांतील कार्यकर्त्यांनी केलेल्या कामांची प्रचीती ते काम पाहिल्याशिवाय येऊच शकत नाही.
आम्ही जेव्हा सिंधू दर्शनाला गेलो होतो, तेव्हा या कामाचा थोडाफार अनुभव घेतला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, टोकाचा संघर्ष करीत, प्रसंगी जीव धोक्यात टाकून या भागात संघ विचाराचे चांगले काम उभे झाले आहे. इंद्रेशजींच्या राष्ट्रीय मुस्लिम मंचाचा अनुभव आम्हाला संपूर्ण खोर्यात ठिकठिकाणी आला. श्रीनगरला राष्ट्रीय मुस्लिम मंचाच्या कार्यकर्त्यांनी आमचे जोरदार स्वागत केले. श्रीनगरातील खीर भवानी मंदिरात याच कार्यकर्त्यांनी आमच्यासाठी भोजनाची व्यवस्था केली. सोनमर्ग येथेही आमचे जोरदार स्वागत झाले. हे सर्व कार्यकर्ते इंद्रेशजींच्या कार्याने प्रभावित झालेले होते.
यात इंद्रेशजींचा एक अनुभव त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर प्रसारित केला आहे. हा अनुभव खूप काही सांगून जाणारा आहे. कथित पुरोगाम्यांची झोप उडवणारा आहे. संघ प्रचारक आपल्या जीवनात या पद्धतीने वागू शकतो यावर त्यांचा कधीच विश्वास बसणार नाही. म्हणून हा अनुभव त्यांना विचलित करणारा असू शकतो.
एकदा इंद्रेशकुमार आपल्या दोन-तीन कार्यकर्त्यांसोबत श्रीनगरच्या ख्यातनाम खीर भवानी मंदिरात दर्शनासाठी गेले. परतताना त्यांना हजरतबल दर्ग्यात जाण्याची इच्छा झाली. असे मानले जाते की काश्मीरच्या हजरतबल दर्ग्यात रसूल साहेबांच्या दाढीचा केस जतन करून ठेवला आहे. सोबतचे कार्यकर्ते म्हणाले, काही दिवसांपूर्वीच हजरतबल दर्ग्यात सैन्याने कारवाई केली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय सेना आणि हिंदू समाजाच्या प्रति त्या परिसरात असंतोषाचे वातावरण आहे. आपण न गेलेलेच बरे. पण इंद्रेशजींनी दर्ग्यावर जायचा आग्रह धरलाच.
तेथे गेल्यावर दर्ग्याच्या बाहेरच सुरक्षाकर्मींनी त्यांना अडवले. मात्र, इंद्रेशजी परतायला तयार नव्हते. शेवटी दर्ग्याच्या आत असलेले खादीम बाहेर आले आणि इंद्रेशजींना ते समजावायला लागले.
कपाळावर कुंकुम तिलक लावलेल्या संघ प्रचारक असलेल्या इंद्रेशजींनी त्यांना सांगितले, मी इंद्रेशकुमार. म्हणाल तर सनातनी आहे. मी आपले नावही बदलणार नाही आणि धर्मही बदलणार नाही. मला तुमची अरबी, फारसी भाषा येते. पण, मला या दर्ग्यात आपल्याच भाषेत आणि आपल्याच पद्धतीने इबादत करायची आहे. आपण मला प्रार्थना करू द्याल का? या प्रश्नाने सारेच खादीम गोंधळले. गेल्या अनेक वर्षांत असा प्रश्न त्यांना कोणी विचारलाच नव्हता. ते म्हणाले, बघा गेल्या दीड-दोनशे वर्षांत असा प्रश्न आमच्या समोर कधी आलाच नाही. याचे उत्तरही देणे आम्हाला कठीण आहे. हदीसमध्ये किंवा कुराणातही अशा तर्हेच्या प्रश्नाचे उत्तर आहे की नाही ते या क्षणाला आम्हाला माहीत नाही.
इंद्रेशकुमार म्हणाले की, आता हा प्रश्न तुमच्या समोर आला आहे. तेव्हा तुम्ही याचे उत्तर शोधलेच पाहिजे. दर्गा कमिटीचे २८ लोक एकत्र बसले. त्यांनी आपआपसात चर्चा केली. पण ते निष्कर्षाप्रत पोहोचू शकत नव्हते. तेव्हा इंद्रेशजी त्यांना म्हणाले की, मी आपली काही मदत करू का? इंद्रेशजी म्हणाले, कुराणात अल्लाहला रब्बुल आलमीन (सारे आलम का रब) म्हटले आहे. म्हणजे तो सर्व दुनियेचा देव आहे. जर तो सगळ्या जगाचा तारणहार आहे, तर त्याच्या जगात मी नाही का? मग मी इथे प्रार्थना का करू शकत नाही. जर तुम्ही मला प्रार्थना करू दिली नाही तर तुम्हाला रब्बुल आलमीनच्या ऐवजी रब्बुल मुसलमीन (फक्त मुसलमानोका रब) असा बदल करावा लागेल. जर आपण ही संज्ञा बदलली तर जगातला इस्लाम तुम्हाला काफिर मानेल. अल्लाह केवळ अरबी आणि फारसीच समजतो असे मानणे चूक आहे. मुका आणि बहिरा जो बोलू शकत नाही, जो ऐकू शकत नाही त्याचीही भाषा अल्लाह समजतो. पशू-पक्ष्यांची भाषा समजतो तर मग माझी भाषा तो का नाही समजणार?
हे ऐकून दर्गा कमेटीच्या लोकांनी इंद्रेशजींना दर्ग्यात जाऊन इबादतची परवानगी दिली. मात्र, इंद्रेशकुमार समजदार होते. ते म्हणाले, ही गोष्ट बाहेर कळली तर तुमचा बाकीचा समाज तुमच्यावर दोषारोपण करेल. प्रसंगी हल्ला देखील करेल. परिणामी तुम्ही परवानगी दिली असली, तरी माझ्या एकट्यासाठी दर्ग्याचे दरवाजे उघडू नका. पण आता खादीम ऐकायला तयार नव्हते. ते इंद्रेशजीला म्हणाले, बघा खुदा आमचे ऐकेल न ऐकेल तुमचे मात्र जरूर ऐकेल, असा विश्वास आमच्या मनात निर्माण झाला आहे. तेव्हा आपण जरूर दर्ग्यात जाऊन इबादत केली पाहिजे. इंद्रेशजी, खादीम आणि परिसरातील सर्व मुस्लिमांमधले अंतर पूर्णपणे संपले होते. जेव्हा इंद्रेशजी बाहेर पडले, तेव्हा दर्गा कमेटीतल्या लोकांनी त्यांचा सन्मान केला.
अत्यंत प्रामाणिक भावनेने मांडणी केली तर टोकाच्या समस्या क्षणार्धात संपुष्टात येतात, असा मोठा बोध देणारा हा अनुभव आहे. आपापल्या धर्मग्रंथात दिलेल्या शाश्वत मूल्यांकडे कसे बघायचे एवढाच फक्त प्रश्न असतो. दृष्टी बदलली की वातावरण बदलते आणि समस्या संपुष्टात येते.
शिवराय कुळकर्णी
९८८१७१७८२७
No comments:
Post a Comment