Total Pageviews

Tuesday, September 16, 2014

|| शुभ दिवस 2 ||

रांगोळी पुसली जाणार हे माहीत असूनही ती जास्तीत जास्त रेखीव काढण्याचा आपला प्रयत्न असतो.
तसेच, आपले जीवनही पुसले जाणार आहे हे माहीत असूनही आपण ते रांगोळीप्रमाणेच जास्तीत जास्त सुंदर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

माणूस कधीच छोटा किंवा मोठा नसतो..


प्रत्येक माणूस आप-आपल्यापरीनं निसर्गाची 'एकमेव अप्रतीम कलाकृती' असतो..
 

 कधीही कोणाची कोणाशी तुलना करू नये..अगदी स्वतःचीही..!!
 

स्वच्छ पाण्याचा जसा तळ दिसत असला ना की, पाण्यात उतरण्याची भीती वाटत नाही.
तसंच माणसाच्या बाबतीत असतं त्याच्या मनाचा तळ समजला की, त्याच्या सहवासाची भीती वाटत
नाही...आणि नातही स्वच्छ वाटू लागतं....... 


|| शुभ दिवस ||

Wednesday, September 10, 2014

Maharashtrian food Dishes

reference - http://www.storypick.com/maharashtrian-dishes/


The whole of Maharashtra is crazy about food. They pride themselves in having the best, most exclusive restaurants of the country as well as the cheapest and yet mouth-watering tapdis for their street food. Here’s a list of 19 drool-worthy Maharashtrian recipes that will make you leave everything you’re doing:

1. Vada Pav

The staple snack for every Maharashtrian, this delicacy was made more popular courtesy Bollywood. Try the recipe here.

2. Shakarpara

Shakarpara
Although Shakarpara is a famous festival snack, you don’t need to wait for a festival to try this recipe out.

3. Aluvadi

Alu-Vadi
This deep fried recipe made from Spinach or Colocasia leaves is slightly sweet and tangy and is the perfect monsoon snack. Check the recipe here.

4. Sabudana Vada

Sabudana-Vada
Now I’m confused about which one is the perfect monsoon snack. Made from sago these deep fried snacks are light on your taste buds and extremely delicious. The recipe? Here.

5. Bhakarwadi

Bhakarwadi
Once you taste this slightly sweet, slightly tangy snack there’s no going back. It’s that delicious. Here’s the recipe for you.

7. Kothimbir Vadi

Kotmir-Vadi
One of the most famous Maharashtrian snacks, Kothimbir is the Marathi word for coriander and is extremely delicious. Here’s the recipe for you.

8. Misal Pav

One of the most delectable breakfast + brunch + snack recipe of Maharashtra this is a must-have and must-make

9. Pav Bhaji

Pav-Bhaji
Mumbai’s next best street food, this recipe is sure to make your mouth water just by looking at it. Here’s the recipe for you to try.

10. Thalipeeth

Thalipeeth
This savory, three-flour version of Indian pancakes are particularly famous in Maharashtra and here’s the recipe for you.

11. Puran Poli

Puran-Poli-1
Traditionally made  during festivals, this is the most filling sweet from the Maharashtrian cuisine. Check the recipe here.

12. Pithale

Pithale
This curry made from gram flour has just the right amount of tang in it and can be served with rice or roti. Either way, this recipe is delicious.

13. Pandhara Rassa

Pandhara-Rassa
Pandhara Rassa in Marathi translated,  is literally white gravy. It is the not-so-spicy, but yet completely delicious delicacy from Kolhapur. You can try the recipe here.

14. Tambada Rassa

Tambda-Rassa
The other brother from Kolhapur is not so sweet. The Tambada Rassa is as spicy as it looks, but still a much loved recipe.

15. Sabudana Khichdi

Sabudana-khichdi
Although this khichdi recipe made from sago is mostly seen during times of fasting, you can try it out here because it’s that tasty.

16. Sol Kadhi

Sol-Kadhi
Sol Kadhi is literally the soul of all Maharashtrian food and tastes good whichever way it is had. Here’s the recipe for you.

17. Modak

Modak
This sweet is Ganpati’s favourite for a reason. And if you don’t know that reason then you should try this recipe out.

18. Shrikhand

Shrikhand-1
This recipe is not for the weight watchers, but who cares about weight if it’s this deliciously mouth watering. Want to try it at home? Here’s the recipe.

19. Aamrakhand

Aamrakhand
Okay. You can share this recipe but never share your Aamrakhand. But I don’t need to tell you that because once you’ve tasted this mango flavoured shrikhand you won’t share it anyway.

मन जरा आज उदास झालय...

का कोणास ठाऊक मन जरा आज उदास झालय..
कोणालातरी निरोप द्यायचा हे मनातल चित्र पाहून
मन जरा पोरकं झालय..

ज्यांना जायचं असतं ते जातातच..

आपल्या आयुष्यातून ज्यांना जायचं असतं ते जातातच
आणि थांबायचं असतं ते थांबतातच, त्याला आपण
काहीही करू शकत नाही... थांबणाऱ्याला कारण म्हणून
तुमचा एक चांगला गुण पुरे असतो,
आणि जाणाऱ्याला तुमचा एक वाईट गुणही पुरे असतो....
गरज संपली की कोमेजलेल्या फुलालाही, झाड स्वतःजवळ ठेवत नाही...

नातं आणि गाणं

नातं आणि गाणं अगदी एकमेकांसारखे असतात
हव्या तेवढ्या नेमक्या अंतरावर असणं म्हणजे सूर
त्यापेक्षा जास्त किंवा कमी अंतरावर असणं म्हणजे दूर

तर अजिबात प्रपोज करू नका....

..तर अजिबात प्रपोज करू नका
नात्यामध्ये तुम्ही कमिटेड होण्याच्या विचारात आहात का? त्यासाठी खालील कारणं महत्त्वाची मानत असाल, तर तुम्ही चुकीच्या मार्गावर जात आहात. त्यामुळे त्यांचा विचार करा आणि निर्णयावरही फेरविचार करा.
तो/ती छान आहे
तो किंवा ती छान आहे हे कारण कोणत्याही नात्यासाठी फुटकळ ठरणारं आहे. तुम्हाला शंभर 'छान' मुलं किंवा मुली मिळून जातील, त्यामुळे हे कारण गृहित धरू नका. नात्यात गुंतण्यासाठी कोणताही जोडीदार केवळ छान असणं महत्त्वाचं नसतं, तर त्याच्या स्वभावाचे प्रत्येक पैलू माहीत असावे लागतात. तिच्या किंवा त्याच्यापेक्षा चांगलं किंवा उत्तम शोधण्याचा प्रयत्न करा.
एकमेकांना खूप आधीपासून ओळखतो
तुम्ही पंधरा वर्षाचे होता, तेव्हापासून एकमेकांना ओळखता आणि आता २५ वर्षांचे झालात, तरी एकत्र आहात. हे कारण प्रपोज करण्यासाठी नक्कीच पुरेसं नाही. जास्त वेळ एकत्र आहात याचा अर्थ लग्न केलंच पाहिजे असा काही नियम नाही. नवरा-बायको बनण्याचा अट्टहास नको. त्याच्याबरोबर किंवा तिच्याबरोबर उर्वरित आयुष्य घालवण्यासाठी तुम्ही खरोखरच इच्छुक आहात का किंवा तिच्या/त्याच्यासोबत एकत्र राहाण्यात तुम्हाला रस वाटतो का हे पाहा. तिच्या/ त्याच्याशिवाय राहाणं आता मुश्कील आहे अशी भावना असेल, तर प्रपोज करायला हरकत नाही.
माझ्या आईला तो/ती आवडते
आपल्या आईबाबांना ती/तो सून किंवा जावई म्हणून पटते. किंवा त्यांनी तसंच मानलंय, अशी कारणं असतील, तर प्रपोज करण्याचा विचारही मनात आणू नका. तुम्हाला त्या व्यक्तीबरोबर आयुष्यभर राहायचंय, त्यामुळे आई-बाबांच्या भावनेपेक्षा तुमच्या भावना महत्त्वाच्या.
तिचं/त्याचं कुटुंब एकदम मस्त आहे
कुटुंबासाठी नाही, तर स्वतःसाठी लग्न करा. अन्यथा तुमच्या वैवाहिक आयुष्यात समस्या आल्यास नातं शेवटाला जाऊ शकतं. त्यामुळे कुटुंब मस्त आहे म्हणून ती व्यक्तीही छानच असेल असं नाही. मग हे कारण नकोच.
जवळीकता
मध्यंतरी शारीरिक जवळीकता आली होती आणि त्याचं ओझं मनावर आहे, हे कारण तसं संवेदनशील आहे; पण या कारणाला घाबरून किंवा लाजिरवाणं वाटून नात्यात बांधले जाऊ नका. संकुचित विचार न करता निर्णय घ्या.
तो/ती जास्त पैसे कमवते/कमवतो
पैसा हा सर्वस्व नाही. त्यामुळे त्याच्या हव्यासापोटी नात्यात बांधले जाऊ नका. पैशांमुळे सुखसोई येतात. सुख नाही, हे पक्कं लक्षात ठेवा. पैशापेक्षा प्रेम आणि आपुलकीच महत्त्वाची असते.
मित्रांच्या नादाने
तुम्ही तिशी पार केली आहे आणि या वयात तुमचे इतर मित्रमंडळी लग्नबंधनात अडकले आहेत, त्यांना मुलंबाळं झाली आहेत... पण तुमच्या बाबतीत मात्र अजून अफेअरचाही पत्ता नाही. मग तुम्ही निराश वगैरे झाला आहात. केवळ या नैराश्यापोटी कुणालातरी प्रपोज करण्याच्या विचारात असाल, तर चुकीच्या वाटेवर जात आहात. नात्याची घाई करू नका. अन्यथा लग्नानंतर समस्या निर्माण होतील आणि ते डोईजड होईल. नुसतंच लग्न करावंसं वाटतंय म्हणून कुणालातरी प्रपोज करून उपयोगाचं नाही. जर त्या व्यक्तीशी लग्न करावंसं वाटत असेल तर मात्र जरूर विचार करा.
तिचं/त्याचं प्रेम आहे म्हणून...
कमिटमेंटसाठी केवळ एकाचं प्रेम असून फायद्याचं नाही. दोघांचंही एकमेकांवर प्रेम असणं महत्त्वाचं आहे. नात्यात जबरदस्ती करून फायद्याचं नसतं हे लक्षात घ्या.
आमच्यातली मैत्री लई भारी
काहीजणांकडे मित्र किंवा मैत्रीण म्हणून आपण पाहू शकतो; पण ती व्यक्ती जोडीदार म्हणून योग्य असेलच असं नाही.

मुंबई टाइम्स
Sep 10, 2014

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेछा!

अंधारावर राज्य करणारया चंद्राच्याही
डोळ्यात खुपतो आम्ही...
कारण
उशाला तलवारी घेऊन झोपतो आम्ही...
मुंडके उडवले तरी चालेल
पण मान कुणापुढे वाकणार नाही l

डोळे काढले तरी चालेल
पण नजर कुणापुढे झुकणार नाही l
जीभ कापली तरी चालेल
पण प्राणाची भिक मागणार नाही l
हात कापले तरी चालेल
पण हात कुणापुढे जोडणार नाही l
पाय तोडले तरी चालेल
पण आधार कुणाचा घेणार नाही l
गर्व नाही माज आहे या मातीला
मर्द मराठा म्हणतात या जातीला l
" मरण आले तरी चालेल,
पण शरण जाणार नाही.
प्राण गेला तरी चालेल,
पण हिंदू धर्म सोडणार नाही.
माघार घेणे हे मावळ्यांच्या रक्तात नाही
!!

 




वयाच्या १६ व्या वर्षी स्वताचा हाताच्या अंगठ्याचे रक्त सांडून स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा ज्यांनी केली.
सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी समजून साडे तीनशे वर्षा पूर्वी केलेला राज्यकारभार आजही आपल्याला मार्गदर्शक आहे. अशा त्या स्वराज्य संस्थापक कल्याणकारी श्री. छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त
मनाचा मुजरा!!!

मला माणसे जोडायला आवडतात

मला माणसे जोडायला आवडतात,
माणसांशी नाती जोडायला आवडतात
जोडलेली नाती जपायला आवडतात,
कारण
माझा विश्वास आहे की, माझ्या मृत्यूनंतर
मी कमावलेली संपत्ती
मी माझ्याबरोबर घेऊन जाणार नाही,
परंतु
मी जोडलेल्या माझ्या माणसांच्या डोळ्यांतील
अश्रूंचा एक थेंब हाच
माझ्याकरिता लाखमोलाचा दागिना आणि हीच
माझी माझ्या आयुष्यातीलॊ खरी कमाई
असेल...
तुमचे आणि माझे हे नाते
माझ्यासाठी अनमोल आहे ...

बायको नवरा - Jokes

बायको : माझा मोठेपणा बघा...मी तुम्हाला नं बघताच तुमच्याशी लग्न केलं.

.
.
.
.
.
.

नवरा : माझा मोठेपणा बघ... मी तुला बघून पण तुला नकार नाही दिला.!


--------------------------  --------------------------  -------------------------- 

पति :- आज घर आवरलेलं आहे . तुझं व्हाट्सअप बंद होंत का आज ?

पत्नी :- नाही हो.
फोनचा चार्जर सापडत नव्हता .
तोच शोधण्याच्या नादात घर आवरलं गेल..!


--------------------------  --------------------------  --------------------------
 

कोणाच्या तोंडात जनतेने डांबर घालायचे....?

चपाती खराब निघाली म्हणून
नेतेमंडळी केटरिंग च्या तोंडात
रोटी घालतात ,
मग आमचे डांबरी रस्ते खराब
होतात लगेच;
मग काय
आता कोणाच्या तोंडात जनतेने डांबर घालायचे....?

अधिक खाण्याविषयी थोडसं ( पु.ल.देशपांडे )

पु.लं.चे:

खाण्याचंसुद्धा शास्त्र आहे.
रागांना वर्ज्यबिर्ज्य स्वर असतात, तसे खाण्यालासुद्धा असतात. उदाहरणार्थ, श्रीखंड घ्या. बाकी, जोपर्यंत मला प्रत्यक्ष काही द्यावं लागत नाही तोपर्यंत 'घ्या' म्हणायला माझं काय जातं म्हणा! तर श्रीखंड पावाला लावून खा," म्हटलं तर तो खाणार नाही. वास्तविक पाव हा देखील पुरीसारखा गव्हाचाच केलेला असतो; पण श्रीखंडाच्या संदर्भात तो वर्ज्य स्वर आहे. पाव आणि अंड्याचं आमलेट ही जोडी शास्त्रोक्त आहे. पुरी आणि आमलेट हे एकत्र सुखांन नांदणार नाहीत. जिलबी आणि मठ्ठा यांचा संसार जसा सुखाचा होतो तसा जिलबी आणि...छे! जिलबीला अन्य कुणाशी नांदायला पाठवण्याची कल्पनाच रुचत नाही.

खाण्याचे हे कायदे सांभाळून खाण्याला खानदानी मजा आहे. सुरांचे वर्ज्यावर्ज्य नियम पाळून गाण्याला जसं खानदानी गाणं म्हणतात. तसंच पदार्थाची कुठली गोत्रं जुळतात त्याचा विचार करून ते पानात वाढण्याला खानदानी खाणं म्हणतात. राग्याप्रमाणंच खाण्याच्या वेळा सांभाळल्या पाहिजेत. सकाळी यमन बेचव वाटतो. सकाळी थालीपीठही बेचव वाटतं. मारवा राग जसा संधिकालातला, तसंच थालीपीठदेखील साधारणतः भीमपलास आणि पूरिया धनाश्री या रागांच्या वेळांच्या मधे बसतं सारंगाच्या दुपारच्या वेळेला थालीपीठ खाऊन पहा. आणि संध्याकाळी साडेपाच-सहाच्या सुमाराला नको म्हणून पहा.

बाहेर पाऊस पडत असताना ज्याला गरम भजी म्हणून खावीशी वाटली नाहीत, तो मनुष्य चळलाच म्हणून समजावं. सकाळी तीन भजी खाल्ली तरी अधिक. पण बाहेर पाऊस पडतो आहे, हवेत गारवा आहे, रमी किंवा ब्रिजमध्ये आपण जिंकतो आहो, अशा वेळी शेकडो भजी खाल्ली तरी ती अधिक नाहीत. अधिकचं हे असं आहे. लोक भलत्या वेळी, भलत्या ठिकाणी आणि भलतं खातात. हॉटेलात जाऊन भेळ खाण्या-याचं पोट नव्हे, मुख्यत: डोकं बिघडलेलं असतं. शहाळ्याचं पाणी हापिसात बसून पिणा-याची प्रमोशनं थांबवली पाहिजेत. मसाल्याच्या दुधावर पान खाल्लं पाहिजे. आणि चहाबरोबर भलतंच खातात.. आणि चहावर धुम्रपान केलं पाहिजे. खाण्यापिण्याचंही काही शास्त्र आहे. ह्या भारतात एके काळी हे शास्त्रवेते होते. उपासांच खाणंदेखील शोधून काढणारी ती विद्वान माणसं माझ्या माहितीत आहेत. उपास लागणा-या माणसाइतकीच उपासाचे पदार्थ जास्त झाल्यामुळं जरा जड वाटतंय म्हणणारी माणसं आहेत.

लग्नाला पंक्ती, गावजेवणं, समाराधना वगैरेचा तो जमाना होता. 'हरहर महादेव'ही आरोळी रणक्षेत्राप्रमाणं वरणक्षेत्रादेखील उठत असे. माणसं बसल्या बैठकीला शंभर जिलब्या तोंडी लावणं म्हणून उठवत, त्यानंतर आग्रह सुरू होई. सा-या सणांतून खाणे काढून टाका नि काय उरते पाहा. सारी भारतीय संस्कृती खाण्याभोवती गुंतली आहे;नव्हे, टिकली आहे. होळीतून पोळी काढली की उरतो फक्त शंखध्वनी तो देखील पोळी मिळणार नसेल तर क्षीणच व्हायचा. दिवाळीतून फराळ वगळा, नुसती ओवाळणीची वसुली उरते. संक्रातीच्या भोगीला जोवर तीळ लावलेली बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत आणि तिळगूळ आहे तोवर 'गोड गोड बोला' म्हणतील लोक.

कोजागिरी पौर्णिमेतनं आटीव केशरी दुध वगळा, उरेल फक्त जागरण आणि कुठल्या तरी सस्त्यात मिळालेल्या उमेदवार गवयाचं गाणं. गणेशचतुर्थीला मोदक नसले तर आरत्या कुठल्या भरवशावर म्हणायच्या? रामनवमीच्या सुंठवडा, कृष्णाष्टमीच्या दहीलाह्या, दत्तापुढले पेढे, मारुतरायापुढलं साधं खोबरं अन, खडीसाखर... सा-या देवांची मदार या खाण्यावर आहे. हेच गाळलं की हल्लीच्या लग्नासारखं व्हायचं. पाहुण्यांचे हात ओले करण्याऎवजी आहेराच्या रूपानं स्वतःचे हात धुवून घेण्याचा कार्यक्रम. पंगती उठवण्याऎवजी कर्कशकर्ण्यातून रेकॉर्डस ऎकवून येणा-याचं डोकं उठवायचं.

-- अधिक खाण्याविषयी थोडसं ( पु.ल.देशपांडे )

हरतालिका व्रत ( भाद्रपद शुद्ध तृतिया )

गणेश चतुर्थींच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतियेला "हरतालिका` असे म्हणतात. या दिवशी गणपतीच्या आईची म्हणजे पार्वतीची पूजा हिंदू महिला करतात. 

हरतालिका या शब्दाची फोड "हरित` म्हणजे "हरण` करणे आणि "आलिका` म्हणजे "आलिच्या`-मैत्रिणीच्या असा आहे. मैत्रिणींच्या साह्याने पार्वतीने केलेले शंकराचे हरण, असा या शब्दाचा अर्थ आहे. हिंदू कुमारिका आपल्याला हवा असलेला, आपल्या मनासारखा सुरेख पती मिळावी म्हणून "हरतालिका` हे व्रत अत्यंत श्रद्धापूर्वक करतात. काही जणी हे व्रत कडक करतात. आपल्याकडे विवाहित स्त्रिया हे व्रत करतात. विवाह झाल्यानंतर इच्छित पती मिळाल्यावर हे व्रत करण्याचा काय अर्थ आहे? पण एकदा घेतलेले शंकराचे व्रत मोडू नये अशी महिलांची श्रद्धा असते म्हणून त्याही हे व्रत आजन्म करतात.

हिमालयाचा राजा हिमवान याची पार्वती ही कन्या. पर्वताची कन्या म्हणून तिचे नाव "पार्वती` असे ठेवण्यात आले. तिचे लग्न कोणाबरोबर करावे अशी काळजी त्याला लागली होती. एकदा नारदमुनी हिमवानाकडे आले आणि त्याला म्हणाले, "हे पर्वतश्रेष्ठा ! तुझ्या या सुस्वरुप मुलीला मागणी घालण्यासाठी भगवान विष्णूंनी मला तुझ्याकडे पाठविले आहे. ते ऐकून हिमवानाला आनंद झाला. त्याने पार्वतीला ती बातमी सांगितली. पण पार्वतीने मनोमन कैलासराणा शंकराला पती म्हणून वरले होते. तसे प्रत्यक्ष पित्याला स्पष्टपणे सांगण्याचे धैर्य तिला झाले नाही. तिने आपल्या मैत्रिणींबरोबर आपल्या पित्याला निरोप पाठवला. "तुम्ही माझा दुसऱ्या कोणाबरोबरही विवाह करून दिला तर मी जीव देईन.`


पार्वती आपल्या मैत्रिणींसह अरण्यात निघून गेली. तिथे तिने घोर तपश्‍चर्या केली. नदीकाठी वाळूचे शिवलिंग तयार करून ती त्याची पूजा करू लागली. प्रथम ती फक्त झाडाची कोवळी पाने खाऊन राहत होती. पुढे तिने तेही सोडून दिले. त्यामुळे तिला "अपर्णा` असे नाव पडले. तिच्या तपश्‍चर्येने भगवान श्रीशिवशंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला वर मागायला सांगितले. ती म्हणाली, "तुम्ही माझ्या तपश्‍चर्येमुळे खरोखर प्रसन्न झाला असाल, तर माझे पती व्हा.` शंकराने "तथास्तु` म्हटले व निघून गेले. पार्वतीचा शोध घेत हिमवान त्या अरण्यात आला. तिला त्याने घर सोडून येण्याचे आणि तपश्‍चर्येचे कारण विचारले. तेव्हा तिने आपला दृढ निश्‍चय आपल्या वडिलांना सांगितला. भगवान श्रीशंकरांनी दिलेला वरही सांगितला.


तिचा दृढनिश्‍चय, श्रद्धा पाहून हिमवानाने तिचा विवाह भगवान श्री शंकराशी करून दिला. पार्वतीची निष्ठा आणि श्रद्धा व भक्ती यांचा विजय झाला. पार्वतीच्या शंकरावरील निष्ठेमुळे, प्रेमामुळे शंकराला "पार्वतीपती` असे नामाभिधान पडले.


इच्छित पती शंकराची प्राप्ती पार्वतीने आपल्या मैत्रिणींच्या साह्याने प्राप्त करून घेतली. पार्वतीने आपला वर कडक तपश्‍चर्येने मिळविला. त्याप्रमाणे मनाजोगता पती मिळावा म्हणून हिंदू कुमारिका, महिला हे व्रत श्रद्धापूर्वक करतात. या दिवशी दिवसभर उपवास करतात. काही जणी तर दिवसभरात पाण्याचा थेंबही तोंडात घेत नाहीत.


रात्री 12 वाजता बेलाचे पान चाटून, काही जणी रुईच्या पानावर मध लावून ते पान चाटून, तर कोणी खडीसाखर, केळी यांसारखे अगदी थोडेसेच खाऊन उपवास करतात. अर्थातच ज्यांना इतके कडक व्रत करता येत नाही. त्या स्त्रिया उपवासाचे पदार्थ खाऊन व्रत करतात.


या व्रताच्या वेळी स्वच्छ केलेल्या जागेवर एका जागी चौरंग ठेवतात. केळीच्या खांबांनी चारही बाजूंनी सुशोभित केलेल्या चौरंगावर पार्वती आणि शंकराची स्थापना करून त्याची षोडशोपचारे पूजा करतात. धूप-दीप, नैवेद्य दाखवून वेगवेगळ्या प्रकारची पत्री (पाने), फुलांची पूजा केली जाते. धूप-दीप, निरांजन दाखविला जातो. हरतालिकेच्या पूजेत जी पत्री वाहतात. त्यात जाई, शेवंती, पारिजातक , तुळशी, रुई, शमी, दुर्वा, आघाडा, चाफा, केवडा, डाळिंबाची पाने वाहतात. मनोभावे प्रार्थना करतात. "सखे पार्वती, तुला जसा इच्छित वर मिळाला तसा आम्हाला मिळू दे. अखंड सौभाग्य लाभू दे`, अशी प्रार्थना करून आरती केली जाते.
या दिवशी पूजा झाल्यावर सुवासिनी, कुमारिका रात्रभर जागरण करतात. झिम्मा, फुगडी, टिपऱ्या, गोफ इत्यादी खेळ खेळतात.

ll अनंत चतुर्दशी ll

ll अनंत चतुर्दशी ll
.
अनंतं वासुकीं शेषं पद्मनाभं च कम्बलं। शंखपालं धृतराष्ट्रं तक्षकं कालीयं तथा॥ ही नऊ नागांची नावे आहेत. पूर्वीच्या काळी नागांचा आणि सर्पांचाही वावर खूपच अधिक होता. एकतर त्यामुळे नागांची प्रार्थना करुन त्यांनी आपल्याला दंश करु नये, अशी अपेक्षा बाळगली जात असे. आता नागांचीही वस्ती खूपच कमी झाली आणि सर्पजातीचे महत्त्वही लोकांना कळले. मात्र आपल्याकडे एक समज हा नागांमध्ये काही देवदेवतांचा वास असतो, असा आहे. वास्तुपुरुष नागाच्या रुपाने त्या-त्या वास्तुत राहतो आणि वास्तूचे रक्षण करतो, अशी पूर्वापार समजूत होती. वड-पिंपळ यासारख्या वृक्षांकडे किंवा काही देवदेवतांच्या घुमटीत, छोटी मंदिरे अशा ठिकाणी काही भ्रष्टाचार झाला तर नाग दर्शन देई आणि मग तो भ्रष्टाचार झाल्याबद्दल त्याची क्षमा मागावी लागे, अशी सार्वत्रिक श्रध्द होती.

आपल्या सणावारांचा प्रारंभ प्रतिवर्षी नागपंचमीपासून होतो आणि त्यातील एक पर्व अनंत चतुर्दशीला संपते. उद्या अनंत चतुर्दशी! अनंत चतुर्दशीनंतर लागलीच एका दिवसाने पितृपक्ष सुरू होतो. पितृपक्ष शुभकार्यास वर्ज्य मानला जातो. तो संपताच नवरात्राचा प्रारंभ होतो. भवानीदेवीचा जयजयकार सर्वत्र मुक्तकंठाने सुरू होतो आणि पुन्हा सणांचे दुसरे चक्र दसरा, दिवाळी, कोजागिरी पौर्णिमा, दत्तजयंती, होळी असे सुरू होते. अनंत हे एका महानागाचे नाव असले आणि हे नाव जपणे पुण्यकारक मानले जात असले तरी अनंत हे विष्णुचे नाव आहे, हे नजरेआड करता नये. अनंत चतुर्दशीच्या दिवशी विष्णुची 'अनंत' ह्या नावाने पूजा केली जाते. अनंत चतुर्दशीचे व्रत खूप घरातून पाळले जाते. १४ प्रकारची फुले, १४ प्रकारची फळे, १४ प्रकारची धान्ये आणि १४ प्रकारचे नैवेद्य दाखवून एका दोरकासह अनंताची पूजा केली जाते. हा दोरक म्हणजे दोरा अनंत म्हणूनच ओळखला जातो. हा उजव्या हाताच्या मनगटावर बांधतात आणि तो सर्वप्रकारच्या संकटापासून रक्षण करतो, अशी श्रद्धा असते. ह्या व्रताचा विशेष असा की, ही पूजा झाल्यानंतर विसर्जन मागाहून दुस-या दिवशी किंवा गणपती पूजेप्रमाणे दोन, पाच दिवसांनी अशाप्रकारे न करता त्याच दिवशी पूजेनंतर काही वेळाने करण्याची रुढी आहे. हे अनंताचे व्रत १४ वर्षे आचरावे असे सांगितलेले असले तरी अनेक लोक ते आजन्म पाळत असतात.

ह्या व्रताची कथा सत्यनारायणाच्या कथेसारखीच आहे. म्हणजे कोणी अडचणीत सापडला असता त्याला दुस-या कोणी तरी अनंताचे व्रत करण्यास सांगितले आणि त्यामुळे त्याचे दुःख निवारण झाले. पुढे तो हे व्रताचरण विसरला आणि त्याच्यावर घोर आपत्ती आल्या, अशा स्वरुपाच्या या व्रताच्या कथा आहेत. नेहमीप्रमाणे ह्या कथेचाही नायक एक ब्राह्मण आहे. त्याच्या पत्नीने एका कन्येला जन्म दिला, तिचे नाव शीला! तिच्या जन्मानंतर ब्राह्मणाची पत्नी दिवंगत झाली. सुमंतुने म्हणजे त्या ब्राह्मणाने दुसरा विवाह केला. ती पत्नी अतिशय कर्कशा होती. पुढे ह्या शीलेचा विवाह कौंडिण्य ॠषीशी झाला. 'निरोप देताना जावयाला काहीतरी देऊ या,' असे सुमंतुने म्हटल्यावर त्याची कर्कशा पत्नी आडवी आली. तिने सुमंतुला ते देऊ दिले नाही. उलट जावयाला आणि लेकीलाही दुरुत्तरे केली. ती पतीबरोबर सासरी जात असताना वाटेत एकेठिकाणी काही स्त्रिया अनंताचे व्रत आचरित असताना तिला दिसल्या. त्या स्त्रियांकडे शीलेने व्रताची चौकशी केली आणि ती त्या दिवसापासून ते व्रत आचरु लागली. व्रताच्या प्रभावाने तिला म्हणजे कौंडिण्याला वैभवाचे दिवस आले. तो खूप श्रीमंत झाला आणि त्याला श्रीमंतीची धुंदी चढली. एके दिवशी त्याने शीलेच्या हातातील अनंताचा दोर तोडून टाकला आणि त्यामुळे अनंत त्याच्यावर रागावला. कौंडिण्याचे सर्व वैभव गेले. त्याला पश्चाताप झाला आणि मग त्याच्या सहनशीलतेचा अंत पाहून अनंताने ब्राह्मणरुपात त्याला दर्शन दिले आणि पुन्हा व्रताचरण करण्यास सांगितले. त्यामुळे कौंडिण्याला पुन्हा वैभव प्राप्त झाले.

ही कथा साधारणपणे आपल्या सत्यनारायणाच्या कथेशी मिळतीजुळती असली तरी सत्यनारायणाच्या पूजेपेक्षा हे व्रत खूपच प्राचीन आहे यात शंका नाही. सत्यनारायणाची पूजा ही आपल्याकडे अलीकडे आली.

अनंत चतुर्दशीचे महत्त्व अधिक वाढविणारा योग म्हणजे उद्या गणेशोत्सवातील मूर्तीचे विसर्जन सगळीकडे थाटामाटात केले जाईल. जलाशयात मूर्ती विसर्जित करावयाच्या असा धर्मनियम असल्यामुळे समुद्र, नद्या, विहिरी अशा ठिकाणी गणेशभक्त वाजतगाजत जाऊन मूर्तीचे विसर्जन करतात. सगळीकडे आनंदाचा जल्लोष चालू असतो आणि अशा जल्लोषामुळे अनंत चतुर्दशी हा अनंताच्या व्रताचा दिवस आहे, ही गोष्ट फारशी कोणाच्या ध्यानातच येत नाही.

Article Source : Maharashtra Times - Year 2010 (- ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर )

नेत्यांनो 'हे' लक्षात घेऊन चाला..

कोणत्याही सोम्यागोम्याला पक्षात घ्या..पण निदान त्यांच्या या बदललेल्या निष्ठा कितपत सच्च्या आहेत ते किमान जाणुन घ्यायची तोशीस तरी घ्या..
छोटीशीच परीक्षा घ्या नुकत्याच पावन झालेल्या या सर्वांची..यापैकी कोणाला म्हणजे अगदी कोणालाही पुढील किमान पाच वर्षे ग्रामपंचायतीचे पण तिकीट देऊ नका..


त्यांना कार्यकर्ता म्हणून काम करू द्या..
 

आणि मग समजा जर ते चुकुनमाकुन टिकले तर खुशाल तिकीट द्या..मग ते भले लोकसभेचे असले तरी चालेल..
 

बाकी काही नाही पण एवढं तरी कराच...
जमेल का तुम्हाला ??

शिवाजी महाराज दिसायला कसे होते ? ( How was Raja Shivaji Maharaj looked ? )

शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष पाहिलेली अनेक माणसे त्यावेळी होती . पाश्चिमात्यात हेन्री ऑक्झेडन , निकालो मनुची , थेव्हनॉट , उस्टीक , इ. तर भारतीयात परमानंद , परकलदास इ. परंतू फारच थोड्या व्यक्तीँनी शिवरायांच्या व्यक्तिमत्वाबद्दल किँवा शारीरिक ठेवणीबद्दल प्रत्यक्षात नोँद करुन ठेवली आहे .
शिवछत्रपती कसे दिसत होते ...

इ.स. १६६४ मध्ये सुरतेच्या लुटीच्या वेळी वखारीतल्या इंग्रज अधिकारी एस्केलिऑट याने केलेले वर्णन-
"His personality is described by them , who have seen him , to be of mean stature (medium height) lower some what than i am (when) erect and of an excellent proportion . Actual in exercise ane whenever he speaks seems to smile , a quick and piercing eye and witter than any of his people."

अर्थ-
'शिवाजी आपल्या दक्षिणेकडील इतर मावळ्यांपेक्षा उजळ वर्णाचा असून मध्यम बांध्याचा आहे . त्याची मान व खांद्याचा भाग पुढे झुकलेला दिसतो ; परंतु शरीर मात्र अत्यंत प्रमाणबध्द आहे . कोणतीही गोष्ट नजरेत तत्काळ पकडणारी भेदक दूरदृष्टी हे त्याचे खास लक्षणीय वैशिष्ट्य आहे.'

इ.स. १६६६ साली फ्रेँच प्रवासी थेव्हनॉट वर्णन करतो ,
"This Raja is short and tawny , with quick eyes that shew a great deal of wit . He eats but ones a day commonly and is in good health ."

अर्थ-
"हा राजा ठेँगणा व पिवळसर गौर वर्णाचा आहे . नेत्र तेजस्वी असून बुध्दीमत्तादर्शक आहेत . तो दिवसातून फक्त एकदाच भोजन करतो आणि (तरीही) त्याची प्रकृती उत्तम आहे ."

इ.स. १६६६ मध्ये राजे आग्र्यात गेले असताना तिथे परकलदास याने राजांना पाहिले . तो लिहितो ,
" अर सेवाजी डेल तो हकीर छोटो सो ही देखता दीस जी । अर सुरती बहुत अजाइब गौरो रंग अपुछो राजवी देसौ जी । हिम्मती मरदानगी ने देखता ही असौ दिसो जू बहुत मरदानो हिम्मतबुलंद आदमी छो । सेवाजी के दाढी छै ।"

अर्थ-
" प्रथमदर्शी दिसण्यात शिवाजी हा बांध्याने किरकोळ आहे . पण त्याचा रंग विलक्षण गोरा आहे . त्याचे राजतेज असे की कोणीही त्याला पाहिले की आपोआपच वाटावे की हा राजाच असला पाहिजे . त्याची हिम्मत आणि मर्दुमकी पाहिली की हा बुलंद हिमतीचा मर्द माणूस असला पाहिजे असे वाटू लागते . शिवाजीला दाढी आहे ."

कॉस्मा द गार्द या पोर्तुगीजाने केलेले वर्णन (१६९५)
" With a clear and fair nature had given him the greatest perfections specially that they seemed to dart rays to fire . To these was added a quick , clear and acute intelligence."

अर्थ-
"राजांचा चेहरा मोहक होता . निर्सगाने त्याला असावी तशी चेहरेपट्टी दिलेली होती . विशेषतः त्याचे काळेभोर व विशाल नेत्र एवढे तेजस्वी होते की जणू त्यातून अग्निस्फुल्लिँग बाहेर पडत आहेत ."

राज्याभिषेकाप्रसंगी प्रत्यक्ष पाहून इंग्रज वकील हेन्री ऑक्झेडने शिवरायांचे लिहिलेले वर्णन-
"शिवाजी महाराज ४७ वर्षाचे असून देखणे होते . त्यांच्या चर्येवरुन त्यांची बुध्दीमत्ता व चाणाक्षपणा सहज ध्यानात येई . त्यांचा वर्ण इतर मराठ्यांपेक्षा पुष्कळच गौर होता . त्यांची दृष्टी तीक्ष्ण असून नाक सरळ व बाकदार होते . त्यांच्या दाढीस निमुळतेपणा असून मिशी बारीक म्हणजे विरळ होती . त्यांचे बोलणे निश्चयात्मक , स्पष्ट पण जलद होते ."

जय शिवराय !

हनुमान जन्मकथा

वाल्मीकि- रामायणामध्ये (किष्किंधाकांड, सर्ग ६६) पुढीलप्रमाणे हनुमानाची जन्मकथा दिली आहे : अंजनीच्या पोटी हनुमान जन्मला. जन्म झाल्यावर `उगवणारे सूर्यबिंब हे एखादे पक्वफळ असावे', या समजुतीने हनुमानाने आकाशात उड्डाण करून त्याकडे झेप घेतली. त्या दिवशी पर्वतिथी असल्यामुळे सूर्याला गिळण्यासाठी राहु आला होता. सूर्याकडे झेपावणारा हनुमान हा दुसरा राहुच आहे, या समजुतीने इंद्राने त्याच्यावर वज्र फेकले. ते हनुवटीला लागून ती छाटली गेली. यावरून त्याला हनुमान हे नाव पडले. या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून कीर्तनाला सुरुवात करतात. सूर्योदयाला कीर्तन संपते व हनुमानाचा जन्म होतो. त्यानंतर हनुमानाच्या मूर्तीची पूजा करतात व सर्वांना प्रसाद म्हणून सुंठवडा देतात. `हनुमान जयंती' या तिथीला मारुतीचे तत्त्व पृथ्वीवर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते. या दिवशी `श्री हनुमते नम: ।' हा नामजप जास्तीतजास्त केल्याने नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात कार्यरत असलेल्या मारुतित्त्वाचा आपल्याला लाभ मिळतो. जन्मत:च मारुतीने सूर्याला गिळण्यासाठी उड्डाण केले अशी जी कथा आहे, तीतून वायूपुत्र (वायूतत्त्वातून निर्माण झालेला) मारुति हा सूर्याला (तेजतत्त्वाला) जिंकणारा होता, हे लक्षात येते. पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या तत्त्वांत वायूतत्त्व हे तेजतत्त्वापेक्षा जास्त सूक्ष्म, म्हणजे जास्त शक्तीमान आहे. मुनीच्या आदेशानुसार अंजना वायुदेवाची आराधना करते. वायुदेव प्रसन्न होतात. स्वत:च तिच्या पोटी जन्म घ्यायचे आश्वासन देतात. काही वर्षे जातात. अंजनेला मूल होत नाही. ती तगमगते. भगवान शंकराची उपासना करते. काही वर्षे आराधना करते. शंकराची कृपा संपादन करते. शंकर स्वत:च तिचा मुलगा होण्याचे आश्वासन देतात. तिला मंत्र सांगतात. अंजना आसनमांडी घालून बसते. मांडीवर हाताची ओंजळ असते. शिवमंत्राचा जप करत असते. आकाशातून घार पायसपात्र घेऊन जात असते. अवचित सुसाट वादळ सुटते. झंझावाताने घार थरथरते. पंख आणि पात्र लटपटतात. पायसपात्र खाली पडते, ते नेमके अंजनेच्या ओंजळीत ! ती ध्यानस्थ असते. शंकराचा, वायूदेवाचा हा प्रसाद ती अतीव श्रद्धेने प्राशन करते. अंजनेला दिवस जातात. मुलगा होतो. चैत्र पौर्णिमा मंगळवारी सूर्योदयाला हनुमंताचा जन्म होतो

महापौर श्री. प्रभु ( Ex Mayor Suresh Prabhu Contact )

महापौर श्री. प्रभु   ( Ex Mayor Suresh Prabhu Contact )

२९, भानुकांत कॉम्प्लेक्स, आरेरोड, चेकनाका, गोरेगांव (पूर्व), मुंबई – ४०००६३
कार्यालयाचा दूरध्वनी – २९२७७०७४ / २९२७७०८४ 

भ्रमणध्वनी क्रमांक –९८२०७०२७७७

यावर लघुसंदेशाद्वारेअथवा त्यांचा वैयक्तिक ई-मेल आयडी spoffice@gmail.com

एका पिझ्झ्याची दुसरी बाजू

'जास्त कपडे धुवायला काढू नका', तिने म्हटले.
का बरे? तो म्हणाला.
'नाही, आपली काम वाली बाई २ दिवस येणार नाही'.
कशासाठी?
'गणपतीसाठी २ दिवस नातवाला भेटायला मुलीकडे जाणार आहे, असे बोलली'.
'ठीक आहे, नाही काढत जास्त कपडे धुवायला',
'आणि, हो, तिला गणपतीसाठी ५०० रुपये देते, सणासाठी बोनस म्हणून'.
'कशाला, आता दिवाळी आलीच, तेव्हा देऊया',.
'नाही रे, गरीब बाई ती, हौशेने नातवाकडे जातेय तर तिलाही बरे वाटेल', अन ह्या महागाई मध्ये त्यांच्या पगारात कसा सण साजरा करणार ते'?
'तू ना, खूपच भावनिक होतेस',
'नाही रे, काळजी करू नकोस', मी आजचा पिझ्झा खाण्याचा बेत रद्द करते', सहज ५०० रुपये उडतील त्या ८ पावाच्या तुकड्यामागे', ती हसत बोलली.
'वा वा, फार छान, तू पण शहाणी आहेस', आपल्या तोंडचा पिझ्झा तिच्या ताटात'.

३ दिवसानंतर
'काय मावशी, कशी झाली सुट्टी', त्याने कामवाल्या मावशीला विचारले.
'खूप छान झाली', ताईने ५०० रुपये दिले होते मला, सणाचा बोनस म्हणून',.

'मग जाऊन आली का नातवाकडे'?
'हो जाऊन आली, मस्त ५०० रुपये खर्च केले २ दिवसात'.

'म्हणजे काय केल नेमकं'?
'नातवासाठी बाजारातून १५० रुपयाचा ड्रेस घेतला अन ४० रुपयाची बाहुली, मुलीला छानपैकी ५० रुपयाचे पेढे घेतले, ५० रुपयाचा मंदिरात नैवद्य दिला, 60 रुपये रिक्षाभाडे, २५ रुपयाच्या मुलीला बांगड्या घेतल्या, ५० रुपयाचा जावईबापूसाठी बेल्ट अन उरलेले ७५ रुपये नातवाच्या हातात दिले'. तिने झाडू मारता मारता तत्काळ खर्च मांडला.
'५०० रुपयात इतके काही', तो आश्चर्याने म्हणाला अन विचार करू लागला.
त्याच्या डोळ्यासमोर ८ तुकडे केलेला पिझ्झा उभा राहिला. तो एकटक कल्पनेतल्या पिझ्झाकडे पाहू लागला. एक एक तुकडा त्याच्या डोळ्यामध्ये घुसू लागला. त्या एक एक पिझ्झाच्या तुकड्याशी तो कामवाल्या बाईच्या सणावरील खर्चाशी तुलना करू लागला.
पहिला तुकडा नातवाच्या ड्रेसचा, दुसरा पेढ्याचा, तिसरा तुकडा मंदिरातील नैवद्य, चौथा रिक्षाभाडे, पाचवा बाहुलीचा, सहावा मुलीच्या बांगड्याचा, सातवा तुकडा जावईबापूचा बेल्ट अन आठवा तुकडा नातवाच्या खाऊसाठी पैसे.
पिझ्झा त्याच्या डोळ्यासमोर फिरू लागला, एका तुकड्या मागे दुसरा तुकडा, अन तुकड्यावरील ड्रेस, बांगड्या अन तिचा सण.....
एका पिझ्झ्याची त्याला दुसरी बाजू आज दिसली होती. पिझ्झ्याचे ८ तुकडे त्याला काही शिकवून गेले होते, जगण्याचा अन खर्च करण्याचा नवीन अर्थ.

काळाचे रहस्य ...

काळाचे रहस्य
श्रीराम आणि रावण युद्धाचा शेवट..
घायाळ झालेला रावण शेवटच्या घटका मोजत होता. आणि इकडे रामाच्या छावणीत श्रीराम लक्ष्मणाला सांगत होते की, "त्वरीत रावणाकडे जा आणि त्याचे शिष्यत्व पत्करून'काळाचे रहस्य' आत्मसात कर" !!!
रामाच्या त्या बोलण्याने संभ्रमित झालेल्या लक्ष्मणाला शेवटी रामाने अक्षरश: आज्ञा केली की, हे लक्ष्मणा, शिघ्रता कर अन्यथा रावणाच्या अंता बरोबरच ते रहस्य सुध्दा कायमचे अंत पावेल.
मरणासन्न रावणाने सुध्दा काही आढेवेढे न घेता, आपल्याकडे आलेल्या लक्ष्मणाची विनंती स्विकारली.
त्याने लक्ष्मणाला सांगितले की त्वरीत पिंपळाची तीन पाने अन एक टोकदार काडी घेऊन ये.
लक्ष्मणाने तसे केल्यावर रावणाने पुन्हा सांगितले, आता ते तीनही पाने एकावर एक ठेव आणि एका झटक्यात ती काडी त्या पानांवर आरपार खोच.
लक्ष्मणाने तसे केले आणि काय आश्चर्य, काडीचे टोक ज्या पानातून प्रथम स्पर्ष करून गेले ते सोन्याचे झाले, मधले रुप्याचे झाले अन तिसरे आहे तसेच राहीले.
रावण म्हणाला, हे आहे काळाचे रहस्य. "क्षणमात्र जरी विलंब झाला तरी सोन्याचे रुपे होते. म्हणून जो क्षण हाती लागेल त्याचा क्षणमात्र ही विलंब न करता 'सोने' कर !"
आपणही काळाचे रहस्य ओळखून प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग करूया आणि त्याचे सोने करूया ...
आनंदी दिवसाच्या आनंदी शुभेच्छा मित्रांनो !!

Wednesday, August 20, 2014

एका स्रीचा प्रश्न तिच्या नवर्याला

एका स्रीचा प्रश्न तिच्या नवर्याला जो सरळ
तुमच्या हि हृदयाला स्पर्श करेल.
------------------------
देह माझा ,
हळदी तुझ्या नावाची।
हाथ माझे ,
मेहंदी तुझ्या नावाची।
डोकं माझं ,
ओढ़णी तुझ्या नावाची।
माथा माझं ,
कुंकू तुझ्या नावाचं ।
कपाळ माझं ,
टिकली तुझ्या नावाची ।
नाक माझं ,
नथनी तुझ्या नावाची ।
गळा माझा ,
मंगलसूत्र तुझ्या नावाचं ।
कलाई माझी ,
बांगड्या तुझ्या नावाच्या ।
पाय माझे ,
पैंजण तुझ्या नावाचे ।
बोटं माझी ,
जोडवे तुझ्या नावाचे ।
वडीलधाऱयांच्या पाया मी पडते ,
आणि "सदा सौभाग्यवती " चा आशिर्वाद
तुझ्या नावाने ।
अजुन तर अजुन -
करवाचौथ/वडपौर्णिमेचा उपवास तुझ्या नावाचे

ईथ पर्यंत कि
पोट माझं / रक्त माझं / दूध माझं ,
आणि बाळ ?
बाळ तुझ्या नावाचं ।
घरच्या दरवाज्या वर लावलेली
'नेम-प्लेट' तुझ्या नावाची ।
अजुन तर अजुन -
माझ्या नावा समोर लिहलेल गोत्र पण माझ
नाही ,तुझ्या नावाचं ।
दोघेही बाहेर कमवून
आणणार तेही तुला हाथभार लावण्यासाठी पण
मग फक्त घरातली काम मीच एकटीने
का करावीत ते करताना तू का नाहीस
माझ्याबरोबर आणि सर्व
काही तुझ्या नावाचं .. नम्रता पूर्वक विचारते :
शेवटी तुझ्या जवळ ....
काय आहे माझ्या नावाचं ?

ज्याला त्याला हवी बायको गोरी

ज्याला त्याला हवी बायको गोरी
काळ्या मुली जातील कुण्या घरी
तो एकेक पाहूणा येतो
फक्त मुलगी पाहुनी घेतो
गुणात कशीही रंगानेच गोरी
काळ्या मुली जातील कुण्या घरी
मुलगा डांबरचा काळा गोळा
गोरया मुलीवर त्याचा डोळा
डांबर ही म्हणे पाहीजे गोरी
काळ्या मुली जातील कुण्या घरी
हा कसा बदलला काळ
ऐकून पोटात होतो जाळ
छान छबेली पाहीजे न्यारी
काळ्या मुली जातील कुण्या घरी
लग्न करतील कुणा संग
कसा आला हा प्रसंग
गळा दोरी घ्या फासावरी
काळ्या मुली जातील कुण्या घरी

मरावे तरी कसे ??

मन मोकळेपणाने वावरले तर म्हणतात,
पोरीला घरबंधन नाही!
शांत धीरगंभीरपणे वावरले
की म्हणतात, आमोरासमोर
बोलण्याची हिम्मत नाही!!
लग्न लवकर केले असेल तर म्हणतात,
एखादे लफड़े लपवायचे असेल !
लग्न उशिरा होत असेल तर म्हणतात,
मुलीतच काहीतरी खोट आहे !!
खुपच शिकलेली असेल तर म्हणतात,
डोक्यावर मिरे वाटेल !
शिक्षण कमी घेतले असेल तर म्हणतात,
मुलगी मागासलेली असेल !!
मित्र मंडळी असेल तर म्हणतात,
मुलगी वाया गेलेली असेल. !
मित्र मंडळी कमी असेल तर म्हणतात,
मुलगी एकलकोंडी असेल.!!
या अशा दोन्ही बाजूने लोक
बोलतात तर , माणसाने या जगात
जगावे तरी कसे
व निरपराध असताना सुद्धा मरावे
तरी कसे ??

तोच या जगात खरा "श्रीमंत " आहे..!!!

लाख क्षण अपूरे पडतात
आयुष्याला दिशा देण्यासाठी,
पण
एक चुक पुष्कळ आहे ते
दिशाहीन करण्यासाठी,

किती प्रयास घ्यावे लागतात
यशाचं शिखर चढण्यासाठी,
पण
जरासा गर्व पुरा पडतो
वरुन खाली गडगडण्या साठी,

देवालाही दोष देतो आपण
नवसाला न पावण्यासाठी,

किती सराव करावा लागतो
विजयश्री वर नाव कोरण्यासाठी,
पण
जरासा आळस कारणीभूत
ठरतो जिंकता जिंकता हरण्यासाठी,

किती तरी उत्तरं अपुरी पडतात
आयुष्याचं गणित सुटण्यासाठी,

किती तरी अनुभवातनं जावं
लागतं आयुष्य एक कोडं आहे
हे पटण्यासाठी,

विश्वासाची ऊब द्यावी लागते
नात्याला जीवनभर तारण्यासाठी,

एक अविश्वासाचा दगड
सक्षम आहे ते कायमचं
उद्धवस्त करण्यासाठी
कलीयुगाचे पर्व आहे..,
प्रत्येकालाच इथे गर्व आहे...!

मी आहे तरच सर्व आहे...,
नाहीतर सर्व व्यर्थ आहे...!!

अरे वेड्या..!
कुणा वाचून कुणाच राहात नसतं..,
आदर कर सर्वांचा, हाच खरा मानव धर्म आहे...!!!

प्रेमाने जोडलेली चार माणसं व
त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द

हे वैभव ज्याच्याजवळ आहे..,
तोच या जगात खरा "श्रीमंत " आहे..!!!

कधीतरी कुठेतरी आपण, कोणावर तरी प्रेम करतो

कधीतरी कुठेतरी आपण, कोणावर तरी प्रेम करतो
देवाने दिलेल्या, सुंदर भेटीचा स्वीकार करतो
प्रेमात असतो तेंव्हा, सगळ काही छान वाटत
पण कोणी जात सोडून तेंव्हा, सार खोट अस
जाणवत
प्रेमात असताना, इतर सगळ नको नकोस वाटत
अन प्रेम दूर गेल्यावर, सार काही जवळच भासत
आयुष्यात कुठेतरी , काहीतरी चुकत असते
पण ठेच लागल्याशिवाय, आयुष्य हि सुंदर बनत नसते
…. !!!!

मला माणसे जोडायला आवडतात

मला माणसे जोडायला आवडतात,
माणसांशी नाती जोडायला आवडतात
जोडलेली नाती जपायला आवडतात,
कारण
माझा विश्वास आहे की,
माझ्या मृत्यूनंतर
मी कमावलेली संपत्ती
मी माझ्याबरोबर घेऊन जाणार
नाही,परंतु
मी जोडलेल्या माझ्या माणसांच्या डोळ्यांतील
अश्रूंचा एक थेंब हाच
माझ्याकरिता लाखमोलाचा दागिना आणि हीच
माझी माझ्या आयुष्यातीलॊ खरी कमाई
असेल

नवरा विरुद्ध बायको.

नवरा विरुद्ध बायको....?
नवरा हा नवराच असतो
बायको ही बायकोच असते
हक्काचे आणि प्रेमाचे
दोघांचे एकच जग असते
तिची धाव जरी माहेरच्या कुपणापर्यंत
तरी घरातल्या वीटेवीटेत तिचे अस्तित्व असते
तिच्या अस्तित्वानेच येतो घरी ओढल्यागत
जरी मित्राच्या घरी रंगलेली रात्र असते
लग्न करतात दोघे तेव्हा
तो उताविळ नवरा आणि ती लाजरी नववधु
दोघही एकमेकां वर करत असतात
आंधळं प्रेम आणि नजरेनं जादू..
तालावर नाचवाताना ती
संसाराची लय सोडत नाही
नाचतो तो ही गप गुमान
तिची साधलेली लय बिघडवत नाही
कधी तो कधी ती
चुका दोघही करतात
तो चूकतो तंव्हा आणतो गजरा
ती चूकते तेंव्हा येते लाडात
मोलकरणीवर गेलेलं लक्ष
तिला आवडत नाही
आणि तिच्याकडे कोणी पाहिलं
तर त्यालाही खपत नाही
तिच्या तोंडी माहेरचा गोडवा
तो म्हणतो माझ्या आईच्या हातची चवच न्यारी
दोघांनाही असतात
आपापल्या माहेरची माणसं प्यारी
घरात असले दोघे
पेटलेलं भांडण असते
एक कोणी नसेल तर
न सोसणारी आठवण असते
जन्म दिलेल्या बाळांचे
त्यांना मिळालेले पालक्त्व असते
त्यांचे नाते ह्यामुळेच
अधिकच झाले परिपक्व असते
संकटातही दोघांना
एकमेकांची साथ सोबत असते..
कारण तुझं वेगळं-माझं वेगळं
अशी संकटांची वाटणीच नसते
कधी तांडव कधी मांडव
कधी तप्त ऊन कधी थंड छाया
आसुसलेल्या त्याच्या स्पर्शासाठी
तिची रसरसलेली काया
'नवरा विरुद्ध बायको'
कधी न संपणारं हे भांडण आहे
खरंतर दोघांचही अस्तित्व
एकमेकांशिवाय अपुर्ण आहे.

बायको कशी असावी

बायको कशी असावी ...
बायको कशी असावी ...
सुंदर नसली तरी चालेल,
पण चार चौघात उठून दिसणारी असावी ...
बायको कशी असावी,
समजुद्दार नसली तरी चालेल,
पण माझ्या भावना समजून घेणारी असावी ...
बायको कशी असावी,
प्रेमळ नसली तरी चालेल,
पण माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी असावी ...
बायको कशी असावी,
हुशार नसली तरी चालेल,
पण सर्व गोष्टी हुशारीने हाताळणारी मात्र असावी ...
बायको कशी असावी,
धैर्येवान नसली तरी चालेल,
पण दुःखाच्या क्षणी मला सावरणारी असावी ...
बायको कशी असावी,
गमतीदार नसली तरी चालेल,
पण माझ्यासारखी खोडकर नक्की असावी ...
बायको कशी असावी...
हसताना गालावर खळ्या पडल्या नाहीत तरी चालेल,
पण तिच्या हसण्यातून दुसऱ्यांच्या दुखांवर फुंकर मारणारी आणि हसू
फुलवणारी मात्र असावी ...
ती कशीही असुदे, पण बायको पेक्षा एक मैत्रीण म्हणून जास्त
असावी ..

गंध फुलांचा गेला सांगून


गंध फुलांचा गेला सांगून
तुझे नि माझे व्हावे मीलन, व्हावे
मीलन
सहज
एकदा जाता जाता मिळुनि हसल्या अपुल्या नजरा
दो हृदयांच्या रेशीमगाठी प्रीत
भावना गेली बांधून
विरह संपता,
मीलनाची अमृतगोडी चाखीत
असता
सखया अवचित जवळी येता ढळे
पापणी गेले लाजून
मनामनांच्या हर्षकळ्यांची आज
गुलाबी फुले जाहली
वरमाला ही त्याच फुलांची गुंफून
सखया तुलाच वाहीन

दुनिया में सब चीज मिल जाती है


दुनिया में सब चीज मिल जाती है,
केवल अपनी गलती नहीं मिलती ..!!!!!

Changing The Gear On Right time

Race Can Not Be Won by Accelerating On " Top Gear "
But ,
It Can Be Won Only By Changing The Gear On Right time ... !!!

जिंदगी में बहुत गम मिलेंगे

जिंदगी में बहुत गम मिलेंगे ,
सच मानो अच्छे दोस्त कम मिलेंगे …!
जिस मोड पर सब साथ छोड देंगे ;
उस मोड पर इंतजार करते हम मिलेंगे …. !!!


 ------------------------------------------

मंज़िलों से भी गुमराह कर देते हैं कुछ लोग…
हर किसी से रास्ता पूछना, अच्छा नहीं होता।।

आयुष्य सापशिडी सारखं असतं.

आयुष्य सापशिडी सारखं असतं.
सृष्टी चालवणारा "क्षणाला" अंकांच्या ठोकळ्यासारखं वापरतो. सापशिडी वरती हा ठोकळा टाकला जातो. एक, दोन, तीन... अंक पडत राहतात.
आयुष्यात येणारी कोणती व्यक्ती शिडी बनेल आणि कोणती व्यक्ती सापासारखी वागेल याचा अंदाज लावता येत नाही.
पाचची अपेक्षा असतात दोन मिळतात आणि कधी तीनची अपेक्षा असताना सहा मिळतात.
सहा वरती कधी कधी साप वाट्याला येतो आणि "नेहमी कमी मिळाले म्हणून रडणारा माणूस कधी कधी जास्त मिळालं म्हणून पण रडतो."
होणाऱ्या 'वेदना' आपल्याला 'आपल्या अस्तित्वाची' जाणीव करून देतात.
काही तरी "गमावणं" हि गोष्ट "आपल्याकडे गमावण्यासारखं पण काहीतरी होतं" हे कळून देण्यासाठी गरजेचं असतं.
खेळ चालत राहतो... शिड्या मिळतात... साप गिळतात... क्षणाचे फासे पडत राहतात...
पण प्रत्त्येक क्षण काही न काही देऊन जातो.
कारण खेळातला असो व आयुष्यातला असो... अंकांच्या ठोकळ्यावर "शून्याचा" अंक नसतो. म्हणून प्रत्त्येक क्षण लुटून घ्यायचा.🎲🎲🎲

तू छोड़ दे कोशिशें इन्सानों को पहचानने की ...

तू छोड़ दे कोशिशें
इन्सानों को पहचानने की...!
यहाँ जरुरतों के हिसाब से
सब नकाब बदलते हैं...!

मेरे बारे मे कोइ
राय मत बनाना दोस्त !
मेरा वक्त भी बदलेगा,
और तेरी राय भी..!

You Remembered By The

You May Be Known By The Designation On Your Visiting Card ....

But Are You Remembered By The :
" VALUES " You Show ...
" PRINCIPLES " You Live .....
And
" LOVE " You Give .... !!!

DAHI HANDI

What Is The Learning Out Of The Famous "DAHI HANDI ". Which Is Dedicated To The Lord KRISHNA ?

Unless You Build A Base ,
Unless Build Your TEAM ,
Unless Build Your Career With Fundamentals,
You Can't Reach The Top.

Fill Your Mind With Positive Thought And Build A Strong TEAM. So That We Rebuild And Keep Achieving It Year On Year ..... !!!!!

लाश को देखकर...

किनारे पर तैरने वाली
लाश को देखकर
ये समझ आया...
बोझ शरीर का नही
साँसों का था....

Steps for Happy Life

" Minimum Requirements And Maximum Adjustments Are The Two Steps Of Happy & Successful Life ".

The Best Thing To Learn In Life Is The Habit Of COMPROMISE Because Its Better To Bend A Little Than To Break A Beautiful Relation .... !!!

The Quality Of Life Cannot Be Raised Unless We Raise The Texture Of Our Thoughts And The Depth Of Our Understanding ...!!!  

Don't Take Life Too Seriously ,
Always Find Time To Laugh Because It May Not Add Years TO Your Life .
But ,
Adds More Life To Your Years ................!!!!!
 



" Importance And Respect Should Be Given Appropriately .. " !
Because ,
If Given MORE It Will Not Be VALUED .!!
And
If Given LESS It Won't Be CONSIDERED .... !!!
 

Sunday, July 27, 2014

राखीचा धागा

राखीचा धागा हा नुसताचसुताचा दोरा नसून ते एक शील, स्नेह, पवित्रतेचे रक्षणकरणारे, सतत संयमी ठेवणारे पवित्र बंधन आहे. ह्या एवढयाशा धाग्याने कित्येक मने जुळून येतात. त्यांना भावनांचा ओलावामिळतो वं मन प्रफु ल्लीत होते.एकमेकांना जोडणारा असा हा सणइतरकोणत्याही धर्मात संस्कृ तीत नाहे. सामाजिकऐक्याची भावना जागृत ठेवण्यासाठी अशा प्रकारचेसण खूप महत्वाचे ठरतात. रक्ताच्या नात्याव्यतिरिक्त आपल्या मनाप्रमाणे नातीजोडण्यास ह्या सणामुळे समाजास वाव मिळतो. ज्या समाजात अशा प्रकारचीएकरूपता, ऐक्य असते असा समाज सामर्थ्यशाली बनतो हाच या राखी पौर्णिमेचा संदेश आहे....!!!

काळजात राहती अमुच्या, रक्तात वाहती राजे

सह्याद्रीच्या छाताडातून, नादजिजाऊ गाजे...
काळजात राहती अमुच्या, रक्तात वाहती राजे!!
तुफ़ानगर्जतो, आगओकतो, वाघ मराठा माझा!
सन्मानराखतो, जान झोकतो तुफानं मातीचाराजा !
झुकवूनतुतारी माना, शंखनाद हा वाजे....
काळजात राहती अमुच्या, रक्तात वाहती राजे!!
सुराज्य थाटले, मेढ रोवली स्वातंत्र्याची शीळा !
ही तलवार भवानी पाहून, तोफ फिरंगी लाजे...
काळजात राहती अमुच्या, रक्तात वाहती राजे!!
तेरक्तं सांडले, प्राण वेचले नसे उगाचबाता!
जगणे त्यांचे, जगणे होते त्या वेगळ्याचवाटा!
ही आहुती त्या वीरांची, काय तुझेनिमाझे...
काळजात राहती अमुच्या, रक्तात वाहती राजे!!

|| जय जिजाऊ ||
|| जय शिवराय ||

गाढवाची गोष्ट ...

एके दिवशी एका शेतकर्याचं गाढव
शेतातल्या कोरड्या विहिरीत पडलं.
जखमी झाल्यामुळे ते विव्हळत होतं
आणि मोठ्याने ओरडत होतं.
लोकं जमा झाले शेतकरी धावत आला त्याने
बराच ं
विचार केला फार प्रयत्न केले.
त्या गाढवाला त्या विहीरीतून बाहेर
काढण्याचे
पण काही करता त्याला बाहेर काढणे जमत
नव्हते.
दिवस
मावळायला आला होता
शेतकरीही आता थकला ही होता आणि कंटाळला होता त्याने
विचार केला .
'आता हे गाढव तर असेही म्हातारे
झाले आहे असेही निरुपयोगी आहे
आणि ती विहिरही कोरडीचं आहे ...
त्याला बाहेर काढण्या पेक्षा त्याला बुजून
द्यावे... विहीरीत
माती लोटावी...
गाढवाचा प्रश्न ही सुटेल
आणि शेतातली ही विहीरही बुजली जाईल.......'
मग काय जमलेल्या सार्या लोकांकडून त्याने
मदत मागीतली. आणि सगळे कामाला लागले
कुदळ फावड्यांनी माती टाकायला सुरुवात
झाली.....
मध्ये
पडलेल्या त्या जखमी गाढवाला काही कळेनासे
झाले ...
विहीरीत पडल्याने
शरीराला झालेल्या जखमांची वेदना आणि त्यात
भर म्हणजे आयुष्यभर
ज्या मालकाची चाकरी केली
त्याची ओझी वाहीली आज
तोचं मालक जिवावर उठला ...
ते दुखाने अजून मोठयाने ओरडू लागले....
वरुन माती पडतचं
होती...
काही वेळाने गाढवाचा ओरडण्याचा आवाज
थांबला .....
सागळ्यांना वाटले गाढव मेलेचं बहुतेक
शेतकर्याने सहज विहीरीत डोकावून पाहीले
तर
तो पहातचं राहीला...
अंगावरची माती झटकत गाढवउभे राहीले
होते...
लोकांनी अजून पटापटा माती टाकणे सुरु
केले...
परत पाहीले तर गाढव त्याचा त्याचा मग्न
होता तो वरुन
माती पडली की झटकायचा आणि त्या पडलेल्या
मातीच्या थरावर
उभा राहीचा ......
असं करता करता कोरडी विहीर बरीचं
भरली आणि कठडा जवळ येताचं ते गाढव
तो कठडा ओलांडून बाहेर आले......


आयुष्यात वेगळे तरी काय होतं ???


आपण खड्यात पडलो तर आपणास
काढायला कोणीतरी एकचं येते पण
आपल्यासाठी खड्डे खणणारे आणि खड्यात
पडल्यावर माती लोटणारे
आपल्याला गाडण्याचा प्रयत्न करणारे बरेचं
भेटतात...


म्हणून स्वतःवर नेहमी विश्वास ठेवा .... आपले
डोके नेहमी शांत ठेवा
समस्या कीतीही मोठी असो.... शांत मनाने
ती हाताळा.... 


खड्ड्यात
पडलो आणि कोणी पाडलं ह्या बद्द्ल
दुखः करायपेक्षा
त्यातून बाहेर कसे पडायचे हा विचार करा.....
झटका ती माती आणि त्या मातीची एक एक
पायरी करत... हळूहळू करत वरया....

Friday, July 25, 2014

About आई ..

प्रिय आई ...

स्वर्ग हि एक कल्पना आहे
ते काय असतं ते मी बघितलं नाही
मी जरी नाही आठवलं तरी
डोळे माझे तुला आठवतात
प्रत्येक भेटीनंतर तुझी प्रतिमा
ते स्वतःमध्ये साठवतात...!!!

---------- 


बाहेरचं खाल्ल्यावर पोट भरतं
आईच्या हातचं खाल्ल्यावर मन भरतं !



-----------

"आई "हे पृथ्वीतलावरचे ईश्वराचे रूप आहे.
जे मुलांच्या सुखासाठी तळमळते,
प्रसंगी जीवही देते, सर्वस्वाचा त्याग करते.
त्या मातेला मग ती आपली असो किंवा दुसऱ्याची माता
तिला दुखावले जाणार नाही
याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे.....!!!!!

------------
थोर तुझे उपकार आई थोर तुझे उपकार - संकटसमयी तूच एक आधार - थोर तुझे उपकार


------------
आईवडीलांना वृद्ध झाल्यावर आश्रमात टाकाल तर.......
हाच विचार पुढची तुमची पिढी तुमच्याबरोबर करेल......


वृद्धाश्रम

जवळच वृद्धाश्रम आहे पण कधीच तिकडे जाण्याचा विचार हि मनात आला नव्हता आला नव्हता.. आज अगदी ठरवूनच माझी पावुले तिथे वळली मी आतमध्ये गेलो.तिथे एक आजी बसलेल्या दिसल्या ,मी त्यांचाशी बोलण्याचा प्रयत्न केला...
.
आजी जेवण झाले का?

नाही रे पोरा मला नाही जाणार आज जेवण ........
पण कसे काय आज या आजीबाई कडे केले येणे....
माज्या म्हातारी शी बोलायला वेळ नसतो कोणाला इकडे ...
कधी तरी फोन ची रिंग वजते इकडे ...
हेल्लो हेल्लो मनी ऑर्डर पोहचली का?..
म्हणून फोन बंद पडतो ...अन
डोळ्यातील अश्रू गालावर पोहचून कंठ दाटतो ....
.
पुन्हा मी म्हणाले आजी थोडसे तरी खाऊन घ्या...
नाही रे पोरा मला नाही आज जाणार जेवण ....
माझ्या लेकाचा आज वाढदिवस आहे...
मन माझे त्याला आशीर्वाद देण्यासाठी तडपते आहे ....
मन त्याचे का माज्यापर्यंत येण्यासाठी अडवत आहे..
पूर्वीसारखे दिवस नाही राहिले आता..
म्हणून प्रेम माझे त्याचाव्रचे अजूनही संपले नाही....
पूर्वीसारखी मन तक्रार नाही करत आता..
म्हणून तो मला घेऊन जाईल विचार करणे अजूनही सोडले नाही ...
.
थोडा वेळ डोळ्यातले अश्रू पुसत स्तब्ध शून्यात बघत राहिल्या..
लहानपणी एक घास चिऊ चा एक घास कौऊ चा करत घास भरवायचा..
आयुष्यभर एक एक पैसा जपून वापरायचा..
हौस होतीना लेकाला डॉक्टर बनवायचा..
आता रोज एक च विचार करायचा..
एकदा तरी माझ्या पिल्लाला आमची आठवण येते का?
एकदा तरी माज्या पिल्लाला आमची काळजी वाटे का?
पण अपेक्षा नी आता कसली,इछाच नाही आता उरली..
आई बापांची किंमत नाही ज्याने केली..मजबुरी त्याने सांगितली..
आपली माणसे ज्याला अडगळ वाटली ...आपली माणसे त्याला परकी झाली.
....
थोडेसे रागवत..
तुज्या बाबांना मात्र तुज्यावर राग आहे बरे का ,,'
आपल्या आईला का कोणी असे वेगळे करते ,
रक्ताच्या नात्याला का कोणी क्षणात परके करते,,
नाही आठवत का रे तुला आम्ही घेतलेले कष्ट..?
बरे आहे न सगळे तिकडे?
कसे काय फोन विचारायचं नुसते..
इथे सर्वे काही ठीक आहे ,मजेत आहे बाळा ..
तू मात्र सुखी रहा ,आनंदात राहा नेहमीच आशीर्वाद असतील बाळा..
फक्त एकच गोष्ट आहे..
आपल्या माणसाच्या प्रेमापासून तू मुकला आहेस..
आपली माणसे कोण ते आता आम्हाला हि उमजले आहे..

वृद्धाश्रमातील आजी

वृद्धाश्रमातील आजी .........२

येता हाक मायेची
डोळ्यात तराळले पाणी
हृदयला भिडणारी कोणाची
असेल मधुर वाणी
रात्रीअंती दिवस उजाडतो
दिवसामागे सरते रात्र
वृद्धाश्रमातील भिंतीवरचे केवळ
उलटते तारखेचे पत्र
तारुण्यात मोठ्या हौशेने
संसाराची केली मांडणी
वार्धक्याने आलेल्या लाचारीने
केलीय अडगळीत मोडणी
मायेचा खोटा पुरावा
टपालाने हातात येतो
दोन लुगड्यांच्या गाठोड्यात
लाडवांचा चुरा मिळतो
कपकपणाऱ्या हाताना केवळ
भिंती आधार देतात
डोळ्यानच्या भिजलेल्या वाती
मायेचा प्रकाश शोधतात
कोणी मायेचा भुकेला
येतो कधी वाट बदलून
चार क्षणाच्या सहवासात
जगण्याची उमेद जातो वाढवून
सोडून पदराची गाठ
आगंतुकासी हृदयासी कवटाळते
काळजाची करून होडी
मायेच्या सागरात डोलावते....

सौजन्य :- फेसबुक मित्र सखा श्रीगिरीश

काय सांगू शेजीबाई

आईला, आपल्या लेकीच फार कवतिक असत,लहानपणापासून नांदायला गेल्यावर सुद्धा तिला तिची फार माया असते,जेव्हा तिला वेळ मिळेल तेव्हा ती आपल्या शेजारणीला काय सांगते

काय सांगू शेजीबाई,
माझ्या लेकीचं कवतिक
घरासाठी तिनं बाई,
खस्ता काढल्या कितीक....!!!!
होती लहान ती जवा,
सांभाळले भाऊराया,
झाली लेकराची माय, घास
त्याला भरवाया.....!!!
भाऊ शाळेमंदी जातो,
गिरवतो यक दोन,
त्याले शिकवते तीन,
त्याची आडाणी बहीन......!!!!
आली वयामंदी जवा, लाज
अंगात मायीना,
चाले नाकाम्होरं पोर, वर
करून पाहीना......!!!!
हात पिवळे करण्या, बाप
बोलला झोकात,
देण्या-घेण्याच् या रीवाजी,
त्याचं मोडलं पेकाट......!!!!
चाले लगनाची घाई,
गेली मोहरून पोर,
लळा मायीचा सुटेना,
तिला आईचाच घोर ......!!!
जाता सासराला लेक,
झाली दादल्याची राणी,
तिच्या पावलांनी तिथं,
लक्ष्मी भरतेया पाणी......!!!!
लेक माझी ग गुणाची,
नाही नाही ग कुणाची,
तिचा जीव माह्यापाशी,
लेक मायीच्या मनाची......!!!
लेक व्हाढतो ग ताट, लेक भरवते
घास,
लेक कोरडा कोरडा, लेक
पान्हाळली कास...!!

स्वत:च्या कामासाठी स्वत:लाच उभं राह्वं लागतं

लहानपणी आई एक गोष्ट अगदी रंगवून रंगवून सांगायची,आणि आम्हीही {मी आणि माझी मोठी बहिण गुड्डी }ती माहीत असलेली गोष्ट पून्हा पून्हा तितक्याच उत्कंठेने ऐकायचो... आता मला माहीत असलेली गोष्ट मी तुम्हाला सांगणार नाही असं होईल का?
तर एका गावा बाहेर एक साळीचं शेत असतं.चंडोलपक्षानं त्या पिकामधे आसरा घेत पिल्लांसाठी घरटं बांधलेलं असतं. चंडोल पक्षाचं घरटं असलं तरी त्याचा पत्ताच नसतो त्याची मादीच आपली तीन पिल्लाना सांभाळत त्या घरट्याची रखवाली करत असते. पिल्लाना चारा आण, किडॆ आण, टोळ मिळाला तर तो आणून भरव, कुठे काडी निसटली तर ती ठीक कर कापूस आणून भर, पिल्ल आपली बघावं तेंव्हा चोच आवासून आपल्या आईची वाट बघत असायची ती पक्षीणी पिल्लं जरा मोठी झाल्यावर त्याना सांगते, घाबरायचं नाही कोणाची चाहूल लागली तर गप्प बसायचं कोण काय बोलतय, कसे आवाज काढतय सगळ्यावर लक्ष ठेवायचं काही महत्वाचं वाटलं तर माझ्या कानावर घालायचं. पिल्लं आपली त्यांच्या भाषेत हो हो म्हणत माना डोलावतात. कुठेही जा माना डोलवणं सेमच असतं नाही.. आपण सुद्धा...
असो! तर एकदा काय होतं? त्या शेताचा जमीनदार शेताची पाहणी करायला शेतात फेरफटका मारायला येतो. बरोबर त्याचा लोचट मुनीमजी असतोच. तयार झालेलं शेत बघून जमिनदार म्हणतो "हं! शेत कापायला झालय, आता कापायला हवं... पिल्ल घाबरतात.. हे आईच्या कानावर घलायला हवं शेत कापलं तर आपण कुठे जायचं? आई आल्या आल्या पिल्ल कलकलाट करतात पण ते ऐकून आई आपली शांतच. पिल्ल विचारतात, आई तुला भिती नाही वाटत? आई म्हणते अजून नाही पण तुम्ही मात्र सावध रहा शब्दंशब्द ऐका आणि मला सांगा काही दिवस जातात पून्हा जमिन्दार येतो सोबत मुनीनजी असतोच जमिनदार म्हणतो अरे आता शेत कापायला घ्यायला हवं जरा त्या शिरप्याला विचारा म्हणावं जरा कापून दे... पिल्ल हे ऐकातात तत्परतेने आईच्या कानावर घलातात तरी आई आपली शांतच परत थोडे दिवस जातात शेत तसच डुलत असतं पिल्लं वाढत असतात पण अजून पंखात बळ येणं बाकी असतं त्या दरम्यान जमिनदार असाच फेर्‍या मारून जातो पाहणी करून जातो देवदयेनं या घरट्याकडे त्याचं लक्ष जात नाही. याला सां गा त्याला सांगा करण्यात समय जात असतो. आणि एक दिवस जमिनदार येतो त्याच्या बरोबर त्याचा मुलगाही असतो कोणा कोणाला शेत कापायला सांगितलं याची उजळणी होते नोकर चाकर गडी माणसं,गावातली माणसं... शेवटी मुलगा म्हणतो जाऊदे अप्पा! आता उद्या अपणच येऊया आणि शेत कापायला घेऊया कशाला कोण हवय?
आई आल्या आल्या पिल्लं तिला हे सांगतात आणि जेंव्हा ती हे ऐकते की आता कोणावरही अवलंबून नं राहता जमिनदार स्वत:च शेत कापायला घेणार आहे तेंव्हा मात्र ती आई अस्वस्थ होते पिल्लाना दाखवत नाही पण जरा घाबरते
.. पिल्लं विचारतात..आई काय झालं?विचारात पडलेली ती आई म्हणते.. इतके दिवस ते दुसर्‍या कोणाची वाट बघत होते तो पर्यंत काळजी नव्हतीपण आता ते स्वत:च शेत कापणार म्हणजे.आपली इथून हलायची वेळ झाली.
पहाटेलाच पिल्लाना म्हणते जरा उडायचा प्रयत्न करा त्यानिंबावर जाऊन बसा .. आणि आईच्या इशार्‍या बरोबर ती पिल्लं घरटं सोडतात... कसाबसा जवळचा निंब गाठतात
माँरल आँफ द स्टोरी काय? स्वत:च्या कामासाठी स्वत:लाच उभं राह्वं लागतं
माझं कपाट आवरायची वेळ आलीकी राहून राहून मला ही गोष्ट आठवते.. तात्पर्य काय तर ..

"उद्या बहुतेक आपली भेट होणे नाही..."

(from Shri.Rajesh Parulekar )

रिटर्न्स कसा भरायचा, कसा नाही?

आर्थिक वर्ष २०१३-१४ साठी रिटर्न्स भरण्याची शेवटी तारीख ३१ जुलै आहे. ज्या नोकरदारांचा टीडीएस कंपनी कापून घेते आणि ज्यांना कर भरावा लागणार नाही, अशा नोकरदारांनी ३१ मार्च २०१५ पर्यंत रिटर्न्स जमा केले तरी हरकत नाही. ज्यांना मुदतीत इन्कम टॅक्स रिटर्न्स भरायचे आहेत त्यांनी ते कसे भरावेत, याची सविस्तर माहिती देत आहोत.
रिटर्न्स कसा भरायचा, कसा नाही?
आर्थिक वर्ष २०१३-१४ च्या स्लॅबनुसार, वयोवर्षे ६० च्या आतील पुरुष व महिलांचे वार्षिक दोन लाख उत्पन्न असेल तर ते उत्पन्न करमुक्त आहे. ६० वर्षांवरील ज्येष्ठांसाठी ही मर्यादा अडीच लाख रुपये आहे. तर, ८० वर्षांच्या वरील ज्येष्ठांसाठी ही मर्यादा पाच लाख रुपये इतकी आहे. ३१ मार्च २०१४ रोजी ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त आहे त्यांना ज्येष्ठ नागरिक मानले जाईल. त्याचप्रमाणे ३१ मार्च २०१४ रोजी ज्यांचे वय ८० वर्षांपेक्षा जास्त आहे त्यांना सुपर सीनिअर सिटिझन्स मानले जाईल. कलम ६ ए नुसार गुंतवणूक व व्याजवरील सवलतीपूर्व उत्पन्न वरील मर्यादेपेक्षा जास्त असेल तर इन्कम टॅक्स रिटर्न्स भरावा लागेल. गुंतवणुकीवरील सवलतीनंतरही करप्राप्त उत्पन्न या मर्यादेच्या आत असेल तरीही रिटर्न्स भरावे लागतील. आपले उत्पन्न (ग्रॉस इन्कम) अडीच लाख रुपये असेल आणि वय ६० वर्षांपेक्षा कमी असेल, तुम्ही कलम ८० सी नुसार, पीपीएफ आणि विमा योजनांमध्ये ६० हजार रुपये गुंतवणूक केली. तर, तुमचे करप्राप्त उत्पन्न १.९० लाख रुपये होते. हे उत्पन्न २ लाखाच्या एक्झेम्शन मर्यादेपेक्षा कमी आहे. पण, वजावटीपूर्वीचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त होते. त्यामुळे रिटर्न्स भरावा लागेल.
टॉप पाच चुकांची शक्यता
चुकीचा फॉर्म निवडणे
कोणता फॉर्म भरायचा यासाठी नेमके नियम आहेत. याबाबत इथे सविस्तर माहिती देण्यात आली आहे. अनेकदा चुकीचा फॉर्म निवडला जातो, त्यामुळे योग्य फॉर्म निवडा आणि तोच भरा
रिकाम्या फॉर्मवर सही
जे लोक एखाद्या एजंटमार्फत रिटर्न्स भरतात ते बऱ्याचदा न भरलेल्या फॉर्मवर न बघताच सही करून देतात. न भरलेल्या फॉर्मवर सही करू नका. एजंटकडून फॉर्म भरण्यात थोडी जरी चूक झाली तरी त्याचा त्रास तुम्हालाच भोगावा लागेल. त्यामुळे योग्यरितीने फॉर्म भरलेला आहे का याची शहानिसा करा. तुम्ही सही केली याचा अर्थ या फॉर्ममधील माहितीची जबाबदारी तुमचीच असते.
क्रमांक योग्य आहे का बघा
रिटर्न्स फॉर्ममधील पॅन, आयएफएस कोड, खाते क्रमांक, मालकाचा टॅन आदी माहिती भरताना चुका होऊ शकतात. या चुका टाळण्यासाठी क्रमांकांकडे लक्ष द्या. पॅन क्रमांकातील एखादा आकडा भरायचा राहून गेला तर इन्कम टॅक्स विभाग दंड आकारू शकते.
अॅकनॉलॉजमेंट भरताना चूक
जे करदाते ई फायलिंग करतात पण, डिजिटल सही करत नाहीत त्यांना आयटीआर पाच हा फॉर्म भरून तो बेंगळुरूला इन्कम टॅक्स ऑफिसला पाठवावा लागतो. हा फॉर्म रिटर्न्स भरल्यानंतर १२० दिवसांच्या आत भरावा लागतो. करदाते अनेकदा हा फॉर्म भरण्याचे विसरून जातात वा फॉर्म भरून तो कुरिअरने पाठवतात. पण, हा फॉर्म पोस्टाने वा स्पीड पोस्टानेच पाठवायचा असतो.
फॉर्म १६ न घेणे
तुम्ही आर्थिक वर्षात नोकरी बदलली असेल तर पूर्वीच्या आणि सध्याच्या कंपनी मालकांकडून 'फॉर्म १६' घ्या. पूर्वीच्या नोकरीत केलेली बचत, त्यातून मिळणारे उत्पन्न याची माहिती नव्या कंपनी मालकांना दिली नसेल तर कर कमी कापला जाईल मात्र, नंतर व्याजासहित तो भरण्याची वेळ येईल.
अशी असेल ही वजावट
'८० सी'नुसार मिळणारी वजावट
८० सी, ८० सीसीसी आणि ८० सीसीडी अंतर्गंत करसवलत मिळते. ही मर्यादा सन २०१३-१४ साठी एक लाख रुपये आहे.
रिटर्न्स भरण्याची तयारी
रिटर्न्स भरण्यापूर्वी खाली दिलेली कागदपत्रे तुमच्या जवळ असणे गरजेचे आहे. रिटर्न्स फॉर्म बरोबर कागदपत्रे जोडायची नसली तरी फॉर्म भरताना त्याची आवश्यकता पडू शकते.
फॉर्म १६
तुम्ही नोकरदार असाल तर आत्तापर्यंत तुमच्या कंपनी मालकाने तुम्हाला फॉर्म १६ दिलेला असेल. याचा अर्थ कंपनीने तुमचा टीडीएस कापून घेतलेला आहे.
टीडीएस सर्टिफिकेट
पगाराव्यतिरिक्त तुम्हाला उत्पन्न मिळत असेल तर आणि टीडीएस कापला गेला असेल तर ती संस्था तुम्हाला टीडीएस सर्टिफिकेट देते. भाड्यातून मिळणारे उत्पन्न, शेअर्स, एफडी वगैरेमधून मिळणारे उत्पन्न.
फॉर्म २६ एएस
कापून गेलेला टीडीएस सरकारकडे जमा झाला आहे की नाही याची माहिती फॉर्म २६ एएस द्वारे मिळते. म्हणजेच हा टीडीएस इन्कम टॅक्सकडे पोहोचला आहे, यावर शिक्कामोर्तब होते. याची महिती तुम्हाला दोन पद्धतीने घेता येते. Incometaxindiaefining.gov.in वर जाऊन view form 26 AS वर क्लिक करा. इन्कम टॅक्स साइटवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर हे पाहता येईल. तुम्ही नेट बँकिंग करत असाल तर बँकेच्या वेबसाइटवर जाऊन view your tax credit वर क्लिक करून फॉर्म २६ एएस पाहता येईल. या बँकेतील तुमची एफडी, बचत खात्यावरील व्याज याचीही माहिती त्यात मिळू शकते.
बँक स्टेटमेंट
बचत खात्याचे वर्षभराचे (१ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१४)चे बँक स्टेटमेंट घ्या. वर्षभरात बँकेने किती व्याज दिले आहे हे समजेल. या व्याजातून मिळालेले उत्पन्न रिटर्न्समध्ये दाखवावे लागेल.
अन्य दस्तऐवज
पॅन नंबर, बँकेची सविस्तर माहिती आपल्याकडे पाहिजे. बँकेचा आयएफएससी नंबर रिटर्न्समध्ये भरावा लागतो. रिफंडचा पैसा थेट तुमच्या खात्यात जमा होतो.
रिटर्न्स खालील पद्धतीने भरा
कोणता फॉर्म भरायचा, हे पाहा
करदात्याच्या उत्पन्नाचा स्रोत पगार वा पेन्शन, एकाच घराच्या भाड्यातून, व्याजातून उत्पन्न मिळत असेल तर हा फार्म भरावा.
भरू नये
अन्य स्रोतातून होणाऱ्या उत्पन्नातून तोटा झाला असेल तर आयटीआर-२ हा फॉर्म भरावा.
करातून सूट (exempt income) मिळालेले उत्पन्न ५ हजारांपेक्षा जास्त असेल आयटीआर-१ न भरता आयटीआर-२ हा फॉर्म भरावा. गेल्या वर्षीपासून सीबीडीटीने हा नियम केला आहे. पीपीएफवरील व्याज, लाभांश, करमुक्त बॉण्डवरील व्याज आदी रक्कम exempt income मध्ये येते.
विदेशात मालमत्ता असेल तरीही आयटीआर-१ भरू नये.
वैयक्तिक वा हिंादू एकत्रित कुटुंबातील सदस्यांचे उत्पन्न पगार वा पेन्शन, एकापेक्षा जास्त घरांतून मिळणारे भाडे, भांडवली उत्पन्न (capital gain), व्याज तसेच, लॉटरी, घोड्याची स्पर्धा अशा अन्य स्रोतातून उत्पन्न मिळत असेल तर हा फॉर्म भरावा.
भरू नये
व्यवसाय वा व्यावसायिक (profession) क्षेत्रातील कामातून उत्पन्न मिळत असेल तर हा फॉर्म भरू नये. फॉर्म-४ भरावा.
फर्ममधील सहयोगी सदस्यांचे उत्पन्न व्याज, पगार, बोनस, कमिशन, मोबदला, भांडवली उत्पन्न (capital gain), एकापेक्षा जास्त घरांतून मिळणारे भाडे मिळत असेल तर हा फॉर्म भरावा.
करदात्याचे उत्पन्न मालकी उद्योगातून व्यावसायिक क्षेत्रांतून (डॉक्टर, वकील इत्यादी) वा कमिशन यातून मिळत असेल तर हा फॉर्म भरावा.
ज्यांच्या बिझनेसची उलाढाल एक कोटींपेक्षा कमी असेल तर वा प्रकल्पित कर नियमांत (presumptive taxation rules) उद्योगाचा समावेश असेल तर हा फॉर्म भरावा.
भरू नये
capital gain झाला असले तर वा व्यावसायिक स्वयंरोजगार (डॉक्टर, वकील वगैरे) असेल तर वा कलम ४४ ए (१) अंतर्गत व्यावसायिक क्षेत्राची नोंद होत असेल तर हा फॉर्म भरू नये.
हा फॉर्म सर्व करदात्यांनी भरावा लागतो. हा पावती फॉर्म असून तुम्ही हाताने टॅक्स रिटर्न्स भरला असेल वा तुम्ही ई फायलिंग केले असेल पण, डिजिटल सही केली नसेल तर हा फॉर्म बेंगळूरूमधील इन्कम टॅक्स ऑफिसच्या सेंट्रल प्रोसेसिंग सेंटर (सीपीसी) पाठवावा लागतो. सही केलेला आयटीआर-५ फॉर्म सीपीसीला मिळाल्याखेरीज तुम्ही भरलेल्या रिटर्न्सची प्रक्रिया पूर्ण झाली असे समजले जात नाही.
फॉर्म कसा भरायचा?
इन्कम टॅक्स रिटर्न्स दोन पद्धतीने भरला जातो.
मॅन्युअली किंवा ऑनलाइन. मॅन्युअली भरण्यासाठी फॉर्म स्टेशनरी दुकानातून घ्या किंवा www.incometaxindia.gov.in या बेवसाइटवरून डाऊनलोड करा. सीए, वकील वा इन्कम टॅक्स विभागातील 'टीआरपी'ला फी देऊन हा फॉर्म भरून घेऊ शकता. दुसरी पद्धत म्हणजे स्वतः हा फॉर्म भरा. स्वतः फॉर्म कसा भरायचा हे समोरच्या पानावर सविस्तर सांगितलेले आहे. टीआरपीच्या मदतीने तुम्ही ऑनलाइन फॉर्म भरणार असाल तर खालील पद्धतीने भरता येईल.
'टीआरपी'च्या मदतीने
http://www.trpscheme.com या वेबसाइटवर जा. Locate TRP वर क्लिक करा. तुम्हाला गुगुल मॅप दिसेल. त्याच्याखाली लिहिलेल्या सूचना पहा. Name या सदरात काहीही भरू नका. State व district हे पर्याय भरल्यामुळे आपल्या विभागातील टीआरपीचे नाव, पत्ता आणि फोन नंबर मिळेल. त्याच्याशी संपर्क साधा. वेळेवेळी इन्कम टॅक्स विभाग टीआरपी बाबत मीडियातून माहिती प्रसिद्ध करत असते. टोल फ्री नंबर १८००-१०-२३७३८ वर फोन करून टीआरपीसंबधी माहिती मिळवू शकता. सोमवार ते शनिवार सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत कधीही या नंबरवर फोन करता येईल.
कोणताही टीआरपी देशातील कुठल्याही व्यक्तीचा रिटर्न्स भरू शकतो. टीआरपीचे ओळखपत्र वा सर्टिफिकेट तपासता येऊ शकते.
टीआरपीला फॉर्म १६ ची फोटोकॉपी द्या, मूळ फॉर्म देऊ नका. त्याच्या मदतीने तो रिटर्न्स भरेल आणि जमा करेल. जमा केल्यानंतर तो त्याची पावतीही देईल. फॉर्म भरण्यात गडबड झाली तर त्याची जबाबदारी टीआरपीची असते.
खर्च किती येईल?
फॉर्म भरून तो जमा करण्यासाठी टीआरपी २५० रुपये फी घेतो.
कुठे जमा करायचे?
मुंबईतील पगारदार जे ऑफलाइन फॉर्म भरत असतील त्यांनी आयकर भवन, चर्चगेट येथे असेसमेंट ऑफिसरकडे रिटर्न्सचे फॉर्म जमा करावेत. असेसमेंट ऑफिसरबाबत माहिती मिळवण्यासाठी incometaxindia.gov.in वर जाऊन पॅनवर क्लिक करा. know your AO code वर क्लिक करा. पॅन मागितला जाईल. त्यानंतर एंटर दाबा. आयटीओ वॉर्डच्या संबंधित संपूर्ण माहिती मिळेल. पण, तुम्ही वर्षभरात नोकरी बदलली असेल तर नव्या कंपनीनुसार वॉर्ड असेल. या बेवसाइटवर असलेली माहिती गेल्यावेळी भरलेल्या रिटर्न्सच्या आधारावर दिलेली असते. वेबसाइटवरून ही माहिती मिळत नसेल आणि तुम्ही नोकरीही बदलली नसेल तर गेल्या वर्षी भरलेल्या रिटर्न्सच्या पावतीवरून वॉर्ड मिळवता येईल.
ऑनलाइन फॉर्म असा भरा
ऑनलाइन फॉर्म भरणे अत्यंत सोपे आणि अचूक असते. त्यामुळे रिफंडही लवकर मिळतो. ज्यांचे उत्पन्न पाच लाखांपेक्षा जास्त असते, त्यांना ऑनलाइन रिटर्न्स भरणे सक्तीचे आहे. अर्थात पाच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेले करदातेही ऑनलाइन फॉर्म भरू शकतात. ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी अनेक वेबसाइट आहेत पण, त्या फी आकारतात. इन्कम टॅक्स विभागाच्या वेबसाइटवर फॉर्म मोफत भरता येतो. त्यासाठी खाली दिलेले टप्पे पार पाडा.
incometaxindia.gov.in या वेबसाइटवर जा.
continue वर क्लिक करा. डाव्या बाजूला असलेल्या File Returns Online-Income Tax Return या पर्यायावर क्लिक करा.
A Y 2014-15 या मेन्यूमध्ये ITR1 वर क्लिक करा.
आयटीआर १ मधील Excel Utility वर क्लिक करा. यावर्षीसाठीचा 'सहज' फॉर्म येईल. आता डॉयलॉग बॉक्स मधील Save File पर्याय क्लिक करा. फॉर्म डेस्कटॉपवर सेव्ह करा.
आता फॉर्म ऑफलाइन भरा. फॉर्म व्हॅलिडेट करा.
फॉर्म भरल्यानंतर Generate XML file क्लिक करून फॉर्मचा एक्सएएमएल व्हर्जन तयार करा.
पहिल्यांदाच ई-रिटर्न्स भरत असाल तर इन्कम टॅक्सच्या वेबसाइटवर जाऊन रजिस्ट्रेशन करा आणि ई-मेल अकाऊंट आणि पासवर्ड मिळवा. त्यासाठी incometaxefiling.gov.in वर जा. Register वर क्लिक करा. पॅन मागितला जाईल. काही बेसिक माहिती देऊन रजिस्ट्रेशन करा.
त्याच्या मदतीने लॉग इन करा आणि Submit Return वर क्लिक करा.
एक्सएमएल फाइल ब्राउज करून अपलोड करा. अॅकनॉलेजमेंट फॉर्म येईल.
डिजिटल सही असेल तर ती द्या.
डिजिटल सही नसेल तर, अॅकनॉलेजमेट फॉर्मची प्रिंट त्यावर सही करा आणि १२० दिवसांच्या आत पोस्ट वा स्पिड पोस्टाने 'आयटी विभाग, सीपीसी, पो. बॉ. १, इलेक्ट्रॉनिक सिटी पोस्ट ऑफिस, बेंगळुरू- ५६०१०० या पत्त्यावर पाठवा.
त्यानंतर इन्कम टॅक्स विभागाकडून १५ ते २० दिवसांत रिटर्न्स यशस्वीरित्या भरल्याचा अॅकनॉलेजमेंटसंबंधी ई-मेल वा एएसएमएस येईल. अनेकांना शंका येते की, पोस्टाने अॅकनॉलेजमेट फॉर्म बेंगळुरूला पोहोचलाच नाही तर? १५ ते २० दिवसांत ई-मेल वा एएसएमएस आला नाही तर अॅकनॉलेजमेट पुन्हा पाठवा. बेंगळुरू ऑफिसच्या ०८०-४३४५६७०० या फोन नंबर चौकशी करता येईल.
गेल्या वर्षी ऑनलाइन रिटर्न्स भरले असतील तर यंदाही भरा. असे करणे सोपे आहे. तुम्हाला फक्त उत्पन्नाचे आकडे भरावे लागतील. बाकी ‌डिटेल्स आपोआप येतील.
खर्च किती येईल?
इन्कम टॅक्स विभागाच्या साइटवरून भरत असाल तर खर्च येणार नाही. अन्य साइटवरून भरत असाल तर १०० ते ७५० रुपयांपर्यंतचा खर्च येईल.
---- महाराष्ट्र टाईम्स -----

Wednesday, July 23, 2014

येई हो विठ्ठले भक्तजन वत्सले

येई हो विठ्ठले भक्तजन वत्सले
करुणा कल्लोळे
पांडुरंगे पांडुरंगे भक्तजन वत्सले ||धृ||

सजल जलद घन
पीतांबर परिधान येई
उध्धरणे केशीराजे भक्तजन वत्सले ||१||

नामा म्हणे तू विश्वाची जननी
क्षिराब्धि निवासनि जगदंबे
भक्तजन वत्सले ||२||

येई हो विठ्ठले भक्तजन वत्सले येई हो विठ्ठले
पांडुरंग पांडुरंग

Monday, July 14, 2014

भारत निर्माण -- by Jayendra Jayant Salgaonkar

चला तर! आपण सगळे मिळून प्रगत भारत निर्माण करू या! !प्रिय जनहो,
आपण सगळे मिळून प्रगत भारत निर्माण करुया!
एका अमेरिकन माणासाचे उद्गार फार सूचक आहेत. तो म्हणाला “मला तुम्हा भारतीय लोकांमधे एक मोठी विचित्र गोष्ट आढळते. तुम्हा लोकांना आपल्या देशावर टीका करण्यामधे कमीपणा वाटत तर नाहीच, उलट एकप्रकारचा आनंद आणि अभिमान वाटतो. जगात असे कुठेच घडत नाही. अगदी आफ्रिकेच्या जंगलातुन आलेला माणूस सुध्धा आपल्या जंगलाला एव्हढी नांवे ठेवत नाही. अमेरिकेमधे आपल्या देशाला नांवे ठेवणे हे आपल्या आईला नांवे ठेवण्यासमान समजतात. तुमच्या देशांत बरेच प्रॉब्लेम्स आहेत. तसे आमच्या देशात पण आहेत. म्हणून आपण आपला देश वाईट ठरवायचा का?” हा अमेरिकन माणूस स्टॅनफोर्ड या प्रसिध्ध विद्यापिठातील नोबेल पारितोषिक विजेता प्रोफेसर होता.अशाच एका थोर अमेरीकन विद्वानाची गाठ पडली. त्याला भारताविषयी फार जिव्हाळा आहे. त्याने सांगितले, “तुम्ही भारतीय लोक एक चूक नेहमी करत असता. तुम्ही भारताची तुलना नेहमी इंग्लंड-अमेरिकेशी करत असता. पण या देशांना स्वातंत्र्य मिळून 200 वर्षे होऊन गेली आहेत. तुमच्या देशाला स्वातंत्र्य मिळून फक्त 60 वर्षे झाली आहेत. त्यामुळे तुमच्या देशाची तुलना आमच्या देशाबरोबर करणे म्हणजे 10 वर्षांच्या मुलाची तुलना 30 वर्षांच्या माणसाबरोबर करण्यासारखे आहे.”
भारतातील आत्ताच्या अनागोंदिबद्दल ते म्हणतात, “तुम्ही लोकांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर जी मंडळी सत्तेवर आली त्यांना ऍडमिनिस्ट्रेशनचा म्हणजे राज्यकारभाराचा कोणताही अनुभव नव्हता. हा जॉबच त्यांच्यासाठी नवीन होता. अमेरिकेचा प्रेसिडेन्ट असो किंवा ब्रिटनचा प्राइम मिनिस्टर असो, त्यांना थोडा- फार तरी ऍडमिनिस्ट्रेशनचा अनुभव असतो. पण अनुभव नसताना सुद्धा सत्तेवर आलेल्या लोकांनी उत्तम कारभार केला. लोकशाही नुसतीच रुजवली नाही तर बळकट केली. तुमचा भारत देश हा मिनी युरोप सारखा आहे. भारतातील एका राज्यातून दुसर्‍या राज्यात जाणे म्हणजे युरोपातील एका देशातुन दुसर्‍या देशात जाण्यासारखे आहे. युरोपमधे देश बदलला तर नुसतीच भाषा किंवा संस्कृती बदलत नाही तर सरकार, नियम, चलन सगळेच बदलते (त्या वेळी युरो आस्तित्वात नव्हते). पण भारतात तसे नाही. राज्य बदलल्यावर भले भाषा बदलत असेल. पण देश बदलत नाही. एव्हढी विविधता असूनही तुमचा देश अजूनही एकसंध आहे हीच आमच्या दृष्टीने मोठी कौतुकाची गोष्ट आहे. युरोपीयन लोकांना हे अजून जमलेले नाही. आता भारतामधे सत्तेवर येणार्‍या लोकांमधे ऍडमिनिस्ट्रेशनचा(प्रशासनाचा)अनुभव असलेले जास्त लोक येणे आवश्यक आहे. या ठिकाणी मतदारांनी उमेदवार निवडून देताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.”
अमेरीकेतील एक सिनेटर आहेत. ते भारत द्वेष्टे म्हणूनच प्रसिद्ध आहेत. त्यांची एक मुलाखत नुकतीच वाचायला मिळाली. त्यात त्यांनी म्हटले आहे, “भारतापुढे आज जी संकटे आहेत. आणि ज्या संकटांचा भारताला सामना करावा लगला, ती सगळी संकटे “एकमेवद्वितीय (Unique) आहेत.जगातील कोणत्याच देशाने अशा प्रकारच्या समस्यांना तोंड दिलेले नाही. त्यामुळे या समस्यांना रेडीमेड सोल्यूशन्स मिळणार नाहीत. भारतीयांनाच या समस्यांवर तोडगा शोधून काढावा लागेल. माझी खात्री आहे की भारतातील लोक यामधे यशस्वी होतील. एव्हढे असूनही भारताने जी प्रगती केली आहे ती खरोखरच कौतुकास्पद आहे.” हल्ली ते भारताविषयी बरेच चांगले बोलत असतात.
असाच एक अमेरिकन इंजिनीयर भेटला. तो काही वर्षे भारतात राहून गेला आहे. भारतामध्ये प्रत्येक गोष्ट सरकारने करावी अशी भावना अहे त्याबद्दल त्याने भावना व्यक्त केली, “तुमच्या देशामधे सरकारने प्रत्येक गोष्ट करावी अशी लोकांची अपेक्षा आहे. थोडक्यात तुम्ही लोक सरकारवर फार अवलंबून आहात. आमच्याकडे असे नाही. आम्ही सरकारवर कमीत कमी अवलंबून असतो. पुष्कळशा गोष्टी आमच्या आम्ही करत असतो. तुम्हाला आमच्याकडे जी शिस्त, उच्च दर्जाची सार्वजनिक स्वच्छता, वाहतुकिच्या नियमांचे उत्तम पालन, व्यवहारात प्रामाणिकपणा व पारदर्शीपणा , करप्शन नसणे या ज्या गोष्टी दिसतात त्या सरकारने कडक कायदे केले म्हणून दिसत नाहीत. उलट आमच्या सरकारचे म्हणणे आहे की कायदे करुन किंवा कायद्याचा बडगा दाखवून लोकांना शिस्त लावता येत नसते. उलट लोकांनी आपणहून कायदेकानून पाळले तरच ते उपयुक्त ठरतात. आम्हाला लहानपणापासूनच कायदे हे आमच्या फायद्यासाठी व संरक्षणासाठी केले आहेत, तसेच नागरीक म्हणून आमची काही कर्तव्ये असतात हे मनावर ठसवले जाते.”
मी मुद्दामच अमेरिकन लोकांचे उदाहरण दिले आहे. कारण अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रातील लोक भारताकडे कोणत्या नजरेने बघत असतात आणि आपण कोणत्या नजरेने बघत असतो हे कळावे म्हणून.येत्या 15 ऑगस्ट रोजी भारताला स्‍वातंत्र्य मिळून ६७ वर्षे होत आहे. त्यानिमित्त आपण आपल्या देशाविषयी काय विचार करत असतो याचा आढावा घेणे जरुरीचे आहे.
१. आपला देश कसाही वेडावाकडा असला तरी तो आपला देश आहे.
२. आपल्या देशाने आपल्यासाठी काय केले यापेक्षा आपण आपल्या देशासाठी काय केले व काय करू शकतो याचा विचार करणे जास्त आवश्यक आहे. सरकारने काय करायचे यापेक्षा मी रस्यात थुंकायची, रस्यात घाण किंवा कचरा टाकण्याची,बेशिस्त वागण्याची, वाहतुकिचे नियम तोडण्याची, पकडले गेल्यास पोलिसाला चिरिमिरी देउन सुटका करुन घेउन करप्शनला बढावा देण्याची, इतरांशी उद्धटपणे वागायची, संधि मिळेल तेव्हा डल्ला मारायची माझी सवय केव्हा मोडणार?
३. आपणच घाण करायची आणि ती उचलायला सरकारी माणूस येइल याची वाट बघायची. नाही तर परदेशी पलायन करायचा विचार करायचा. असे हे किती दिवस चालणार, याचा आता गंभिरपणे विचार करण्याची वेळ आली आहे.
४. आज अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, जपान, कॅनडा, कोरिया, तैवान, सिंगापुर, ऑस्ट्रेलिया या राष्ट्रांनी जी प्रगति केली आहे ती तिथल्या जनतेने केली आहे,सरकारने नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.
प्रगत भारत निर्माण करणे हे आपल्या हातात आहे, सरकारच्या नाही, याची जाणिव होणे आवश्यक आहे. आणि सरकार म्हणजे कोण? ते कोणी परग्रहावरुन आलेले लोक नाहीत आपल्यातिलच लोक आहेत. याचे भान ज्याचे त्याने ठेवावे हीच अपेक्षा.
चला तर! आपण सगळे मिळून प्रगत भारत निर्माण करू या !!

Monday, June 23, 2014

एवढं जगात दुसरं भयंकर काहीही नसतं....

खरंतर वाचायला काहीच नाहीये. पण, तरीही ते कोरे कागदही वाचून संपत नाहीयेत.
कुठेही पोहोचलो नाहीयेय, वाट संपत नाहीये. पण, वाटेतलं अंतर कापणंही मी सोडलं नाहीये
खरंतर विझणं कधीचच अनुभवलंय मी. पण, तरी जळणं काही सुटत नाहीये.गर्दी माणसांची आहे, पण मी त्यात नाहीये. मग, एकटाच माणूस गोंगाट कसा करू शकतो?
इथे कुणीही दुसरं नाहीये. मग काचेत दिसतंय ते कोण आहे? तो हसतो, तो रडतो, हसत हसत रडतो अन रडत रडत हसतो.
सोबत असलेली माणसं पटत नसतात आणि पटत असलेली माणसं सोबत नसतात, यालाच 'नरक' म्हणतात बहुतेक.
आपण एखाद्या गोष्टीमागे जीव तोडून धावत जातो, पाठलाग करतो आणि आपण पाठ फिरवून निघून जाताना मागे वळून पहिल्यावर आपला पाठलाग मात्र कुणीच नाहीये याची जाणीव टोचणारी असते.यालाच 'तुच्छ' म्हणतात बहुतेक.
कितीतरी बोलत रहावे, मनात असेल नसेल सगळं बडबडत रहावं आणि थोड्या वेळाने लक्षात यावं की, आजूबाजूला कुणीच नाहीये. या जाणीवेला 'भकासपणा' म्हणतात बहुतेक.
स्वतःची किंकाळी स्वतःच ऐकण्याएवढं जगात दुसरं भयंकर काहीही नसतं.

वारी- काय आहे जाणून घ्या

 http://api.ning.com/files/vSdspwTjNvUjno2CX1PB2Cm-qE2FAPzdmHAeP25evIYdSx72OWXQJoxid37Zq8boy646mCBHWmWVmjgtzaruF3g*exMc3wHj/AshadhiEkadasiPandharpurYatra02.jpg


वारी- काय आहे जाणून घ्या

१) वारी सोहळा हा माऊलींचा असला तरी माऊलीला ज्याची चिंता तो वारकरी ऊन, पाऊस, वारी याची तमा न बाळगता वारीत चालत राहतो. कारण त्याला भेटायचे असते ते विठुरायाला आणि त्याला सोबत असते माऊली... काही निष्ठावंत वारकरी तर दिवसभर तोंडात पाणीसुद्धा घालत नाहीत. काय खायचे-प्यायचे ते रात्री तळावरच... निष्काम सेवेचा धडा मिळतो या वारीतच!
२) पालखी सोहळ्यात सर्वांत पुढे चालणारा श्री माऊलींचा अश्व हा श्री श्रीमंत शितोळे सरकार यांचे अंकली-बेळगाववरून श्रीक्षेत्र आळंदीस परंपरेनुसार पायीच आणला जातो. विशेष हे की या अश्वावर कोणीही मनुष्य स्वार झालेला नसतो. हा अश्व ज्येष्ठ शु॥११ ला अंकलीवरून प्रस्थान करतो आणि जेष्ठ वद्य ७ ला (पूर्ण ११ दिवस) आळंदीत प्रवेश करतो. आळंदीला इंद्रायणी नदीच्या पुलापाशी अश्व आले की श्रीमंतांचे प्रतिनिधी तसा निरोप मंदिरात सोहळ्याचे मालक व चोपदार यांना देतात. त्यानंतर श्री हैबतबाबांची दिंडी अश्वांना सामोरी जाते. अश्वांची पूजा केली जाते. त्यानंतर वाजतगाजत अश्वांना मंदिरात आणले जाते. अश्वांच्या स्वागतासाठी मंदिरात पायघड्या घातलेल्या असतात.
३) अश्वाला आळंदीसं पायी आणण्याच्या मागे केवळ परंपराच नाही तर एक श्रदधाही जोडलेली आहे हा अश्व अंकली (बेळगाव) वरून आळंदी येताना ज्या ज्या गावी जातो तेथील जनसमुदाय त्याचे दर्शन घेतात; कारण त्याला केलेला नमस्कार श्री माऊलीच्याकडे आणि त्यांच्या करवी श्री पंढरीच्या विठुरायाकडे पोहोचतो अशी दृढ श्रदधा असते.
४) संपूर्ण सोहळ्यात श्रींची सामूहिक चार स्नाने होतात. पंढरीस जाते वेळी व परतीचे वेळी होणारे नीरा स्नान आणि श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढ एकादशी व आषाढ पौर्णिमेस होणारे श्री चंद्रभागेचे स्नान.
५) संपूर्ण वारीत सकाळच्या वेळीस फक्त दोनच ठिकाणी आरती होतात प्रथम- थोरल्या पादुका (चर्होली) आणि दुसरी पुणे येथे शिंदे छत्रीपाशी.
६) श्रीमंत शिंदे सरकार यांनी श्री माऊलींच्या मंदिर व्यवस्थेसाठी आळंदी आणि नाणज ही गावे इनाम दिली होती, श्री गुरु हैबतबाबादेखील शिंदे सरकार यांचे पदरी सरदार होते. माऊलींच्या मदिरातील महाद्वार, नगारखाना, वीणा मंडप हे श्री शिंदे सरकार यांनीच बांधले. श्रीमंत शिंदे सरकारांच्या याच सेवेचे स्मरण म्हणून त्यांचे समाधीस्थळ असलेल्या शिंदे छत्री जवळ सकाळची आरती होते.
७) इ.स.१८३१ पासून ह्या वारी सोहोल्यास श्रीमंत शितोळे सरकार यांचा राजाश्रय आहे. आजही तो अखंडपणे चालूच आहे. त्यांच्या ह्या सेवेचे स्मरण आणि बूज म्हणून आजही श्री माऊलीचा रात्रीतळाचा मुक्काम श्रीमंत शितोळे सरकारांच्या तंबूतच असतो.
८) वाखरी येथून पंढरीस वारी जाताना श्री माऊलींच्या पादुका रथातून उतरून घेऊन श्रीमंत शितोळे सरकार यांच्या गळ्यात दिल्या जातात.
९) वारीतील दिडयामध्ये काही वाद निर्माण झाल्यास तो वाद मालक, चोपदार, दिंडी प्रमुख, देवस्थान विश्वस्थ यांच्या सयुक्त बैठकित, श्रीमंत शितोळे सरकार यांच्या ध्वजाखाली निर्णय घेऊन सोडविण्यात येतो.
१०) संपूर्ण वारी सोहळ्यात मानाच्या कीर्तनाव्यतिरिक्त इतर कुठलेही कीर्तन होत नाही. ह्या कीर्तन सेवा श्री हैबतबाबांपासून चालत आलेल्या आहेत आणि आजही त्यांचे वंशज अतिशय श्रद्धेने त्या पार पाडत आहेत.
११) वारी सोहळ्यातील सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे ‘रिंगण’. त्याचे दोन प्रकार आहेत १) उभे, २) गोल. वारीसोहळ्यात तीन उभी आणि चार गोल रिंगणे होतात. त्यातील दोन रस्त्याच्या उजव्या तर दोन रस्त्याच्या डाव्या बाजूला होतात. त्यांतही दोन रिंगणे जेवणापूर्वी आणि दोन रिंगणे जेवणानंतर होतात.
या रिंगण सोहळ्यानंतरचा ‘उडीचा कार्यक्रम’ हा खूपच सुंदर आणि अवर्णनीय असतो.
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgHYhD2okwawjNavly_u9XUGpxshiLfFwsxPQH1XE7F5OeKDbvip-KpMBTFu230xsJZ0jReOU4KVv2EBoHfqle1bh1zp4_XAu9Z8p-JW4ZGiQUmbkgVKm3wh9YrRR7YnZs5sDW8GWKZIaI/s1600/2.jpg

१२) वारीत चालत असताना म्हणायच्या अभंगांचा क्रम आणि नियम ठरलेला असतो. रूपाचे, भूपाळीचे, वासुदेव, आंधळे, पांगळे, गौळणी इत्यादी अभंग सकाळच्या वेळी, दुपार जेवणानंतर हरिपाठ, गुरूपरंपरेचे अभंग, नाटाचे अभंग वारकरी म्हणतात. ठराविक वारांचे अभंग त्या त्या दिवशी म्हटले जातात.
१३) सर्व दिंड्या एकच अभंग एकदम म्हणत नाहीत. प्रत्येक दिंडीत मात्र एका वेळी एकच अभंग ऐकू येतो.
१४) दुपारी जेवणानंतर ज्ञानोबारायांचा ‘हरिपाठ’ म्हटला जातो. हरिपाठाच्या शेवटच्या अभंगामधील शेवटचे चरण ‘ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तीदेवी ज्ञान | समाधी संजीवन हरिपाठ॥ ‘म्हटले जाते त्यावेळी दिंडी थांबते; त्याबरोबर पालखीही थांबते आणि दिंडीतील लोक उभे राहून ते चरण म्हणतात. तेथूनच भूमीला स्पर्श करून श्री माऊलीला वंदन करतात.
१५) वारीसाठीची पूर्वतयारी संस्थान समिती, मालक, चोपदार हे चैत्र महिन्यापासूनच सुरू करतात. वारीच्या मार्गातील सर्व तहसील, ग्रामपंचायतींना भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी करतात व योग्य उपाययोजना सुचवितात.
१६) वारीत लाखोंचा जनसमुदाय एकत्रित चालतो पण त्यात कधीच कुठेही भांडणतंटा होत नाही. विशेष काही तक्रार असल्यास रात्रीच्या मुक्कामासाठीच्या तळावर त्याबाबत निर्णय घेतला जातो.
१७) वारीतील प्रत्येक दिंडी स्वत:चे सर्व साहित्य स्वत: आणते. दिंडीमध्ये चालणार्या प्रत्येक वारकर्याची त्यात अंतर्गत भिशी (कॉन्ट्रिब्यूशन) असते. सर्व खर्च या निधीतून केले जातात. काही दानशूर दिंडीला या ना त्या स्वरूपात दानही देतात.
१८) रथापुढील दिंड्या माऊली चालायला लागली की चालणे सुरू करतात. माऊली विसाव्याला किंवा तळावर थांबल्यावरच या दिंड्या विसावतात (बसतात). विसाव्याच्या जागी अगोदर पोहोचूनही जोवर माऊली विसावत नाही तोवर या दिंड्याही विसावत नाहीत.
१९) काही वारकरी वारीत फक्त पाणीवाटपाची सेवा देतात. वारी सुरू होऊन संपेपर्यंत त्यांचे काम पाणी वाटपाचेच असते. २०) काही वारकरी संपूर्ण वारीत अनवाणी चालतात, तर काही वारीत एकच वेळ जेवण करून चालतात.
२१) वारी सोहळ्यातील काही दिंड्या ह्या लोकशाही पद्धतीने चालविल्या जातात. श्री गुरू बाबासाहेब आजरेकर फड (रथामागे ७ क्रमांकाची दिंडी) हे या पद्धतीचे उदाहरण. फक्त वारीपुरतेच नाही तर वर्षभर ह्या दिंड्यांचे हरीभक्तीचे कार्यक्रम आपापल्या गावी सुरू असतात.
२२) संपूर्ण वारी सोहळ्यात एकच जरीपटका असतो, असे सर्वश्रुत आहे. पण वास्तवात वारीच्या व्यवस्थेच्या दृष्टीने एकूण तीन जरीपटके असतात.
२३) श्री माऊलींचे धाकटे बंधू श्री सोपानकाकांची पालखी वेळापूर समोरील भंडीशेगाव मुक्कामापूर्वी ‘टप्पा’ येथे येऊन श्री माऊलीस भेटते. यालाच ‘बंधुभेट’ म्हणतात. हा अतिशय भावूक प्रसंग असतो. या वेळी दोन्ही भावंडांचे रथ एकमेकांना भेटतात व मानकरी आणि विश्वस्त मंडळी दर्शन घेऊन श्रीफलांचे आदान-प्रदान करतात.
२४) वेळापूर येथे भारुडाचा मान हा शेडगे दिंडीकर्यांना आहे. शिक्षणापासून वंचित असलेल्या तत्कालीन बहुजनसमाजाला आध्यात्मिक ज्ञानदान करण्याचा श्री एकनाथ महाराजांचा उद्देश त्यांच्या भारुडातून आपल्यासमोर साकारतो.
२५) श्री ज्ञानोबारायांना अखिल मानवजात ‘माऊली’ असेच म्हणते. लेकराचे हित चिंतते ती माऊली! विश्वातल्या यच्चयावत जीवांना त्रैलोक्यातील सर्व सुखे प्राप्त व्हावीत, असे मागणे ज्ञानोबाराय पसायदानामध्ये विश्वात्मक देवाकडे मागतात म्हणून ज्ञानोबाराय हे ‘माऊली’ आहेत. आमच्या नामदेवरायांनी तर ज्ञानोबारायांना ‘योग्यांची माऊली’ म्हणून गौरविले. नाथरायांनी ‘साधकांचा मायबाप’ असा ज्ञानोबारायांचा महिमा गायला. श्री ज्ञानेश्वर महाराजांना आपण ‘ज्ञानोबा’ असे मोठ्या प्रेमादराने संबोधतो. ‘बा’ हे आदरार्थी वचन आहे. ज्ञानोबारायांच्या ठायी असणारे साधकाचे मातृत्व ‘माऊली’ या संबोधनाने तर साधकाचे पितृत्त्व ‘बा’ या शब्दाने सूचीत होते.
जगी ऐसा बाप व्हावा| ज्याचा वंश मुक्तीस जावा॥पोटा येतां हरले पापा| ज्ञानदेवा मायबापा॥असे तुकोबाराय म्हणतात.
२६) श्रींचे वारी सोहळ्यात होणारा ‘ज्ञानोबा-तुकाराम’ हा गजर केवळ एक सांप्रदायिक नामजप नसून त्यास सोऽहं साधनेचे अधिष्ठान आहे. एक श्वास तर दुसरा उच्छ्श्वास आहे, आणि एक उच्छ्श्वास आहे तर दुसरा श्वास आहे. ‘ज्ञानोबा-तुकाराम’ हे भजन म्हणजे मध्यमपदलोपी समास आहे. या दोन नामांत माऊलींपूर्वीचे आणि तुकोबारायांनंतरचे व या दोहोंच्या दरम्यानचे संप्रदायातील सर्व संत सामावलेले आहेत...
सौजन्य: Rajesh N. Prabhu-Salgaonkar